tag:blogger.com,1999:blog-57166360438005562262024-03-13T08:00:02.069-07:00अक्षरयात्राPravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.comBlogger74125tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-12980318516606272052020-07-06T03:42:00.000-07:002020-07-06T03:42:19.949-07:00नवं कोरं... :पोरींच्या भावविश्वाच्या कहाण्या<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhBtHy_UFVffTop01j3oHtTz9SxlBddnqrQwYu7asbZbgE7Ucg9zpdHF29tAGzYvKh6cvOip8JEGLSlIFnh7bFE6RlXEgjOMoqQCLEB9UAxb7OmAJrfvquKlC7Y9nz62KAB6H6HqsRUYHSH/s1600/randhir-shinde_1593275856.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="548" data-original-width="730" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhBtHy_UFVffTop01j3oHtTz9SxlBddnqrQwYu7asbZbgE7Ucg9zpdHF29tAGzYvKh6cvOip8JEGLSlIFnh7bFE6RlXEgjOMoqQCLEB9UAxb7OmAJrfvquKlC7Y9nz62KAB6H6HqsRUYHSH/s320/randhir-shinde_1593275856.jpg" width="320" /></a></div>
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<span style="font-size: large;">ग्रामीण जीवनातील किशोरवयीन मुलींचे शेणी गोळा करायला जाणे ही केवळ एक
वस्तुनिष्ठ घटना नाही तर त्यामध्ये विविध प्रकारचे भान एकवटलेले आहे.
चंद्रशेखर कांबळे यांचा 'शेणाला गेलेल्या पोरी' या शीर्षकाचा एक वेगळा
कवितासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवरील
किशोरवयीन मुलींच्या भावाजगाचा आलेख या कवितासंग्रहात आहे.</span><br />
<span style="font-size: large;">चंद्रशेखर
कांबळे यांचा 'शेणाला गेलेल्या पोरी' या शीर्षकाचा एक वेगळा कवितासंग्रह
अलीकडेच प्रकाशित झाला आहे. ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवरील किशोरवयीन
मुलींच्या भावाजगाचा आलेख या कवितासंग्रहात आहे. वास्तविक पाहता मराठीमध्ये
ग्रामीण संवेदनानुभवाची भरमसाठ कविता लिहिली जाते आहे. सामाजिक जीवनाचा एक
मोठा भाग या प्रकारच्या कवितेतून साक्षात झाला आहे. या पार्श्वभूमीवर
'शेणाला गेलेल्या पोरी' मधील कविता ही एकल विषयसूत्री स्वरूपाची दीर्घकविता
आहे. ग्रामीण जीवनातील किशोरवयीन मुलींचे शेणी गोळा करायला जाणे ही केवळ
एक वस्तुनिष्ठ घटना नाही तर त्यामध्ये विविध प्रकारचे भान एकवटलेले आहे.
शेणी या प्रदेशनिविष्ट शब्दासाठी काही भागात वेगळे शब्ददेखील वापरले जातात.
नागरी लोकांना 'शेणाला गेलेल्या पोरीं'विषयी कविता असा विषय कविताविषय होऊ
शकते हे हास्यास्पद देखील वाटू शकते. जसे केशवसुतांच्या कवितेतील 'म्हैस',
'वाट' असे शब्द ग.त्र्यं. माडखोलकरांना खटकले होते. मात्र ग्रामीण
जीवनातील एक लघुक्षेत्र कल्पून त्याविषयीच्या विविध भावनासंवेदना चंद्रशेखर
कांबळे यांच्या या कवितारूपातून व्यक्त केल्या आहेत. भूतकाळातील ग्रामीण
जीवनातील किशोरवयीन मुलींचे शेणी गोळा करायला जाणयाच्या निमित्ताने त्यांचे
भावविश्व व त्याच्याशी निगडीत सामाजिक, सांस्कृतिक, सामुहिक भाव
कवितेतून व्यक्त झाले आहेत. 'शेणी' या शब्दाशी निगडीत अनेक अर्थवर्तुळे
या कवितेतून निर्माण केले आहेत.</span><br />
<span style="font-size: large;">शेणी गोळा करायला जाणे यास ग्रामीण
मुलीच्या आयुष्यटप्प्याला विशेष महत्त्व आहे. सामाजिक रचनेत तिच्या या
कालधर्माला व मनोधर्मातून तिच्या विविध मनोवस्थांचा अवस्था प्रकटलेल्या
असतात. तिच्या उभरत्या समजुतीचा अस्तित्वाविष्कार या काळघटनांमध्ये असतो.
त्यामुळे शेणीला जाणाऱ्या मुलींच्या आनंदमय भावावस्थेपासून तिचे कष्ट,
दुःख, यातना आणि शोकांत जीवनानुभवाची रूपे या कवितेमधून अभिव्यक्त झाली
आहेत. घर, कुटुंब, रान, माळ याच्याशी निगडित विशिष्ट मनोवस्थेतेतील तिचे
जगणे साकार झाले आहे. शेणी आणायला जाण्यात तिच्या मनाची आनंदमय भावना आहे.
हा अनुभव तिला आरासमय वाटतो. रान फुलासारखे डवरल्याचा आणि रान भरात
येण्याचा अनुभव त्यात आहे. तसेच स्त्री जीवनाविषयी ग्रामीण जीवनामध्ये ज्या
भारतीयत्वाचा कल्पना अध्याहृत आहेत त्याचा देखील उच्चार या कवितेमध्ये
आहे. हा किशोरवयीन काळकृतीधर्म आणि मनोवस्था त्यांच्या 'अस्तित्वा'ला
आनंदमयता आणि 'असते'पण प्राप्त करून देणारा आहे. भारतीय परंपरानिष्ठ
स्त्रीजीवनाचा पट या संवेदनदृष्टीमागे आहे. त्यामुळेच बाईचं जोडणं, सांधणं
या निर्मितिश्रद्धेचा साफल्य भावाविष्कार कवितेमध्ये आहे. खेडूत मुलींची
निर्भरशीलता, धाडस, स्वातंत्र्य, खेळणं आणि बागडण्याचे कल्पविश्व कवितेमधून
साकारले आहे. तसेच 'तिच्या' या 'असण्या'वर सामाजिक काच, बंधनं, भीतीचा
धाकदेखील कवितेतून व्यक्त झालेली आहे. तिच्या आनंदकाळाला भविष्यरुपी
दुःखशोकाच्या सावलीची किनार देखील आहे.</span><br />
<span style="font-size: large;">मुलींचे आयुष्य हे क्रमशः
नष्ट आणि नाहीसे होण्याचे आहे. त्याची तुलना 'मेणबत्ती'शी केली आहे. अरुण
कोलटकरांच्या कवितेमध्ये आधुनिक दृष्टीचा एक भाग म्हणून स्त्रीच्या
विलयाचा, संपण्याचा संबंध मेणबत्तीच्या नष्ट होण्याच्या पद्धतीतून प्रकट
झालेला आहे. त्याचप्रमाणे 'मी एक शेण, तू एक मेण, दोघींच्याही वाट्याला
जळ्यायचेच क्षण' असे नष्टचर्य, जळण्याचे, नाहीसे होण्याचे स्त्रीत्वरूप या
कवितेमधून व्यक्त झालेले आहे. वेगवेगळ्या बायांचे व बायांविषयीचे 'आवाज' या
कवितेतून प्रकट झालेले आहेत. अर्थात हे नाहीसे होणे नैसर्गिक स्वरूपाचे
नाही यामागे सामाजिक अवकाशाचा काच आहे. अनैसर्गिक नाहीसे होण्याची दुःखद
जाणीव कवितेमध्ये आहे. पोरींच्या आकस्मिक नष्ट होण्याला शोकांताला सामाजिक
दाबाव कारणीभूत असत, याचे सूचन कवितेत आहे. तसेच भारतीय परंपरेत असणाऱ्या
शेणी किंवा गवऱ्या या शब्दाचे अनेक अर्थध्वनी या कवितेतून सतत निनादत ठेवले
आहेत. 'शेणी/ जळताना मरतात/आणि/ पोरी/ जगतानाही मरतात/ आणि जळतानाही
मरतात' असा दुहेरी शोकात्मभाव कवितेतून व्यक्त झाला आहे.</span><br />
<span style="font-size: large;">त्याचबरोबर
या मुलींच्या भावविश्वाला सांस्कृतिक संदर्भाची जाणीव आहे. ती भारतीय
परंपरेतील परंपरेतील पुराकथेशी निगडीत आहे. शेती संस्कृतीतील दिवाळसणातील
कृष्ण गवळणींच्या कथासृष्टीने तसेच शंकर-पारबतीच्या मिथकसृष्टीनी
स्त्रियांचे भावविश्व उजळलेले असते. त्यामुळे शेणी गोळा करणाऱ्या पोरींच्या
निमित्ताने भारतीय पुराकथेतील सांस्कृतिक जाणिवा प्रकटल्या आहेत. कवितेत
सतत मुली आणि गावसंबंधांचे भावविश्व उभा केले गेले आहे. तसेच या
संवेदनदृष्टीमागे भूतकाळातील पोरींच्या हरवलेल्या भावविश्वाचा पाठलाग आहे.
वर्तमानात पोरींचे हे भावविश्व नाहीसे झाल्याची दुखरी जाणीव गतकातरतेच्या
अंगाने व्यक्त झाली आहे. 'मीही घेतो शोध शेणीला जाणाऱ्या पोरींचा' असा
व्याकूळ आठवशोध कवितेत पुन्हापुन्हा आवृत्त झाला आहे. पोरींच्या असतेपणाचा
भूतकाळ वर्तमनापासून निखळलेला आहे त्याला साद घालण्याचा हा प्रयत्न आहे.</span><br />
<span style="font-size: large;">महात्मा
फुले यांच्या 'कुळंबिणीची कहाणीशी नाते सांगणाऱ्या या कवितेमध्ये
किशोरवयीन मुलींचे भावजग केंद्रीय स्वरूपात आहे. मुलींची आनंदमयता,
सर्जनकार्य, कष्ट, दुःख आणि यातनांचे एक चित्र कवितेतून प्रकटलेले आहे.
चंद्रशेखर कांबळे यांच्या या कवितेमध्ये प्रादेशिक जीवनाचे रंग मिसळलेले
आहेत. प्रदेशनिविष्टि अनुभवाबरोबरच भाषारूपाच्या बाबतीत देखील कवितेत
प्रदेशबोलीरूपे आहेत. ग्रामीण जीवनातील शेणी गोळा करणाऱ्या पोरींचे
सूत्र घेऊन दीर्घ स्वरूपातील ही कविता आहे. एकाअर्थाने पोरीविषयींची ही
मनोगते आहे. ती केवळ व्यक्तिविशिष्ट वा विशिष्ट कृतींचा पट साकार करणारी
आहेत असे नव्हे तर त्याच्याशी निगडीत विविध स्वरूपाच्या भावसंवेदना
व्यक्त करणारी ही कविता आहे. मुली व त्यांच्या भावकृती सामाजिकतेच्या
संदर्भात व्यक्त झाली आहे. शेणाला जाणे या कृतीशी निगडीत अनेक
अर्थवर्तुळांचा अवकाश या कवितेतून साक्षात केला आहे. दीर्घकवितेच्या
रचनाबंधातून ती व्यक्त केली आहे. भाषिक पातळीवर रूपके, प्रतीके, मिथकांच्या
रूपातून व्यक्ती आणि समूहाचा अवकाश साकार केला गेला आहे. या
दीर्घकवितेतील क्रियापदांचा वापर अतिशय लक्षणीय स्वरूपात आणि
वैशिष्ट्यपूर्णरित्या केला गेला आहे. 'बुचकळतात', 'खळबळतात', 'मळतात',
'घसरतात', पसरतात' अशा अनेक क्रियापदांच्या आवर्तनांमधून या मुलींचा
कृतिमनोधर्म प्रकट केला गेला आहे. मात्र एक विषयसूत्र निश्चित केल्यामुळे
त्याच्या आशयाविष्काराला मर्यादा देखील स्वाभाविकच पडतात. विशिष्ट
विषयकेंद्रामुळे कवितेतील भावविश्व सतत नियंत्रित केले जाते. तसेच एक
प्रकारची सपाट नाट्यात्मक स्वरूपाची सुलभतादेखील कवितेमध्ये आली आहे.
मात्र एका वेगळ्या संवेदनानुभवाची ही कविता आहे. भूतकाळातील मुलींविषयीच्या
भावसंबंधाचे विविध पदर तीमधून व्यक्त झाले आहेत. ग्रामीण संवेदनानुभवाची
तसेच किशोरवयीन मुलींचा वावरअवकाश, मनोधर्म सामाजिक संदर्भातील तिचे दुःख
आणि करूणाभावाची जाणीव या कवितेतून प्रभावीरित्या आविष्कृत झाली आहे. </span><br />
<span style="font-size: large;">शेणाला गेलेल्या पोरी</span><br />
<span style="font-size: large;">चंद्रशेखर कांबळे</span><br />
<span style="font-size: large;">दर्या प्रकाशन, पुणे.</span><br />
<span style="font-size: large;">पृष्ठे ११२</span><br />
<span style="font-size: large;">मूल्य १५०</span><br />
<span style="font-size: large;">randhirshinde76@gmail.com</span><br />
<br />
<span style="font-size: large;">Image & Article Credit: https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/columnist/news/randhir-shinde-rasik-article-tales-of-poris-brotherhood-127452986.html </span></div>
Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-13294063197746842852013-09-11T06:26:00.002-07:002013-09-21T05:18:56.580-07:00भारतीय सत्त्वाचा शोध घेणारी चित्रकार(Amruta Sher-Gil)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="font-size: large;"> <table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7V9CGOFR45m0ggMMppk8jA-yEYwgKZcLLD4zgYs-QYt0WBvfa-eMcDIJqm-q5MlJwJqr1Fkg8wFHAN4HDh1lQExd9ij50tAOXuYRPmfCZFYwJ4OXvh9NZnXezIcz8a-UwvqqiTe5QAyzt/s1600/441px-Three_Girls%252C_by_Amrita_Sher-Gil%252C_1935.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7V9CGOFR45m0ggMMppk8jA-yEYwgKZcLLD4zgYs-QYt0WBvfa-eMcDIJqm-q5MlJwJqr1Fkg8wFHAN4HDh1lQExd9ij50tAOXuYRPmfCZFYwJ4OXvh9NZnXezIcz8a-UwvqqiTe5QAyzt/s320/441px-Three_Girls%252C_by_Amrita_Sher-Gil%252C_1935.jpg" width="235" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><b>Three Girls, 1935, now at the National Gallery of Modern Art in New Delhi</b></td></tr>
</tbody></table>
</span><br />
<br />
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjTW0KXW3hSaOaGRHG9GBP76mQYSXrCJDmEIejFX-ab2rcCWUjq4JpUJ-0TewZOt6SSFPkZEopYQRcn_pN6lnQl35MqhauuFqaLjHEyHBttLIQwKM5WU40XIGiorf4pGtPdYwEYQRnlxGFM/s1600/Amrita_Sher-Gil_in_her_studio_in_Shimla,_1937.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjTW0KXW3hSaOaGRHG9GBP76mQYSXrCJDmEIejFX-ab2rcCWUjq4JpUJ-0TewZOt6SSFPkZEopYQRcn_pN6lnQl35MqhauuFqaLjHEyHBttLIQwKM5WU40XIGiorf4pGtPdYwEYQRnlxGFM/s320/Amrita_Sher-Gil_in_her_studio_in_Shimla,_1937.jpg" width="227" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><b>Amrita Sher-Gil in her studio in Shimla,</b> <b>photographed by father <i>Umrao Singh Sher-Gil</i>, 1937.</b></td></tr>
</tbody></table>
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi02qVTBgeTqjynRcDRfhEtXtk8tHVDWmXYzcM-KIL2Fs1kzasv_aiDa9Mzf5_dBCgHY9zRbrQfY1CXguU87alSqvIMkj98jPbpXHzd8N5yWsTBiDwDjg83Aftoex-051aYa6Xsu5R97mvx/s1600/200px-Amrita_Sher-Gil,_painter,_(1913-1941).jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi02qVTBgeTqjynRcDRfhEtXtk8tHVDWmXYzcM-KIL2Fs1kzasv_aiDa9Mzf5_dBCgHY9zRbrQfY1CXguU87alSqvIMkj98jPbpXHzd8N5yWsTBiDwDjg83Aftoex-051aYa6Xsu5R97mvx/s1600/200px-Amrita_Sher-Gil,_painter,_(1913-1941).jpg" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><span style="font-size: small;">[<b>Born:</b>30 January 1913,Budapest,Austria-Hungary,<b>Died:</b> 5 December 1941 (aged 28) Lahore,British India (present day Pakistan)]</span></td><td class="tr-caption" style="text-align: center;"><br /></td><td class="tr-caption" style="text-align: center;"><br /></td></tr>
</tbody></table>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<br />
<span style="font-size: large;">'चित्रकार अमृता शेर-गील’ हे रमेशचंद्र पाटकर यांनी लिहिलेले पुस्तक लवकरच
लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित होत आहे. भारतीय चित्रपरंपरेला आधुनिक वळण
देणाऱ्या अमृताविषयीच्या एका प्रकरणातील हा संपादित अंश..</span><br />
<span style="font-size: large;">विलक्षण
बुद्धिमत्ता व कल्पनाशक्ती, स्वतंत्र बाणा व बंडखोर वृत्ती आणि
स्वच्छंदीपणा व संवेदनशीलता असलेल्या अमृताला वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी
जगाचा निरोप घ्यावा लागला. आपल्या अल्पायुष्यात तिनं जे चित्रविश्व उभं
केलं आहे ते निव्वळ अप्रतिम आहे. पुन:पुन्हा पाहायला, निरखवायला लावणारं
आहे.</span><br />
<span style="font-size: large;">चित्रकला आपल्या अंगी जात्याच आहे याची जाणीव तिला लहानपणीच झाली
होती. पाश्चात्त्य संगीतात पारंगत असलेल्या तिच्या आईनं ते ओळखलं.
चित्रकलेचं शिक्षण घ्यायला ती पॅरिसला आली. प्रथम व्हिएरे व्हॅलंट(</span><span style="font-size: large;"><span style="font-size: large;">Pierre Vaillant )</span>यांच्या
‘ग्रा शामिए’त(</span><span style="font-size: large;"><span style="font-size: large;">Grande Chaumiere</span>) व नंतर लुसियॅ सीमॉ(</span><span style="font-size: large;"> Lucien Simon ) यांच्या ‘एकॉल दे बोझार’ या स्टुडिओत
युरोपीय अॅकॅडमिक कलेचं शिक्षण तिनं घेतलं. अभ्यासाचा भाग म्हणून न्यूड
मॉडेल्सची चित्रं जशी तिनं काढली तशी काही वस्तुचित्रं, व्यक्तिचित्रं,
आत्मव्यक्तिचित्रं, रचनाचित्रंही काढली. तैलरंगात काढलेली ती अॅकॅडमिक
शैलीतील चित्रं होती.</span><br />
<span style="font-size: large;">१९३२ साली पॅरिसला भरलेल्या ग्रा सालोच्या
प्रदर्शनात तिच्या ‘यंग गर्ल्स’ या चित्राला सुवर्णपदक मिळालं. एवढंच
नव्हे, तर प्रदर्शन भरवणाऱ्या संस्थेचं सहसभासदही करून घेतलं गेलं.
पॅरिसच्या वास्तव्यात सेझान(</span><span style="font-size: large;"> Paul Cézanne), गोगँ(</span><span style="font-size: large;">Gauguin), मॅतीस यांसारख्या अव्वल दर्जाच्या
आधुनिक चित्रकारांच्या कलेचा तिला परिचय झाला, पण पॅरिसला व्यावसायिक
चित्रकार म्हणून नाव कमावण्याची इच्छा मनाआड करून भारतात जायचा तिनं निर्णय
घेतला. आपल्या कलेचा विकास भारतातच होईल यावर तिचा अढळ विश्वास होता.
तिच्या निर्णयाला गुरू लुसियॅ सीमॉ यांचं पाठबळ लाभलं.</span><br />
<span style="font-size: large;">ज्या वेळी ती
भारतात आली त्या वेळी बंगाल कला घराण्याची चित्रकला ऐन जोमात होती.
कलाशाळांतून दिल्या जाणाऱ्या अॅकॅडमिक शिक्षणाचा संस्कार झालेली चित्रकला
लोकप्रिय होत होती. या दोन कलाप्रवाहांशी ‘संघर्ष’ करत आपल्याला स्वत:ची
वाट शोधावी लागणार याची अमृताला जाणीव झाली. बंगालच्या
पुनरुज्जीवनवाद्यांप्रमाणे गतकालातील चित्रकलेच्या अंधानुकरणातील निष्फळता
तिच्या लक्षात आली होती. तसंच वस्तूचं यथातथ्य चित्रण करणं हेच कलेचं
प्रयोजन आहे यावर विश्वास असणाऱ्या कलाशाळांतील सादृश्यवाद्यांच्या
चित्रांतील निर्थकताही तिनं ओळखली होती. हे दोन्ही कलाप्रवाह दुर्बलतेला,
‘वांझ’पणाला शरण गेले आहेत याची तिला खात्री झाली होती. (त्या काळात
पौराणिक विषय असलेली व युरोपीय अॅकॅडमिक शैलीतील राजा रविवर्माची चित्रं
लोकप्रिय होती, पण अमृतानं त्याची दखल घेतली नाही, याची नोंद करायला हवी.)</span><br />
<span style="font-size: large;">भारतीय
सत्त्वाचा आविष्कार करण्याच्या दिशेनं अमृतानं चित्रं काढायला सुरुवात
केली. युरोपीय अॅकॅडमिक शैलीचे संस्कार झालेली अमृता आपल्यासमोरील
आव्हानाला कसं तोंड देत होती हे दोन चित्रांच्या उदाहरणांवरून समजून घेऊ
या. ‘यंग गर्ल्स’ व ‘ग्रुप ऑफ थ्री गर्ल्स’ ही सुवर्णपदकं मिळालेली दोन
चित्रं. (‘थ्री गर्ल्स’ला बॉम्बे आर्ट सोसायटीचं सुवर्णपदक मिळालं होतं.)</span><br />
<span style="font-size: large;">‘यंग
गर्ल्स’मध्ये अंतर ठेवून बसलेल्या तरुणी आहेत. त्यातील डावीकडील तरुणी
दासी आहे व उजवीकडील तरुणी तिची मालकीण आहे. विचारमग्न भावावस्थेत मूकपणे
त्या बसलेल्या आहेत. दासीच्या हातांत फळांची प्लेट आहे. तिचा वर्ण सावळा
आहे आणि चेहऱ्यावर उदास भाव आहेत. फॅशनेबल पेहरावात दिमाखदार खुर्चीवर
बसलेल्या मालकिणीचा वर्ण गौर आहे. फ्रेंच चित्रकारांनी सधन स्त्रियांच्या
काढलेल्या व्यक्तिचित्रात दिसतो तसा. तिचे केस मोकळे सुटलेले आहेत आणि
त्यामुळे तिचा चेहरा अर्धवट झाकला गेला आहे. तिच्या हातात पांढरा कंगवा
आहे. चित्रात खाली उजव्या कोपऱ्यात वाटोळं टेबल आहे आणि फुलांची किनार
असलेलं तलम वस्त्र त्यावर आहे. टेबलावर फ्लॉवर पॉट व सौंदर्य प्रसाधनाच्या
तीन गोल डब्या आहेत. मालकिणीचं चित्रण उजळ रंगांत उठावदारपणं केलं आहे आणि
तो चित्राचा कंेद्रबिंदू आहे. दासीचं चित्रण मध्यम रंगच्छटांत केलेलं असून
पांढऱ्या रंगातील प्लेट व त्यातील रेड क्रिमझन रंगातील फळं पाहणाऱ्याचं
लक्ष वेधून घेतात. दासीच्या मागील पाश्र्वभूमी काळोखाची दाट सावली पडावी
तशी रंगवली आहे. दासीचा लंबगोल चेहरा व लांब नाक आमेदेओ मोदिलीआनी
काढलेल्या चित्रांतील स्त्रियांच्या चित्रणाची आठवण करून देतात, तर
मालकिणीच्या चित्रणावर सेझानचा पडलेला प्रभाव नजरेतून निसटत नाही.</span><br />
<span style="font-size: large;">रंग व
रूपबंध यांचा पॅरिसमधील शिक्षणातून घेतलेल्या अनुभवाला ‘ग्रुप ऑफ थ्री
गर्ल्स’मध्ये मुक्त वाव मिळाला आहे. पोटापाण्यासाठी काम करणाऱ्या ग्रामीण
भागातील या तीन मुली आहेत. एका अनामिक व अस्थिर भविष्याला सामोरं जावं
लागणार म्हणून काळजीत पडलेल्या त्या मुली आहेत. त्या एकमेकींना बिलगून
बसल्या आहेत. खिन्न मुद्रेनं बसलेल्या त्या मुलींच्या ओढणी घेतलेल्या
डोक्यांमागील सावल्यांतून उदासपणा अधिक गडद होतो. त्यांचे चेहरे हा
चित्राचा कंेद्रबिंदू आहे. एका बाजूला वळलेल्या, समोर पाहणाऱ्या व बाजूला
कटाक्ष टाकणाऱ्या अशा तीन अवस्थांचं चित्रण त्यात केलं आहे. एका बाजूनं या
मुली मूकपणं आपली जीवनकहाणी सांगत आहेत, तर दुसऱ्या बाजूनं आपल्या नशिबी
आलेल्या परिस्थितीबद्दल सजग आहेत. (उजव्या बाजूकडील तरुणीच्या हाताची ठेवण
सहजस्वाभाविक वाटत नाही; कृत्रिम वाटते. मॉडेलवरून केलेल्या रेखांकनाचा,
अमृतानं हाताचं चित्रण करण्यासाठी उपयोग केला आहे हे उघड आहे.) साध्यासरळ
चित्ररचनेत रेषांपेक्षा आशयाला उठाव देणाऱ्या रंगसंगतीतून अमृतानं चित्रण
केलं आहे.भारतातील समाजजीवनात अमृताला कमालीचा रस होता, त्याबद्दल कमालीचं
कुतूहल होतं. ‘थ्री गर्ल्स’, ‘चाइल्ड ब्राइड’ आणि इतर चित्रं पाहिली की
त्याची खात्री पटते. ‘चाइल्ड ब्राइड’(Child Bride)मध्ये स्त्रीच्या वाटय़ाला जन्मभर
पुरणारी असाहाय्यता व खिन्नता अमृतानं मोजक्याच रंगांत साकार केली आहे. न
विसरता येणारी गोष्ट म्हणजे पुरुषांच्या तुलनेत स्त्रीला तिच्या चित्रांत
मिळालेलं महत्त्वाचं स्थान. हिमाचल प्रदेशातील ग्रामीण स्त्री जीवनाचं जसं
तिनं चित्रण केलं आहे, तसं दक्षिण भारतातील स्त्रियांचंही केलं आहे. ‘साऊथ
इंडियन व्हिलेजर्स गोइंग टु मार्केट’ हे त्याचं एक ठळक उदाहरण.</span><br />
<span style="font-size: large;">भारतीय
समाजजीवनातील वास्तवाला दृश्यरूप देताना एका बाजूनं ती युरोपीय चित्रांतील
रंगांचा व दुसऱ्या बाजूनं भारतीय पर्यावरणाचा उपयोग करत होती हे तिच्या
‘हिलमेन’, ‘हिल वुमन’ यांसारख्या चित्रांतून दिसून येतं. भारतात रंगवलेल्या
चित्रांतील आशय व त्याला साकार करणारी चित्ररचना यात होत गेलेल्या
स्थित्यंतराची आणि भारतीय अनुभवाला दृश्यरूप देण्यासाठी युरोपीय व भारतीय
कलामूल्यांची एकात्मता साधण्याचा ती अतिशय सावधपणं व विचारपूर्वक प्रयत्न
करत होती.</span><br />
<span style="font-size: large;">अजिंठय़ाला भेट दिल्यावर व तिथल्या भित्तिचित्रांचं अवलोकन व
अभ्यास केल्यावर अजिंठय़ाचे चित्रकार हे मनुष्यकृतींचा साधन म्हणून नव्हे,
तर सर्जनशील निर्मितीसाठी उपयोग करत होते हे अमृताच्या लक्षात आलं. तसा
प्रयत्न त्यानंतर काढलेल्या तिच्या चित्रांत आपल्याला आढळतो. उदाहरणार्थ,
‘इन द लेडीज एन्क्लोझर’ हे १९३८ साली काढलेलं चित्र. एका कुटुंबातील
स्त्रियांचं हे चित्र आहे. त्या डोक्यावर पदर घेऊन खाली बसल्या आहेत आणि
कोणतं ना कोणतं काम करत आहेत. बसलेल्या स्त्रियांच्या एका बाजूला एक लहान
मुलगी उभी आहे. अजिंठय़ाच्या भित्तिचित्रातील राजकुमारीसारखं तिनं आपल्या
केसात फूल माळलं आहे. अधरेउन्मलित पापण्यांतून ती आपल्या हातातील क्रिमझन
रंगाच्या फुलाकडे पाहत आहे. अजिंठय़ाच्या आडव्या चित्रपट्टय़ांतील
चित्रांसारखी या चित्राची रचना आहे आणि रंगयोजनेवर त्यातील रंगांची छाप
उमटली आहे. अजिंठय़ाच्या चित्रांतील लय व गती आत्मसात करण्याचा प्रयत्न
अमृता कशी करत होती याची आपण कल्पना करू शकतो.</span><br />
<span style="font-size: large;">मोगल, राजस्थानी, बाशोली,
कांग्रा लघुचित्रं अमृताच्या सौंदर्यास्वादाचा व अभ्यासाचा विषय बनली
होती. साहजिकच आपल्या वैशिष्टय़पूर्ण चित्रशैलीची जडणघडण करताना, त्यांची
वैशिष्टय़ं आपलीशी करण्याचा तिनं केलेला प्रयत्न ‘एलिफंट्स बाथिंग इन ए
ग्रीन पूल’, ‘कॅमल्स’ यांसारख्या चित्रांतून स्पष्टपणं दिसतो. या दोन
चित्रांना सरायातील पर्यावरण व निसर्ग यांची पृष्ठभूमी लाभली आहे. बिकानेर
लघुचित्र शैलीचा प्रभाव ‘कॅमल्स’वर आहे.</span><br />
<span style="font-size: large;">भारतात सूर्य तळपत असतो, पण
त्याच्या प्रकाशात दिसणारे स्त्री-पुरुष व निसर्ग यांचा अर्थ व सौंदर्यबोध
भारतीय चित्रकारांना झाला आहे याचा प्रत्यय त्यांच्या चित्रांतून येत नाही;
अशा अर्थाचं भाष्य अमृतानं आपल्या एका लेखात केलं आहे. स्टुडिओतील
अंधारलेल्या वातावरणात चित्रं काढणाऱ्या अमृताला तळपत्या व बदलत्या
सूर्यप्रकाशात स्त्री-पुरुष व निसर्गाच्या रंगांच्या आलेल्या विलक्षण
दृश्यानुभवाला तिनं ‘सिएस्टा’, ‘स्टोरी टेलर’ इत्यादी चित्रांत साकार केलं
आहे. रंग व रूप यांचं संयोगीकरण करण्याचा हेतू त्यामागे होता.</span><br />
<span style="font-size: large;">दृश्यकलेत
‘सौंदर्यसूचक रूपबंधा’ला महत्त्व देणाऱ्या क्लाइव्ह बेलच्या
सौंदर्यसिद्धान्ताचा अमृताच्या कलाविषयक विचारसरणीवर मोठा प्रभाव होता. पॉल
गूगॅ, ऑरी मतीस, मार्क शागल यांच्या चित्रांतील रंगांनी ती भारली गेली
होती. श्रेष्ठ प्रतीची रंगवादी चित्रकार बनणं हे तिचं एक महत्त्वाचं
उद्दिष्ट होतं. असं सांगतात की, शेवटच्या घटका मोजत असताना बिछान्यात
पडलेल्या अमृताची नजर, खिडकीला लावलेल्या पडद्याच्या फटीमधून
सूर्यास्ताच्या प्रकाशानं भिंतीच्या कॅनव्हासवर उमटलेल्या रंगांच्या
आकारांवर खिळली होती.</span><br />
<span style="font-size: large;">अमृता भारतात आल्यावर ग्रामीण भारतीय जनजीवन हा
तिच्या निरीक्षणाचा व आकलनाचा मुख्य विषय बनला. तिनं साकार केलेलं कलाविश्व
गरीब, कष्टकरी, भिकारी, स्त्रिया व त्यांच्या परिसरातील निसर्ग यांच्या
चित्रणानं भरलं आहे. पॅरिसमधील सामाजिक व सांस्कृतिक वास्तवापेक्षा भारतीय
ग्रामीण वास्तव वेगळं आहे याची जाणीव तिच्या मनात खोलवर रुजली. ‘थ्री
गर्ल्स’, ‘पोटॅटो पिलर्स’, ‘हळदी ग्राइंडर्स’, ‘ब्राइड्स टॉयलेट’, ‘वुमन ऑन
चारपॉय’, ‘रेस्टिंग मदर’, ‘व्हिलेज गर्ल्स’, ‘ड्रेसिंग द ब्राइड’ अशा किती
तरी चित्रांतून आपण ते पाहू शकतो.</span><br />
<span style="font-size: large;">अमृताच्या चित्रांतील स्त्री प्रतिमा
हा विवेचनाचा स्वतंत्र विषय असला तरी तत्कालीन बंगाली कला घराण्याच्या व
अॅकॅडमिक युरोपीय कलाशैलीत चित्रकारांनी काढलेल्या स्त्री प्रतिमांपेक्षा
त्या नि:संशय वेगळ्या आहेत. स्त्रियांच्या बाह्य़रूपापेक्षा त्यांच्या मनाचा
वेध घेण्याचा ती प्रयत्न करत होती, हे चित्रांच्या दृश्यभाषेतून सूचित
होतं.</span><br />
<span style="font-size: large;">पुनरुज्जीवनवादी व सादृश्यवादी अशा तत्कालीन प्रस्थापित
प्रारूपांपेक्षा एक नवं प्रारूप चित्रांच्या रूपानं घडवण्याचा तिचा प्रयत्न
सुरू होता, पण तिच्या अकाली निधनानं तिच्या शेवटच्या अपुऱ्या
चित्राप्रमाणं तो खंडित झाला.</span><br />
<span style="font-size: large;">अमृताची चित्रं तत्कालीन बऱ्याच
कलावंतांच्या व कला समीक्षकांच्या टीकेचा विषय बनली. तिच्या चित्रांतील
मनुष्यकृतींचं ‘विरूपीकरण’, रेखाटनातील कमजोरपणा व भारतीय कलापरंपरेविषयी
असलेलं अज्ञान हा कलासमीक्षकांचा मुख्य मुद्दा होता, पण तिच्या चित्रांचा
सहानुभूतीनं व स्वागतशीलपणं विचार करणारे कलासमीक्षकही होते. कार्ल
खंडालवाला हे त्यापैकी एक. अमृताचे जवळचे मित्र असणाऱ्या खंडालवालांकडून
तिच्या फार मोठय़ा अपेक्षा होत्या. त्यांनी अमृताची चित्रं बंगाल कला
घराण्याविरुद्धची तीव्र प्रतिक्रिया आहे असं मत व्यक्त केलं होतं. भारतीय
चित्रकलेला नवी दिशा दाखवणारी अमृता ही पहिली चित्रकार आहे, असं मुल्कराज
आनंद यांनी म्हटलं होतं. रूपबंध व रंग यांना तिनं दिलेला सौंदर्याकार
आधुनिक भारतीय चित्रकलेत अपूर्व आहे, असं भाष्य त्यांनी केलं होतं. पी. आर.
रामचंद्र राव यांच्या मते अमृताच्या चित्रात रूपाकार, सहजसुलभता व
आदिमकाळातील कलेमधील जोम प्रत्ययाला येतो. दृक् इंद्रिय संवेदनेचा आनंद व
दारिद्रय़ाबद्दल वाटणारा कळवळा यांचा एकाच वेळी अनुभव येतो.</span><br />
<span style="font-size: large;">काहीही असलं
तरी अमृतानं आधुनिक भारतीय चित्रकलेला नवा आयाम देऊन चित्रकारांच्या भावी
पिढय़ांना दिशादिग्दर्शन करण्याचं मौलिक कार्य केलं आहे याबद्दल दुमत होऊ
नये. तिची चित्रं समकालीन व नंतरच्या तरुण चित्रकारांचं प्रेरणास्रोत ठरली.
आशय व दृश्याविष्काराच्या दृष्टीनं आजही ती अभ्यासनीय आहेत व अप्रस्तुत
ठरलेली नाहीत. आधुनिकोत्तर आंतरराष्ट्रीय चित्रकलेच्या दृक् भाषेनं
प्रभावित झालेल्या नव्या पिढीतील चित्रकारांना ती निश्चितच मार्गदर्शक
ठरतील.</span><br />
<span style="font-size: large;"><br /></span>
<span style="font-size: large;"> 'चित्रकार अमृता शेर-गील’</span><br />
<span style="font-size: large;">- रमेशचंद्र पाटकर</span><br />
<span style="font-size: large;">- लोकवाङ्मय गृह(लवकरच प्रकाशित होत आहे.)</span><br />
<span style="font-size: small;">सौजन्य:लोकसत्ता </span><br />
<br />
<span style="font-size: small;">[Brief: </span><br />
<span style="font-size: large;"><b>Amrita Sher-Gil</b> (30 January 1913,<sup class="reference" id="cite_ref-GreatMinds_1-0"><a href="http://en.wikipedia.org/wiki/Amrita_Sher-Gil#cite_note-GreatMinds-1"></a></sup> – 5 December 1941), was an eminent Indian painter born to a Punjabi Sikh father and a Hungarian mother, sometimes known as India's Frida Kahlo,<sup class="reference" id="cite_ref-AmritaMaps_2-0"><a href="http://en.wikipedia.org/wiki/Amrita_Sher-Gil#cite_note-AmritaMaps-2"></a></sup> and today considered an important woman painter of 20th century India, whose legacy stands at par with that of the Masters of Bengal Renaissance; she is also the 'most expensive' woman painter of India.<sup class="reference" id="cite_ref-5"><a href="http://en.wikipedia.org/wiki/Amrita_Sher-Gil#cite_note-5"></a></sup></span><br />
<span style="font-size: large;">At sixteen, Sher-Gil sailed to Europe with her mother to train as a painter at Paris, first at the Grande Chaumiere under Pierre Vaillant and later at École des Beaux-Arts (1930–34),she drew inspiration from European painters such as Paul Cézanne and Paul Gauguin,while coming under the influence of her teacher Lucien Simon and the company of artist friends and lovers like Boris Tazlitsky. Her early paintings display a significant influence of the Western modes of painting, especially as practiced in the Bohemian circles of Paris in the early 1930s. In 1932, she made her first important work, Young Girls, which led to her election as an Associate of the Grand Salon in Paris in 1933, making her the youngest ever and the only Asian to have received this recognition.</span><br />
<br />
<span style="font-size: large;">Sher-Gil's art has influenced generations of Indian artists from Sayed Haider Raza to Arpita Singh and her depiction of the plight of women has made her art a beacon for women at large both in India and abroad.The Government of India has declared her works as National Art Treasures, and most of them are housed in the National Gallery of Modern Art in New Delhi.<sup class="reference" id="cite_ref-30">[30]</sup> A postage stamp depicting her painting 'Hill Women' was released in 1978 by India Post, and the Amrita Shergill Marg is a road in Lutyens' Delhi named after her. In 2006, her painting <i>Village Scene</i> sold for <img alt="INR" height="10" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ee/Indian_Rupee_symbol.svg/7px-Indian_Rupee_symbol.svg.png" style="vertical-align: baseline;" width="7" />6.9 crores at an auction in New Delhi which was at the time the highest amount ever paid for a painting in India.<sup class="reference" id="cite_ref-outlookindia_a_25-1"><a href="http://en.wikipedia.org/wiki/Amrita_Sher-Gil#cite_note-outlookindia_a-25"></a></sup></span><br />
<span style="font-size: large;">
</span><span style="font-size: large;">Besides remaining an inspiration to many a contemporary Indian
artists, in 1993, she also became the inspiration behind, the famous
Urdu play, by Javed Siddiqi, <i>Tumhari Amrita</i> (1992), starring Shabana Azmi and Farooq Shaikh.<sup class="reference" id="cite_ref-32"><a href="http://en.wikipedia.org/wiki/Amrita_Sher-Gil#cite_note-32"></a></sup></span><br />
<span style="font-size: large;">
</span><span style="font-size: large;">Her work is a key theme in the contemporary Indian novel "Faking It" by Amrita Chowdhury.]</span><br />
-From wikipedia <br />
<sup class="reference" id="cite_ref-33"></sup></div>
Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-85117811069156541042012-10-31T11:20:00.000-07:002012-10-31T11:20:24.453-07:00पोलादी पडद्यामागचा खुनशी सूत्रधार-Man Without a Face: The Unlikely Rise of Vladimir Putin by Masha Gessen<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiewD2vGqWR8A8wfHP_qmWN9eNo8PRAP272Y6dzEdu6zKposK3VmBXvWgf-GVN-dfoi3AFQ5l96ErRbvyOyoKYVjAFqI7lw0TyfrZ16x0pakUfWlnLsapok9iDqJK3x3lcjk4piBHjsYblP/s1600/penguin.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="200" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiewD2vGqWR8A8wfHP_qmWN9eNo8PRAP272Y6dzEdu6zKposK3VmBXvWgf-GVN-dfoi3AFQ5l96ErRbvyOyoKYVjAFqI7lw0TyfrZ16x0pakUfWlnLsapok9iDqJK3x3lcjk4piBHjsYblP/s200/penguin.jpg" width="130" /></a><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgcm2VcovSxAy90dmv9v9RKsBuiR44E46LikCu_ca6bx47BONKxpsitXuebB6UfxNWqLac7Afl4BWoMkJ2171bZT8WWNi9C3FjMMFmd-gUm7jXAcA3zMRXbiJsVbj2GaP7C0WnnuWPf3NbJ/s1600/The-Man-without-a-Face-The+Unlikrly.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgcm2VcovSxAy90dmv9v9RKsBuiR44E46LikCu_ca6bx47BONKxpsitXuebB6UfxNWqLac7Afl4BWoMkJ2171bZT8WWNi9C3FjMMFmd-gUm7jXAcA3zMRXbiJsVbj2GaP7C0WnnuWPf3NbJ/s1600/The-Man-without-a-Face-The+Unlikrly.jpg" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhomb-smd3DBqj8GqnPuRqj1DzI5zX7glST-Rq8xC9F2BezYFyxfq604y23j_TBL9F61zK5IKSIpvQlm3z0GjOeD9G2ig0phNh436nXqwbaWhwqGGpukdwgpw-UjwatX6FO8LZWBv-xHjVB/s1600/poladi+padadyamagcha.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><br /></a></div>
<span style="background-color: white;"><span style="font-size: large;"><br /></span></span>
<br />
<span style="font-size: large;"><span style="background-color: white;"><span style="color: maroon;">मारामाऱ्या करणारा मुलगा म्हणून
शेजाऱ्यांना त्याची आठवण आहे.. केजीबीसाठी काम करायचं स्वप्न बाळगणारा हा
मुलगा, पुढे राजकारणात यायचं ठरवून तिथून बाहेर पडला आणि रशियाचा अध्यक्ष
झाला.. विषय म्हणून पुतिन खुणावत असतील, तर हे तपशील महत्त्वाचेच!</span></span><br />स्थळ
: इस्तंबुल. नोव्हेंबर, २००५. वातावरणात म्हटलं तर थंडी. पण हातपाय आखडून
टाकणारी नक्कीच नाही. उलट प्रसन्नपणे घराबाहेर काढणारी. एकतर हे गाव
कमालीचं सुंदर. बायझंटाईन, रोमन, ऑटोमन अशी अनेक साम्राज्यं त्यानं
पाहिलेली. आपण शाळेत असताना कॉन्स्टॅन्टिनोपल नावानं त्याचा परिचय झालेला.</span>
<span style="font-size: large;">आता त्याचं इस्तंबुल झालंय. कॉन्स्टॅन्टिनोपलपेक्षा इस्तंबुल कितीतरी
सुरेख आहे. म्हटलं तर अरेबिक , म्हटलं तर युरोपिअन. एकाच वेळी ख्रिश्चन,
इस्लामी अशा संस्कृतींचा परिचय देणारं. पण तिथला माझा जो यजमान होता त्याला
तसं संस्कृतीशी वगैरे काही देणंघेणं नव्हतं. तो वास्तव्याला दुबईत असतो.
तेलाच्या व्यापारातला गडगंज. त्याचं इस्तंबुललाही घर होतं. तेलाच्या
व्यवसायात असल्यानं अनेक ठिकाणी- जिथं सर्वसामान्य जात नाहीत- त्याची ऊठबस
होती. या क्षेत्रातल्यांना पडद्यामागून अनेक गोष्टी करायची सवय असते. कोण
कोण काय काय उद्योग करतं हे माहीत असतं. या क्षेत्रात त्याचा अधिकार नोंद
घेण्यासारखा होता. बाकीच्या बाबतीत तो इतका आंधळा होता की त्याला ओऱ्हान
पामुक या नोबेल विजेत्या लेखकाचं घर इस्तंबुलमध्ये कुठे आहे, हे माहीत
नव्हतं. पण कोणता भारतीय उद्योगपती इथे कोणाला भेटायला येतो आणि काय काय
करतो. अशा चविष्ट पण निरुपयोगी माहितीचे तुकडे त्याच्याकडे सतत चघळायला
असायचे. संपायचेच नाहीत. माझा तेलातला रस लक्षात घेऊन त्या दिवशी तो एकाला
भेटायला घेऊन गेला. कोण, काय विचारलं, तर म्हणाला बघच. आधी सांगितलं तर तू
येणारच नाहीस..<br />हे असं म्हटल्यामुळे उत्कंठा भलतीच ताणलेली.<br />बोस्फोरस
या जगातल्या अतिरम्य म्हणता येईल अशा परिसरातल्या एका रेस्तराँमध्ये भेट
ठरली. जागा अप्रतिम. पाण्याला समांतर अशी रेस्तराँची जमीन. प्रत्येक
खिडकीतनं बाहेरचं पाणी दिसेल अशी व्यवस्था. संध्याकाळ उतरत होती. सीगल
पक्ष्यांचे थवे शरीर अलगद पाण्यावर सोडून लाटेप्रमाणे वरखाली होत होते. आत
टेबलाटेबलांवर काचेच्या पात्रांत मेणबत्या लावायला सुरुवात झाली होती.
बाहेर पाण्यावर त्या मेणबत्त्यांच्या पिवळलाल प्रकाशाची प्रतिबिंबं पडत
होती. आकाशातही तशाच रंगांचा प्रकाश. तिथून वितळून तो थेट असा समोर टेबलावर
आल्यासारखा वाटावा. पण यातली मजा घेता येत नव्हती. कारण कोण येणार आहे
भेटायला हे अजून कळत नव्हतं. दरम्यान, काचेच्या चिमुकल्या कपातनं दोनतीन
वेळा त्याच मेणबत्तीच्या प्रकाशरंगाचा चहा येऊन गेला.<br />तर थोडय़ा वेळानं
तो आला. तोपर्यंत बाहेर अंधार अधिकच गडद झालेला. रम्यता धूसरतेकडे
झुकलेली.. आणि धिप्पाड अशा सुरक्षा रक्षकांच्या गराडय़ात तो आला. ते सुरक्षा
रक्षक कुपोषित वाटावेत असा त्याचा देह. महाकाय. हनुवटी संपल्यावर लगेच
बाहेर आलेली छातीच. देहाचा परीघ इतका की चालताना हात अर्धवर्तुळाकार
फिरायचे आणि त्या टप्प्यात जे काही येईल त्याचा कपाळमोक्षच होईल असं
वाटायचं. तो आलेला पाहिल्यावर माझा यजमान म्हणाला, आत चल. आता आम्ही एका
खोलीत गेलो. माझ्या यजमानानं ओळख करून देताना हा अधिक जवळून पाहता आला.
गोरागोरापान. शुद्ध वर्तुळाकार चेहरा. दाढी. अगदी भूमितीय पद्धतीनं
कोरलेली. बसला. ओळख सांगितल्यावर मी थिजलोच. रशियातल्या चेचेन बंडखोरांचा
तो नेता होता. यजमानानं सांगितलं : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन
यांच्या विरोधात जे काही बंड सुरू आहे, त्याचं नेतृत्व हा करतोय.. पुतिन
आणि केजीबी याच्या मागावर आहे. हे ऐकल्यावर मी सहज इकडेतिकडे बघितलं. कोणी
आपल्या टेबलाकडे नजर ठेवून आहे का वगैरे.. त्याला इंग्रजी येत नव्हतं. आणि
बोलायची फारशी इच्छाही दिसली नाही त्याची. काहीतरी पुटपुटत होता. ते माझ्या
यजमानाला कळायचं. दोघांचे चेहरे आपले मी पाहत होतो. संभाषण असं काही
नव्हतंच. एक नाव मात्र बोलताना दोनेकदा आलं. लिटविनेन्को. अध्र्या-पाऊण
तासानं तो गेला. आम्ही जेवलो. येताना मी यजमानाला विचारत होतो त्या
लिटविनेन्को नावाबद्दल. तो म्हणाला, तो केजीबीत होता.. आता पुतिनविरोधी
उचापती करतोय. आता आला होता त्याचा मित्र आहे वगैरे. त्याच्याविषयी आणि या
चेचेनविषयी बरंच काही चमचमीत कानावर आलं.<br />दुसऱ्या दिवशी माझं भल्या
सकाळचं विमान होतं. मुंबईत घरी पोहोचल्यावर सवयीनं टीव्हीवर बीबीसी लावलं
तर बातमी सुरू होती अलेक्झांडर लिटविनेन्को याच्या लंडनच्या रुग्णालयात
झालेल्या गूढ मृत्यूची. मी गारच झालो. नाव कोणी घेत नव्हतं उघडपणे. पण
त्याच्या मृत्यूमागे अध्यक्ष पुतिन यांचा हात होता असं सूचित केलं जात
होतं. पुढे त्याचे अनेक तपशील आले.<br />पुतिन हे एक विषय म्हणून तेव्हा
डोक्यात घुसले ते घुसलेच. पुतिन केजीबीत होते. त्यांच्याविषयी बरंच काही
वाचायला मिळत गेलं. पुढे नाटो फौजांनी जॉर्जियावर केलेला हल्ला, तेलावर
लिहीत असताना भेटलेली रशियाची युकोस ही बलाढय़ कंपनी, गाझप्राम आणि तो
वादग्रस्त मिखाईल खोडोर्कोव्हस्की.. अशा सगळय़ातून रशिया आणि पुतिन ही रसाळ
कहाणी तयार होत गेली. जेवढं जेवढं अधिक वाचायला मिळालं पुतिन यांच्याविषयी
तेवढा तेवढा हा माणूस अधिकच वाचनीय होत गेला. त्यात सगळय़ात जास्त अशी
आनंददायी भर घातली अत्यंत ताज्या पुस्तकानं.<br />‘द मॅन विदाउट अ फेस : द
अनलाइक्ली राइज ऑफ व्लादिमीर पुतिन’ हे अगदी ताजं पुस्तक. एका मित्रानं
कळवलं आवर्जून वाचच. म्हणून लगेच मिळवलं आणि मित्राच्या शिफारशीवरचा
विश्वास अधिकच दृढ झाला.<br />लेनिनग्राडला अगदी कनिष्ठ मध्यमवर्गीय- खरंतर
गरीबच म्हणता येईल अशा कामगारी घरात व्लादिमीर याचा जन्म. अभ्यासात हुशार
वगैरे अजिबातच नाही. अत्यंत वांड म्हणता येईल असाच स्वभाव. मारामारी करणं
हा छंद. लेखिका माशा गेसन हिनं पुतिन यांचे शाळासोबती वगैरे शोधून काढले.
त्यांना भेटली. ते जिथं राहत होते तेव्हाच्या शेजाऱ्यांना तिनं हुडकून
काढलं. त्यांच्या व्लादिमीरच्या लहानपणीच्या आठवणी नोंदवल्या. सगळय़ांतून
पुढे आली ती एकच बाब. मारामाऱ्या करणारा व्लादिमीर. अनेकांनी त्याच्या
मारामाऱ्यांच्या कौशल्याच्या आठवणी रंगवल्यात. अगदी हिंदी चित्रपटात
शोभाव्यात अशा त्या आहेत. मुळातूनच वाचायला हव्यात त्या. त्यातूनच रशियन
प्रकार सँबो आणि नंतर ज्युदो यात व्लादिमीर पारंगत झाला. कळायला
लागल्यापासून एकच ध्यास होता त्याचा. तो म्हणजे, केजीबीत नोकरी करायची.
केजीबीत लागलो रे लागलो की आपल्याला काही विशेषाधिकार मिळतात आणि जेम्स
बाँडसारखंच आपण करू शकतो, असा काहीसा त्याचा समज होता. पुढे तो लागलाही
केजीबीत. पहिली नेमणूक झाली ती ड्रेस्डेन इथं. हे झेक सीमारेषेवरचं गाव.
त्या वेळी पूर्व जर्मनीत होतं, आणि पूर्व जर्मनी हा तेव्हाच्या सोविएत गटात
होता. म्हणजे ही नेमणूक तशी काही शत्रुराष्ट्रातली नव्हती. त्यापेक्षा
अमेरिकेच्या गटातल्या पश्चिम जर्मनीत त्याची नेमणूक झाली असती तर जास्त
रोमांचक काम करायला मिळालं असतं. ड्रेस्डेनमध्ये काही नव्हतं. नुसतं
उद्योगांचा, वर्तमानपत्रातल्या बातम्यांचा अहवाल मॉस्कोला पाठवायचा. इतकंच
काय ते काम. पण तरुण व्लादिमीर केजीबीच्या प्रेमापोटी तेही करत राहिला.
त्यातल्या त्यात उत्साहजनक एवढंच की व्लादिमीर तिकडे असतानाच पूर्व आणि प.
जर्मनी यांना विभागणारी बर्लिनची भिंत कोसळली आणि या दोन्ही देशांच्या
एकत्रीकरणाची- आणि अर्थातच शीतयुद्धाच्या शेवटच्या पर्वाची- सुरुवात झाली. <br />तिथून
पुढे व्लादिमीरची नेमणूक झाली ती परत रशियात. लेनिनग्राडला. तिथल्या
विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांवर हेरगिरी करण्याचं काम त्याच्याकडे
होतं. त्याच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं ते इथेच. या विद्यापीठात त्याची
गाठ पडली ती अनातोली सोब्चाक यांच्याशी. लेनिनग्राडचे महापौर होते ते.
एव्हाना ९१ साल उजाडलं होतं. केजीबीनं अध्यक्ष मिखाइल गोर्बाचोव
यांच्याविरोधात कधीच हालचाली सुरू केल्या होत्या. त्यातला मोठा उठाव म्हणता
येईल असा प्रयत्न त्या वर्षी घडला. हा क्षण व्लादिमीरनं साधला आणि थेट
राजीनामाच देऊन टाकला केजीबीचा. त्याला आता राजकारण खुणावू लागलं होतं.
सोब्चाक यांच्या कार्यालयात त्यानं सल्लागार म्हणून स्वत:ची वर्णी लावून
घेतली. पहिला म्हणता येईल असा मोठा भ्रष्टाचार व्लादिमीर यांच्या नावावर
इथेच घडला. लेनिनग्राडमधील उद्योगाचा भाग म्हणून जर्मनीशी कच्चा माल
पुरवण्याचा करार त्यांनी केला. त्या बदल्यात लेनिनग्राडला धान्यसाठा दिला
जाणार होता. त्यानुसार लेनिनग्राडमधून कच्चा माल गेला परदेशात. पण त्या
बदल्यात आलं मात्र काहीच नाही. नऊ कोटी ३० लाख डॉलर्सचा हा सगळा व्यवहार
होता. ही सगळी रक्कम पुतिन यांनीच घशात घातल्याचा संशय आहे. त्या संदर्भात
त्यांची चौकशीही झाली होती. पुढच्या आयुष्यात अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे आहोत
असा दावा पुतिन यांच्याकडून केला गेला. पण गेसन हिनं धारिष्टय़ दाखवत पुतिन
म्हणतात तसे स्वच्छ नाहीत. असं पुस्तकात सोदाहरण दाखवून दिलंय. ‘धारिष्टय़
दाखवत’ असं एवढय़ासाठी म्हणायचं की पुतिन यांना विरोध करणारे अनेक पत्रकार
अचानक गायब झाल्याचा इतिहास ताजा आहे. अगदी इंग्लंडमध्ये राहून पुतिनविरोधी
लिहिणारेही अचानक दिसेनासे झाल्याच्या नोंदी आहेत.<br />तेव्हा अशा कराल
राजकारण्याविषयी इतकं तपशीलवार लिहिणं असं अवघडच. आणि त्यात मॉस्कोत राहून
हे सगळं करणं अधिकच अवघड. गेसन हिनं हे शिवधनुष्य लीलया पेललं आहे.
गोर्बाचोव यांच्यानंतर रशियाचं नेतृत्व करणारे बोरिस येल्तसिन आजारी असताना
त्यांच्या निकटवर्तीयांना त्यांच्याच कार्यालयात असलेले व्लादिमीर पुतिन
अध्यक्षपदासाठी योग्य वाटले. त्यांना वाटलं या माणसाला नेमून सूत्रं
आपल्याकडेच ठेवता येतील.<br />अर्थातच त्यांचा हा अंदाज पुतिन यांनी खोटा
ठरवला. सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत गूढ म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या पुतिन यांच्याविषयीचं हे पुस्तक जगाच्या राजकारणावर प्रेम
असणाऱ्यांसाठी आवश्यक वाचनच ठरेल. ते महत्त्वाचं अशा अर्थाने की रशिया
म्हटलं की आपल्याकडे स्मरणरंजनात रंगणारा एक मोठा लेखकवर्ग आहे. स्टालिन,
ट्रॉटस्की वगैरेंच्या पुढे काही हा विचारवंतांचा वगैरे वर्ग गेलेला नाही.
त्यामुळे विद्यमान रशियाचं प्रतिबिंब आपल्याकडे माध्यमांत दिसतच नाही.
तेव्हा त्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचं.<br />पण आतापर्यंतचा रशियाचा इतिहास
हा पक्षीय अभिनिवेशाला दूर ठेवत समजून घ्यायचा असेल तर आणखी एक पुस्तक
नुसतं वाचनीयच नाही तर संग्रहणीयदेखील आहे, ते म्हणजे ‘द पेंग्विन हिस्टरी
ऑफ मॉडर्न रशिया : फ्रॉम झारीझम टू द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’. क्रांती,
नागरी उठाव, दहशतवाद ते आताची अवस्था अशा अनेक टप्प्यांवर रशिया समोर येत
असतो. त्याची क्रमवार आणि तपशीलवार मांडणी लेखक रॉबर्ट सव्र्हिस यांनी या
पुस्तकात अत्यंत उत्तमपणे केली आहे. रशियाचा राजकीय इतिहास देता देता या
देशाच्या आर्थिक अवस्थेवर ते उत्तम भाष्य करतात आणि तो देश समजून घ्यायला
त्यामुळे मदतच होते.<br />आता मे महिन्यात पुतिन पुन्हा सत्तेवर आलेत.
त्यांना सत्तेवर आणणाऱ्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुका बनावट होत्या अशी
नागरिकांची धारणा आहे. पण पुतिन यांना पर्वा नाही. अमेरिकेच्या डॉलरचं
स्थान हिरावून रुबल्सला जगाचं चलन बनवण्याचं अशक्यप्राय असं स्वप्न ते
बघतायेत.<br />..आणि त्याच वेळी गेले काही महिने रशियात मोठय़ा प्रमाणावर
पुतिन यांच्याविरोधात निदर्शने सुरू आहेत. अनेकांचं म्हणणं आहे की, पुतिन
यांना राज्य करणं आता अवघड जाईल. त्या देशातनं पूर्ण आणि खरी माहिती मिळत
नाही. अजूनही तिथला पोलादी पडदा पूर्णपणे हटलेला नाही. अशा वेळी त्या
पडद्यामागचा खुनशी सूत्रधार आहे तरी कसा, हे जाणून घ्यायला या पुस्तकांमुळे
मदतच होईल.</span><br />
<br />
-<span style="font-size: large;">गिरीश कुबेर </span>,लोकसत्ता<br />
girish.kuber@expressindia.com<br />
<br />
<br />
<ol>
<li><b>
<span style="font-size: x-small;"><span style="font-family: Arial,Helvetica,sans-serif;">The Man without a Face: The Unlikely Rise of Vladimir Putin</span></span></b> by
Masha Gessen</li>
<li><h1 class="title">
<span style="font-family: Arial,Helvetica,sans-serif;"><span style="font-size: x-small;"><span style="font-weight: normal;"><b>The Penguin History of Modern Russia</b><span style="font-size: x-small;"> b</span>y Robert Service
</span></span></span></h1>
</li>
</ol>
</div>
Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-57669174308473765072012-08-25T02:20:00.000-07:002012-08-25T05:26:34.486-07:00जनाचे अनुभव पुसतां (मिलिंद बोकील)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjan8nfPuK0F2x7RSIQ8aRkH7zHXyCkXWArLAFHuQLh8lL91eBy5cwtbdHppPQTB46IAr0kHEKhhE_r22_-8fYh_V6H-06t2n0Umlz1iPsWFSS7K_bRcxnZTLQvYuxOg6670K-6z7yVkqQ9/s1600/vdr08.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjan8nfPuK0F2x7RSIQ8aRkH7zHXyCkXWArLAFHuQLh8lL91eBy5cwtbdHppPQTB46IAr0kHEKhhE_r22_-8fYh_V6H-06t2n0Umlz1iPsWFSS7K_bRcxnZTLQvYuxOg6670K-6z7yVkqQ9/s1600/vdr08.jpg" /></a></div>
<span style="font-size: large;">माणूस आणि त्याच्या भोवतीची नैसर्गिक संपत्ती यांच्यातील देवाण-घेवाण तसेच, ही संपत्ती कशासाठी वापरली जाते आणि त्यात अचानक बदल झाला तर नेमके काय परिणाम होतात, एखादी समाजरचनाच उन्मळून पडते की, समाजातील एखादा घटक शिरजोर बनतो की दोन्ही घडते.. या सगळ्यांचा मागोवा या पुस्तकात घेतला गेला आहे.<br />
यात एकूण सहा लेख आहेत. प्रत्येक लेख लिहिताना मिलिंद बोकील यांनी त्या-त्या भागात जाऊन भरपूर संशोधन केलं. प्रत्येक विषयाचा अतिशय गंभीरपणे, सूक्ष्मपणे अभ्यास केला आहे. हे सर्वच लेख दीर्घ असूनही कुठेही कंटाळवाणे अजिबात वाटत नाही. उलट प्रत्येक लेख म्हणजे एक उत्तम कथानकच बनलेलं आहे.<br />
प्रत्येक विषयाच्या अगदी मुळाशी जाऊन त्याची उकल करणं हे मिलिंद बोकील यांचं लेखन वैशिष्टय़ आपल्याला ‘एकम्’ आणि ‘समुद्र’मध्येही बघायला मिळतं.<br />
सबंध भारतात असे एकही अभयारण्य नसेल जेथे माणसे पूर्वीपासून राहत नव्हती. अभयारण्यामध्ये जंगलातील प्राण्यांना आणि वनस्पतींना संरक्षण मिळालं आहे पण, त्यात राहणाऱ्या माणसांचा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. ‘प्राण्यांना अभय, माणसांना वनवास’ या लेखात मिलिंद बोकील यांनी या प्रश्नावर प्रकाश टाकला आहे. त्यासाठी त्यांनी कोयना अभयारण्यातील डिचोली गावाचा अभ्यास केला.<br />
कोयना अभयारण्य म्हणून जसं जाहीर झालं तसं, डिचोली आणि इतर गावातल्या लोकांना त्याची झळ जाणवू लागली. फॉरेस्ट खात्याच्या संरक्षणामुळे जंगल वाढायला लागले. जंगलतोड जवळपास बंदच झाली. तसेच जास्त पावसाचा प्रदेश असल्याने जंगलाची वाढ झपाटय़ाने होऊ लागली. जंगलापासून दूर असलेली गावं जंगलाजवळ आली. त्यामुळे अभय मिळालेल्या वन्यप्राण्यांचा गावकऱ्यांना त्रास होऊ लागला. कळंब नावाचे गवत गावकरी छपरासाठी वापरत. ते जंगलातील रानगव्यांनी हुंदाडून नष्ट केले. ही नासाडी इतकी जास्त की त्या गवताचे पुनरुत्पादनच बंद झाले. लोकांच्या घराचे छप्परच नाहीसे झाले. अभय मिळाल्यानं डुकरांची संख्या बेसुमार वाढू लागली. ही डुकरं संपूर्ण शेतं उध्वस्त करू लागली. इतर हिस्र प्राण्यांचा त्रास होऊ लागला तो वेगळाच.<br />
कोयना धरणाची वीज वापरून बाकीचा महाराष्ट्र समृद्ध झाला पण, ज्यांची घरेदारे त्यामध्ये बुडाली त्या सर्वाना अजूनही पूर्णपणे न्याय मिळाला नाही.<br />
‘भूमिकन्यांचे भालप्रदेश’ या लेखात लातूरच्या भूकंपानंतर ज्या स्त्रिया विधवा झाल्या, त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या शेतजमिनी मिळून त्या शेतकरी झाल्या. जमीन कसत असताना स्त्री म्हणून आणि त्यात विधवा म्हणून येणाऱ्या अडचणी, त्यांचे समाजातले स्थान, त्यांना मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था याबद्दल विस्तृत माहिती सांगितली आहे.<br />
भूकंपामुळे विधुर झालेल्या अनेक पुरुषांनी पुनर्विवाह केलेत. अनाथ मुलांना जवळचे नातेवाईक आणि स्वयंसेवी संस्था यांचा आधार मिळाला. एकटय़ा पडल्या त्या या विधवा स्त्रिया पण, न घाबरता, हिमतीनं या स्त्रिया शेतीची सर्व कामं शिकल्या आणि स्वबळावर शेती करू लागल्या. बोकील लिहितात, ‘रामायणातल्या भूमिकन्या सीतेने पुरुषप्रधान व्यवस्था असय्य झाली म्हणून भूमातेची प्रार्थना केली आणि भूमातेने तिला पोटात घेऊन मुक्त केले. विसाव्या शतकाच्या अखेरीस भूमातेने बाकी सर्व पोटात घेतले पण, भूमिकन्यांना मात्र जिवंत ठेवले, नांगरांच्या फाळाने त्यांनी मुक्तीचा नवीन मार्ग शोधावा म्हणून.’<br />
‘किनाऱ्यावरचा कल्पवृक्ष’ या लेखात डहाणू तालुक्यातील बोर्डी गावच्या परिसरात चिक्कूच्या झाडाच्या लागवडीमुळे लहान आदिवासी शेतकऱ्यांतही कशी आर्थिक क्रांती घडून आलेली आहे याबद्दल समजते. यात चिक्कूच्या फळाचा इतिहास, त्याची लागवड, त्याचे गुणधर्म आणि या लागवडीमुळे आदिवासींचे झालेले सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिवर्तन तसेच या क्रांतीमागचे प्रवर्तक डॉ. जयंत पाटील यांचे कार्य, याबद्दल परिपूर्ण माहिती यात मिळते. मिलिंद बोकील लिहितात, ‘बोर्डीच्या किनाऱ्यावर जो कल्पवृक्ष उभा आहे तो म्हणजे चिक्कूचे झाड नाही. त्या झाडापेक्षा विशाल, त्यापेक्षा दणकट आणि त्यापेक्षा कनवाळू असा तो समाजसेवेचा वृक्ष आहे. त्या वृक्षाची जोपासना अनेक ज्ञात आणि अज्ञात कार्यकर्त्यांनी आपला घाम, अश्रू आणि प्रसंगी रक्त शिंपून केली आहे.’<br />
‘भरती आणि ओहोटी’ या लेखात एका मोठय़ा औद्योगिक कारखान्यामुळे (लक्ष्मी मित्तल यांचा इस्पात इंडस्ट्रीज लि.) पर्यावरणाचा कसा विनाश घडला आणि हातावर पोट असणाऱ्या मच्छीमारांचे आयुष्य कसे उध्वस्त होत गेले ते दिले आहे.<br />
मोठय़ा औद्योगिक कंपन्या, त्यांच्याशी हातमिळवणी करणारे भ्रष्ट राजकारणी हे एका बाजूला आणि अशिक्षित, असंघटित, उपेक्षित अल्पसंख्य लोकं दुसऱ्या बाजूला यांच्यातील संघर्ष विस्ताराने दिला आहे. एक गट कमकुवत तर एक गब्बर यांच्यातही संघर्ष होऊ शकतो. कारण या अशिक्षित लोकांना शिवकरांसारखा ध्येयनिष्ठ आणि लढाऊ नेता मिळतो.<br />
बोकील म्हणतात, अशाप्रकारच्या संकटाला विरोध करणे हे सोपे काम नाही. कारण असे प्रकल्प हे ‘मागास भागाचा विकास’ या चंदेरी वेष्टनात गुंडाळून आणलेले असतात. यात नक्की फायदा कोणता आणि तोटा कोणता, हेच स्पष्टपणे समजत नाही. औद्योगिक क्रांती ही देशाच्या विकासासाठी नक्कीच चांगली पण, त्यामुळे याच देशातील एखादा समाज उध्वस्त होऊन कसे चालेल? विकास ज्या सृष्टीच्या आधारे करायचा, ती सृष्टी सजीव, समृद्ध आणि संवर्धनशील असणं गरजेचं आहे.<br />
शेवटी मिलिंद बोकील म्हणतात, ‘समुद्र आणि खाडय़ांना भरती-ओहोटी रोजच येत असते. भरतीनंतर ओहोटी आणि मग पुन्हा भरती हे चक्र चालूच असते. मानवी समाजाने मात्र स्वत:ला या चक्रात बांधून घ्यायचे की नाही, ते ठरवणे गरजेचे आहे. नाही तर काही जणांना भरती येईल तेव्हा इतरांना ओहोटी लागेल. ज्यांना भरती येईल त्यांचे जगणे वैभवसंपन्न होईल पण, ओहोटी लागलेले मात्र दरिद्री होऊन जातील. भरती आणि ओहोटीच्या या चक्रात गुंतून पडायचे की कधीतरी त्याचा भेद करून स्वस्थ, समृद्ध आणि संतुलित समाजाचे स्वप्न बघायचे, हा आपल्यासमोरचा खरा प्रश्न आहे.’ </span><br />
<br />
<span style="font-size: large;">- </span><span style="font-size: small;"><b style="font-weight: normal;">सुहास खानझोडे,लोकसत्ता </b></span><br />
<span style="font-size: large;"> <br /> Book: जनाचे अनुभव पुसतां </span><br />
<span style="font-size: large;">Author: मिलिंद बोकील</span><span style="font-size: large;"> </span><br />
<span style="font-size: large;">Category: कथासंग्रह</span><br />
<span style="font-size: large;">Language: मराठी</span><br />
<span style="font-size: large;">Publication: मौज प्रकाशन -(पहिली आवृत्ती : २००२)</span><br />
<span style="font-size: large;">Price: १५० रुपये </span><br />
<br />
<span style="font-size: large;"> हे पुस्तक भारतात कोठेही घरपोच मागवण्यासाठी <a href="http://www.flipkart.com/janache-anubhav-pusata-2nd-8174865535/p/itmdyua3wnywbwgj?pid=9788174865533&affid=pdongareya" style="color: yellow;" target="_blank">येथे</a> टिचकी मारा.</span><br />
<br />
<span style="font-size: large;">[enotes: </span><span style="font-size: large;"><span style="font-family: Arial,Helvetica,sans-serif;">Milind Bokil (1960) is one of the important and frontline Marathi
writers today. He has brought in newer kinds of sensibilities to Marathi
literature by introducing different subjects and enlarging the scope of
human consciousness. His writing is imbued with a quest for meaning in
life and presents a finer understanding of personal emotions and social
relationships without sacrificing artistic dexterity. Bokil is a
sociologist by profession and has also written extensively about rural
and tribal communities as well as on development issues.</span>]</span><span style="font-size: large;"> </span> </div>
Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-43276527431761529472012-07-30T06:55:00.000-07:002012-08-24T07:01:04.526-07:00बळींच्या बळींची कहाणी (Holy Land,Unholy War)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiXX-HNtelAPfgZJmkWhsqucdyq6XxFlnUkHiqpODo-HavSPROf3ogX_Tb9mSnNm-Lyrb6BAj7zFgf1PLwL5I-__HdbOeaw3_O57xW7B8MkL4W9Ap4F9F8k3BSlhuaeFoBUAZFg9LUkrrgU/s1600/balichya+balinchi+kahani.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="145" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiXX-HNtelAPfgZJmkWhsqucdyq6XxFlnUkHiqpODo-HavSPROf3ogX_Tb9mSnNm-Lyrb6BAj7zFgf1PLwL5I-__HdbOeaw3_O57xW7B8MkL4W9Ap4F9F8k3BSlhuaeFoBUAZFg9LUkrrgU/s320/balichya+balinchi+kahani.jpg" width="320" /></a></div>
<span style="font-size: large;">इस्रायलची एकांगी स्तुती, त्या राष्ट्राच्या विजिगीषु वृत्तीचा उदोउदो,
यांमागे अनेकदा अहंकारी दर्पही असू शकतो. तो नसेल, तर ही दोन पुस्तकं
वाचायला हवीत. इस्रायलला आदर्श मानून त्याचा अभिमान बाळगण्याचं कारण नाही,</span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3xBtSEYTObvkL8zGD1-eJkA2SElRX8AyuANiUQaowPouHfQ6TgXkboB4hihiVabAIbwcF5MoVZH6hqBaGhyeIQJW7ljiZW6eSGAO9s_mc6_GO5gbefjQx_r99RclddfsdZMET2ltXIJDy/s1600/holy+land.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3xBtSEYTObvkL8zGD1-eJkA2SElRX8AyuANiUQaowPouHfQ6TgXkboB4hihiVabAIbwcF5MoVZH6hqBaGhyeIQJW7ljiZW6eSGAO9s_mc6_GO5gbefjQx_r99RclddfsdZMET2ltXIJDy/s320/holy+land.jpg" width="207" /></a></div>
<span style="font-size: large;">
</span><span style="font-size: large;">हे सप्रमाण आणि साधार सांगतानाच पॅलेस्टिनी विरुद्ध इस्रायली या
लढाईच्या दोन्ही बाजू समतोलपणे मांडणारं ‘होली लँड, अनहोली वॉर’ हे पुस्तक
आणि दुसरं- पॅलेस्टिनींचे नेते अराफात यांच्यासह काम केलेल्या एका माजी
पॅलेस्टिनी राष्ट्रवादय़ानं लिहिलेलं पुस्तक! तडजोडवादी राजकारण आणि बळींनी
पुन्हा छळवादी होणं म्हणजे काय, याचा पक्का अदमास ही पुस्तकं देतात..<br /><br />मोहम्मद
यासर अब्दुल रहमान अब्दुल राउफ अराफात अल कदा अल हुसैनी.. इतक्या अगडबंब
नावानं सहसा आपल्याला काही संदर्भ लागणार नाही. पण यासर अराफात म्हटलं की
बऱ्याच गोष्टी लख्खकन दिसू लागतात. या शतकातल्या रंगीबेरंगी व्यक्तींची
यादी करायची म्हटलं तर या माणसाचा क्रमांक नक्कीच पहिल्या पाचांत लागेल.
माणूस आयुष्यभर पॅलेस्टिनींसाठी जगला. पॅलेस्टाइन या देशाची स्वतंत्र भूमी
पाहावी, हे त्याचं आयुष्यभराचं ध्येय होतं. ते साध्य करण्यासाठी त्यांनी
वाटेल त्या मार्गाचा अवलंब केला. फताह ही दहशतवादी संघटना काढली. तिच्या
मार्फत वाटेल ते उद्योग केले. ते करताना अमाप पैसा मिळवला. ज्यांच्यासाठी
ते लढत होते.. निदान तसा आभास निर्माण करीत होते.. ते पॅलेस्टिनी
भणंगासारखं, निर्वासितांचं आयुष्य जगत असताना अराफात यांची जीवनशैली
एखाद्या o्रीमंत राष्ट्रप्रमुखालादेखील लाजवेल अशी होती. यांची पत्नी
पॅरिसला अतिश्रीमंती आयुष्य जगत होती. तिला पैसा अराफात यांच्या संघटनेकडनं
जात होता. या संघटनेकडे कुठून यायचा पैसा? अनेक इस्लामी देशांकडून. असो.
मुद्दा अर्थातच त्यांच्याकडच्या पैशाचा नाही. तो काय तमिळ वाघांचा प्रमुख
प्रभाकरन याच्याकडेही होता. जगात कोणीही कोणाविरुद्ध काही तरी करतंय
म्हटल्यावर कोणी ना कोणी तरी मदत करणारा असतोच. त्यात एखाद्या देशाविरोधात
काही होतंय म्हटल्यावर त्या देशाविरोधात असणारे त्या कथित बंडखोराच्या मागे
उभे राहतातच.<br />पण गमतीचा भाग म्हणजे या सगळय़ाचा तपशील माहीत नसलेले
जनसामान्य हा विरुद्ध तो या भूमिकेतूनच आसपासच्या घटनांकडे पाहत असतात.
त्यात या ‘हा विरुद्ध तो’ला धर्माचा स्पर्श झाला की, पाहायलाच नको. मग तर
समीकरण अगदीच सोपं होऊन जातं. त्यामुळे यहुदी धर्मीयांचा इस्रायल आणि
अरब-पॅलेस्टिनींची संघटना यांच्यात बारा महिने चौदा काळ हाडवैर असणार, असं
आपलं मत बनून जातं. वरकरणी ते बरोबरही असतं म्हणा. परंतु बऱ्याचदा हे
विरुद्ध वाटणारे तसे आतून एकमेकांच्या हिताचंच काम करीत असतात, हे आपल्याला
माहीत नसतं. उदाहरणार्थ इस्लामधर्मीय इराण आणि यहुदी इस्रायल हे
जनसामान्यांच्या समजाप्रमाणे एकमेकांचे कट्टर वैरीच असायला हवेत. पण अगदी
अलीकडेपर्यंत इस्रायल हा कडवे म्हणून ओळखले जाणाऱ्या अयातोल्ला खोमेनी
यांच्या इराणचा शस्त्रास्त्र पुरवठादार होता, हे आपल्याला माहीतच नसतं.
किंवा या अराफात यांनीसुद्धा अनेकदा पडद्यामागून इस्रायली नेतृत्वाशी
हातमिळवणी केली असू शकेल, हे आपल्या गावीही नसतं. पॅलेस्टिनींसाठी लढणारी
आणखी एक संघटना होती हमास. अहमद यासीन या गूढ गृहस्थानं ती स्थापन केली
होती. हा अराफात यांच्यापेक्षा कडवा होता. इस्रायलचं अस्तित्व नकाशावरनं
पुसायलाच हवं, असं म्हणायचा. त्याला एका भल्या सकाळी इस्रायली फौजांनी
क्षेपणास्त्रानं टिपलं. तर अराफात यांच्या फताह या संघटनेचा वापर बऱ्याचदा
इस्रायलीवादी शक्तींनी- म्हणजे अर्थातच अमेरिका वगैरेंनी- अहमद यासीन
यांच्या हमासविरोधात सोयीस्करपणे केला. अराफात यांनी तो करूही दिला.
त्याचमुळे तर अमाप दहशतवादी कृत्यं करूनही शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक
मिळवण्याची किमया अराफात यांना साधता आली. राजकारणात आजचा दहशतवादी उद्याचा
शांततावादी असा ठरतो.<br />तर या अराफात यांचा सहकारी होता अबू शरीफ नावाचा.
याचं ‘अराफात अँड द ड्रीम ऑफ पॅलेस्टाइन’ अशा नावाचं एक पुस्तक आहे. हा
अबू स्वत: कडवा दहशतवादी म्हणून विख्यात- किंवा कुख्यातही- होता. फताह या
अराफात यांच्या संघटनेच्या आधीही पॅलेस्टिनींच्या प्रश्नावर काम करणाऱ्या
अनेक संघटना होत्या. पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइन या नावाची
त्यातली सगळय़ात मोठी. अबू शरीफ तिच्यासाठी काम करायचा. विमान अपहरणं वगैरे
दहशतवादी कृत्य त्याच्या डाव्या हाताचा मळ होती. एकेकाळी टाइम
साप्ताहिकानं दहशतवादाचा चेहरा असं त्याचं वर्णन केलं होतं, इतका तो कडवा
होता. तो इतका उपद्रवी होता की एकदा मोसाद या इस्रायली गुप्तहेर संघटनेनं
त्याच्याकडे पुस्तक पाठवलं. ‘द मेमॉयर्स ऑफ चे गवेरा’ नावाचं. चे हा
रोमँटिक बंडखोर अनेकांचा प्रेरणास्थान होता. तर अबूनं हे पुस्तक उघडलं आणि
ढम्कन त्यातला बाँब फुटला. अबूचा एक डोळा, एक कान आणि चार बोटं त्यात
उडाली. पुढे त्याला उपरती झाली असावी आणि तो पॅलेस्टिनी प्रश्न दहशतवादानं
सुटणार नाही असं म्हणायला लागला. इजिप्तचे त्या वेळचे अध्यक्ष होस्नी
मुबारक वगैरेंशी तो चर्चा करायला लागला. त्याच्या संघटनेला हे काही आवडलं
नाही. बऱ्याचशा दहशतवादी संघटना वा चळवळी एकदा स्थिरस्थावर झाल्या की
खंडणीखोरी करायला लागतात. त्यांचा चेहरा दहशतवादाचा असतो. पण उद्दिष्ट कधीच
मागे पडलेलं असतं. नंतर नंतर अशा संघटनांचं पोट दहशतवादावरच अवलंबून असतं.
याही संघटनेचं तसं होतं. त्यामुळे अबूनं जरा काही वेगळा सूर काढला म्हणून
संघटनेचे पदाधिकारी त्याच्यावर चिडले. त्याला काढूनच टाकलं त्यांनी. मग हा
आला यासर अराफात यांच्याकडे. अराफात यांच्या बऱ्याच उद्योगांचा हा
साक्षीदार. त्यामुळे त्याच्या पुस्तकात एक मजा आहे. म्हणजे दहशतवादीही आपली
कृत्यं कशी उदात्ततेच्या मुलाम्यातून सांगू शकतो. हे त्यातून समजतं.
अराफात यांनी १९६७ साली गुप्तपणे जेरुसलेमला भेट दिली होती. इस्रायली
नेत्यांशी चर्चा करण्यासाठी. खरं तर हे महामोठं अब्रह्मण्यम त्यांच्या
हातून घडलं. तर तिकडे जाताना ते कोणत्या मार्गानं कसे चोरून गेले, वाटेत
कोणत्या डोंगराच्या गुहेत राहिले.. वगैरे अनेक मनोरंजक मसालेदार चिजा या
पुस्तकात जागोजागी आढळतात. पुढे लिबियाच्या वाटेवर असताना वाळूच्या वादळात
यासर अराफात यांचं विमान सापडलं आणि भरकटून कोसळलं. अनेकांना वाटलं
त्यांच्या जिवाचं काही बरंवाईट झालं. पण अराफात त्यातून वाचले. विमानाचे
तीन तुकडे झाले होते आणि वैमानिक आणि त्याचा साथीदार जागच्या जागीच गेले
होते. <br />पॅलेस्टिनींच्या प्रश्नाचं काय झालं हे या पुस्तकातून कळणार
नाही. पण त्या प्रश्नासाठी लढणाऱ्यांचं काय झालं, अगदी २००४ सालच्या
त्यांच्या निधनापर्यंत.. हे सगळं वाचायला यात नक्की मिळतं. पण मुळात हा
पॅलेस्टिनींचा प्रश्न नक्की काय आहे हे तटस्थपणे समजून घ्यायचं असेल तर
अंतोन ला गार्डिया यांचं ‘होली लँड, अनहोली वॉर’ हे पुस्तक वाचणं उत्तम.
इस्रायलची भूमी पवित्र मानली जाते. अगदी बायबलमध्ये त्याचा संदर्भ आढळतो..
जॉर्डन नदीच्या काठावर जगातील समस्त यहुदींची स्वप्नभूमी कशी आकाराला येणार
आहे. असा दृष्टान्त दिला गेलाय. या सगळय़ा नवदेशाच्या जन्माची भव्य कहाणी
सांगणारी लिऑन उरिसची अजरामर ‘एक्झोडस’ खूप आधी वाचली होती. पुढे या सगळय़ा
राजकारणावर, त्यातलं धर्माच्या नावाने होणाऱ्या हिंसाचाराचं ‘अधर्मयुद्ध’
लिहीत असताना एका परदेशी पत्रकार मित्रानं ‘होली लँड..’ वाचायचा सल्ला
दिला. अत्यंत योग्य ठरला तो.<br /> याचं कारण असं की पॅलेस्टाइन आणि ज्यू
प्रश्नावर लिहिलेली पुस्तकं अभिनिवेशी आहेत. या किंवा त्या बाजूची. त्या
विषयावरील उत्तम तटस्थ पुस्तकाचा शोध त्यामुळे ‘होली लँड..’पाशी येऊन
थांबतो. अंतोन लंडनच्या टेलिग्राफचा इस्रायलमधला वार्ताहर होता. त्या
अधिकारातून अनेक ठिकाणी त्याला जाता आलं. पाश्चात्त्य देशांतल्या
पत्रकारांना हा एक फायदा असतो. अन्यथा इस्रायलमधे राहून रमल्ला इथं
पॅलेस्टिनींशीही संपर्क ठेवायचा.. अशी दुहेरी जगण्याची सोय अन्य देशांतल्या
वार्ताहरांना नसते. पण ती अंतोनला असल्यामुळे त्याला अनेकांच्या मुलाखती
घेता आल्या, अनेकांच्या कूळकथा मांडता आल्या आणि इतिहासाकडे निकोप
वर्तमानाच्या नजरेतून पाहता आलं.<br /> त्यातून तयार झालं.. होली लँड. त्यानं
त्यात काही मूलभूत प्रश्न मांडलेत. १९४८ साली हा देश जन्माला येत असताना
बेन गुरियन वगैरे मंडळींनी सर्व जगातील ज्यूंना पॅलेस्टिन नदीच्या
खोऱ्याकडे मार्गक्रमणा करायला सांगितलं आणि बघता बघता अरबांच्या निवासावर
अतिक्रमणं सुरू झाली. या संदर्भातल्या दोन्ही बाजूंच्या कहाण्या ‘होली
लँड..’मध्ये आहेत. त्या मांडताना अंतोन जसा ज्यूंना अनेक प्रश्न विचारतो
तसाच पॅलेस्टिनींवर- विशेषत: त्यांच्या नेतृत्वावर- चांगलीच टीका करतो.
इस्रायलचा जन्म व्हावा म्हणून वर्षांनुर्वष राहत असलेल्या अरबांना कसं
हुसकावलं गेलं, याची कहाणी वाचताना अनेक प्रश्न पडतात. त्याहीपेक्षा
आपल्याकडे इस्रायलविषयी असलेले अनेक गोड भ्रम दूर व्हायला मदत होते. <br />ते
आवश्यक आहे. कारण इस्रायल आणि त्यांचा इतिहास विजिगीषु वगैरे म्हणतात ती
वृत्ती यावर आपल्याकडे छाती फुगवून ‘गर्व से कहो..’ पद्धतीनं बरंच काही
बोललं जातं. त्यातलं फसवेपण अधर्मयुद्धमध्ये मांडायला मिळालं. इथं ‘होली
लँड..’मध्ये त्याला भरपूर जागा मिळालीय. आणि महत्त्वाचं म्हणजे अंतोन
दोन्ही बाजूंविषयी तितकाच कठोर आहे. ज्यू हे दुसऱ्या महायुद्धात नाझींनी
केलेल्या अत्याचारांचे बळी आहेत, हे तर तो सोदाहरण सांगतोच; पण अरब हे
बळींचे बळी कसे आहेत, हेही तो उत्तमपणे समजावून सांगतो. तेव्हा पॅलेस्टिनी
प्रश्न आणि त्या प्रश्नांवर जगणारे यासर अराफात हे दोन्ही विषय ठसठशीतपणे
आपल्यासमोर उभे राहतात. <br /> विलासी जीवनशैलीत राहणाऱ्या यासर अराफात
यांच्या पत्नीनं गेल्या आठवडय़ातच आरोप केलाय.. अराफात मेले नाहीत, त्यांना
विषप्रयोगानं मारण्यात आलंय.. त्यामुळे, अराफात याचं दफन केलेलं कलेवर
उकरून काढलं गेलंय. विषप्रयोग झाला किंवा नाही, हे तपासण्यासाठी. त्या
निमित्तानं आता इतिहासाची मढीही उकरली जातील. तेव्हा हे नक्की काय प्रकरण
आहे, हे आपल्याला माहीत असावं!</span><br />
<br />
<span style="font-size: large;"><b>Holy Land, Unholy War: Israelis and Palestinians</b> by Anton La Guardia</span><br />
<span style="font-size: large;"> </span><br />
<span style="font-size: large;"><b>Arafat and the Dream of Palestine: An Insider's Account</b> by Bassam
Abu
Sharif</span><br />
<span style="font-size: large;"> </span><span style="font-size: large;"><b>-गिरीश कुबेर ,</b>लोकसत्तासाठी<br />
girish.kuber@expressindia.com</span><br />
<br />
<br />
<span style="font-size: large;">माझ्या माहितीप्रमाणे या दोन्ही पुस्तकांचा </span><span style="font-size: large;">मराठी अनुवाद अजून कोणी प्रकाशित केलेला नाही.</span><span style="font-size: large;">मराठी </span><span style="font-size: large;">अनुवाद प्रसिध्द झाल्यास कृपया वाचकांनी comment form मध्ये प्रकाशक,किंमत यांची माहिती द्यावी ही नम्र विनंती.</span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7XQokNI7n4Gnks7r0as5ln5XWo-BiPICWdwYm1oo7XwTeMl8hLVP47XW6_huvBGjzVie37NGI_rOj5UszaHBtLWl6XE5CVnzudf5wqbAah_91175gRBFmTS741UDLuZsSHCuxYxnB1xGq/s1600/arafat.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7XQokNI7n4Gnks7r0as5ln5XWo-BiPICWdwYm1oo7XwTeMl8hLVP47XW6_huvBGjzVie37NGI_rOj5UszaHBtLWl6XE5CVnzudf5wqbAah_91175gRBFmTS741UDLuZsSHCuxYxnB1xGq/s1600/arafat.jpeg" /></a></div>
<span style="font-size: large;"> </span><br />
<span style="font-size: large;"><b>(1)Arafat and the Dream of Palestine: An Insider's Account</b>
by Bassam
Abu
Sharif</span><span style="font-size: large;"> हे </span><span style="font-size: large;">इंग्रजीतील पुस्तक मोफत घरपोच मागवण्यासाठी कृपया <a href="http://www.flipkart.com/arafat-dream-palestine-0230608019/p/itmczyxte3pwnkan?pid=9780230608016&affid=pdongareya%22" target="_blank">येथे</a> क्लिक करा.</span><br />
<a href="http://www.flipkart.com/arafat-dream-palestine-0230608019/p/itmczyxte3pwnkan?pid=9780230608016&affid=pdongareya%22" target="_blank"><span style="font-size: large;">Buy Arafat and the Dream of Palestine: An Insider's Account from Flipkart</span></a><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3xBtSEYTObvkL8zGD1-eJkA2SElRX8AyuANiUQaowPouHfQ6TgXkboB4hihiVabAIbwcF5MoVZH6hqBaGhyeIQJW7ljiZW6eSGAO9s_mc6_GO5gbefjQx_r99RclddfsdZMET2ltXIJDy/s1600/holy+land.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3xBtSEYTObvkL8zGD1-eJkA2SElRX8AyuANiUQaowPouHfQ6TgXkboB4hihiVabAIbwcF5MoVZH6hqBaGhyeIQJW7ljiZW6eSGAO9s_mc6_GO5gbefjQx_r99RclddfsdZMET2ltXIJDy/s320/holy+land.jpg" width="207" /></a></div>
<br />
<span style="font-size: large;">(2) </span><span style="font-size: large;"><b>Holy Land, Unholy War: Israelis and Palestinians</b>
by Anton La Guardia </span><span style="font-size: large;">हे </span><span style="font-size: large;">इंग्रजीतील पुस्तक मोफत घरपोच
मागवण्यासाठी कृपया <a href="http://www.flipkart.com/holy-land-unholy-war-0141028017/p/itmczyrgndgaeg3b?pid=9780141028019&affid=pdongareya%22" target="_blank">येथे</a>
क्लिक करा.</span><br />
<a href="http://www.flipkart.com/holy-land-unholy-war-0141028017/p/itmczyrgndgaeg3b?pid=9780141028019&affid=pdongareya" target="_blank"><span style="font-size: large;">Buy Holy Land, Unholy War: Israelis and Palestinians from Flipkart</span></a><br />
<span style="font-size: large;">[This review is about the famous books-1) <b>Holy Land, Unholy War: Israelis and Palestinians</b> by Anton La
Guardia(2)<b>Arafat and the Dream of Palestine: An Insider's Account</b> by Bassam Abu
Sharif ]</span></div>
Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-57173292684925447022012-06-28T07:36:00.002-07:002012-06-28T07:54:00.163-07:00प्रश्नांचा सौदागर Frederick Forsyth<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<br />
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg_B7_8s_ry9OiTh3FBYxq2_UXAVkBfDeTgR22CNcuhB_fOeebfqpMMXzIoedrLYyKsnjt-UZW30e6nGrNVOD4__r6NGVJzb51dDJgwnaFeoEw4FO7ZPu-jNsN3vH9r8y4yWDqloTRACXfu/s1600/frederick_forsyth.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg_B7_8s_ry9OiTh3FBYxq2_UXAVkBfDeTgR22CNcuhB_fOeebfqpMMXzIoedrLYyKsnjt-UZW30e6nGrNVOD4__r6NGVJzb51dDJgwnaFeoEw4FO7ZPu-jNsN3vH9r8y4yWDqloTRACXfu/s1600/frederick_forsyth.jpg" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><span style="font-size: small;"><b>Frederick Forsyth</b></span></td></tr>
</tbody></table>
<div style="color: cyan;">
<span style="font-size: large;">कधीकाळी
तो बातमीदार होता.. आता केवळ तडाखेबंद खपाचाच नव्हे तर ‘प्रश्न पाडणारा’
लेखक आहे. त्याची एखादी कादंबरी ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेत नव्यानं दाखल
होणारे क्रमिक पुस्तकासारखी वाचतात, पण याच यंत्रणेच्या क्रौर्याचं चित्रण
करणारी त्याची दुसरी कादंबरी ब्रिटिश सरकारलाही या क्रौर्याची कबुली
द्यायला लावते..
जगातले बारकावे टिपणारा, तपशिलात वर्णन करणारा फ्रेडरिक फोर्सिथ प्रत्यक्ष
भेटीत ‘मी लेखकबिखक नाही’ म्हणाला, त्यात थोडंफार तथ्यही आहे. पण याला जग
कळतं. इतरांपेक्षा लवकर कळतं. म्हणूनच, वाचणाऱ्याला प्रश्न पडतात!</span></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiBM6B02zQGNa3rBcNJYxskAc6lovOY8Gf4ZnRtba3HitghEfSxq5WcsyZ08SRLZ7kOu7qBUAUemURn_aGL23LNGe28xeE9HLGlE36unr8eVJcPd1vnai9RJ8q42l1E3f1pXXshSYRRJl38/s1600/edt03.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="163" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiBM6B02zQGNa3rBcNJYxskAc6lovOY8Gf4ZnRtba3HitghEfSxq5WcsyZ08SRLZ7kOu7qBUAUemURn_aGL23LNGe28xeE9HLGlE36unr8eVJcPd1vnai9RJ8q42l1E3f1pXXshSYRRJl38/s320/edt03.jpg" width="320" /></a></div>
<span style="font-size: large;"><br /><span style="color: maroon;">
</span></span><br />
<span style="font-size: large;">आपल्याकडे कादंबरी लेखनाचा, म्हणजे अर्थातच लेखकाचा, परीघ
ठरलेला असतो. गाव, जिल्हा.. फारच म्हणजे एखादी सिंहासन वगैरे आली तर,
राज्य. त्यापुढे काही आपण जात नाही. झेपतच नाही आपल्याला. तीच तीच माणसं,
त्यांच्या त्याच त्या व्यथा. मग त्यांच्यातल्या नातेसंबंधांच्या
मनोव्यापाराचा आढावा आपले लेखक घेतात. मग ते झाल्यावर उरलेले लेखक
मनोव्यापाराचा नातेसंबंधांवर होणारा परिणाम आपल्या लेखनात मांडतात. मग ते
वाचून आपण टाळय़ा वगैरे वाजवतो आणि मराठी कादंबरी किती खोल वगैरे गेल्याचे
एकमेकांना सांगू लागतो.<br /> आपल्या कादंबरीची इयत्ता कंची हा प्रश्न
स्वत:लाच विचारून घ्यायचा असेल तर फ्रेडरिक फोर्सिथ वाचणं, हे राष्ट्रीय
कर्तव्य मानायला हवं. एक तर त्याचे विषय. कधी त्यात जैविक युद्ध असतं. जनरल
द गॉल या फ्रान्सच्या सर्वोच्च सेनानीची हत्या असते. एकात स्फोटकं घेऊन
जाणारी बोटच्या बोट किनाऱ्यावर उत्पात घडवणार असते, तर कधी आंतरराष्ट्रीय
अर्थव्यवहारात अमली पदार्थानी घडवलेला हाहाकार असतो. शीतयुद्धाच्या काळात
अमेरिका आणि सोविएत रशिया एकमेकांची पिकं कशी संपवतात याचीही तितकीच
चित्तथरारक कथा फोर्सिथ रंगवतो. तितक्याच ताकदीनं. त्याच्या कादंबऱ्यांत एक
प्रकरण व्हाइट हाऊसमधे घडतं. पुढचं युरोपीय राष्ट्रांच्या मुख्यालयात
ब्रसेल्सला, तिसरं प्रागमध्ये. चौथं मॉस्कोत. पाचवं लंडनमध्ये. त्यात
मध्येच कोणीतरी दिल्लीला वगैरे येऊन गेलेला असतो. आणि हे सगळे शेवटच्या
दोनेक प्रकरणांत एकमेकांच्या सहवासात येतात आणि त्याची महाकादंबरी आपल्याला
अचंबित करून संपते. यातला महत्त्वाचा भाग असा की ही गावं नुसती यायची
म्हणून येत नाहीत. त्यातील बारीक सारीक तपशिलासह ती रंगवलेली असतात. म्हणजे
कोणत्या नाक्यावर कसलं दुकान आहे, कोणतं कार्यालय आहे. त्यात काय होतं.
वगैरे संपूर्ण तपशील.<br />मुळात मोठे इंग्रजी लेखक खूप, खूप तपशिलासह
लिहितात. ललित वाङ्मय आहे म्हणून ठोकून देतो ऐसाजे असा प्रकार नाही. आणि
यात फोर्सिथ इतरांपेक्षा मोठा का? तर त्याच्या व्यक्तिरेखाही खऱ्या असतात.
म्हणजे त्याच्या कादंबऱ्यांत बिल क्लिंटन असतात. मार्गारेट थॅचर असतात.
सद्दाम हुसेन, ओसामा बिन लादेन, क्युबातल्या छळछावण्या, डोनाल्ड
रम्सफेल्ड.. असे सगळे खरे खरे असतात आणि फोर्सिथचं लिखाण नाकारणं त्यांनाही
जमत नाही. आसपास जिवंत असलेल्या मंडळींवर लिहायचं तर खूप अभ्यास लागतो.
फोर्सिथ तो करतो. आपल्याकडे अभ्यास हा रंजकतेच्या मुळावर येतो, असं मानायची
पद्धत आहे. असं ज्यांना वाटतं त्यांनी फोर्सिथ वाचणं ही काळाची गरज समजावी
आणि अधिक वेळ न दवडता फोर्सिथ वाचायला सुरुवात करावी. याचा तपशिलाचा
अभ्यास इतका असतो की, ब्रिटनच्या एमआय-फाइव्ह या सरकारी गुप्तहेर यंत्रणेत
दाखल होणाऱ्यांना क्रमिक पुस्तकं म्हणून फोर्सिथ वाचायला लावतात. यावरनंच
त्याचा विषयांचा आवाका आणि अभ्यासाची बैठक लक्षात येऊ शकेल.<br />फोर्सिथ
सुरुवातीला ब्रिटनच्या हवाई दलात पायलट होता. नंतर ते झाल्यावर छोटय़ामोठय़ा
वर्तमानपत्रांत वार्ताहरी केली. पुढे तर रॉयटर्ससाठी झेकोस्लोवाकिया, पूर्व
जर्मनी, फ्रान्स अशा अनेक ठिकाणी तो बातमीदार होता. शीतयुद्धाच्या तापत्या
झळांनी जगाला वेढलं होतं तो काळ. चांगला बातमीदार असल्यानं आसपासच्या घटना
तो सजगपणे टिपत गेला. त्यातूनच त्याची कादंबरी जन्माला आली ‘द डे ऑफ द
जॅकल’. तिच्यावर सिनेमाही आल्यानं ती बऱ्यापैकी माहिती असते. पण
फोर्सिथच्या पुढच्या अनेक कादंबऱ्या जॅकलपेक्षा कितीतरी उंचीच्या आहेत.
जगाच्या राजकारणाचा थरार ज्यांना अनुभवायचा असतो त्यांच्यासाठी
फोर्सिथसारखा दुसरा आनंद नाही. द ओडिसा फाइल्स, द डॉग्ज ऑफ वॉर, द फोर्थ
प्रोटोकॉल, द निगोशिएटर, द डिसीव्हर, द डेव्हिल्स आल्टरनेटिव्ह.. अशा किती
सांगता येतील. याच्याही नंतरची माझी प्रचंड आवडती म्हणजे द फिस्ट ऑफ गॉड.
इराकच्या सद्दाम हुसेन याने तयार केलेली अण्वस्त्रं इस्रायली बाँबफेकी
विमानं जाऊन नष्ट करतात, या सत्य घटनेवर आधारित ही कादंबरी अशावेळी हाती
आली की, मी तेलाच्या राजकारणात पिंपभर बुडालो होतो. फिस्ट ऑफ गॉड सलग
वाचून, एकाच बैठकीत संपवावी लागते. तशी मी ती संपवली आणि फोर्सिथ घरी जमा
व्हायला लागले. द फिस्ट ऑफ गॉड इतकी परिणामकारक आहे की, त्यानं ती आधी
लिहिली आणि मग इस्रायलनं त्याप्रमाणे कृती केली असं वाटावं. <br />
शिष्यवृत्तीच्या निमित्ताने १९९८ साली लंडनला सहा महिने राहायला मिळालं.
त्यावेळी करायच्या कामात एक काम होतं फोर्सिथला भेटायचं. एका रविवारी
त्याच्या घरी धडकलो. लंडनच्या उत्तरेला हर्डफोर्डशायरला त्याचं घर आहे. घर
कसलं, हवेलीच ती. जवळपास तिनेकशे र्वष जुनी. आणि आत प्राणिसंग्रहालय. अगदी
गाढवसुद्धा. त्याचं नाव आइन्स्टाइन का असंच काहीतरी. त्याचा विक्षिप्तपणा
लक्षात येईल असं. पहिल्या भेटीतच तो सांगून जातो, ‘मी लेखकबिखक नाही’ आणि
आपल्याला धक्काच बसतो. आपण म्हणजे त्याचे चाहते वगैरे असतो आणि हा तर
म्हणतो मी लेखकच नाही. प्रश्न त्यामुळे त्याचं काय होणार हा नसतो, तर आपलं
काय झालं हा असतो. तर फोर्सिथ त्याची लेखनप्रक्रिया उलगडून सांगतो.<br />तेव्हा
जाणवतं की त्याला ठाम अशी राजकीय, परराष्ट्र राजकारणातली मतं आहेत आणि
लेखक म्हणून तो भूमिका मांडायला अजिबात घाबरत नाही. म्हणजे पंतप्रधान
म्हणून टोनी ब्लेअर अगदीच कुचकामी आहेत आणि इराक युद्धावरनं त्यांच्यावर
महाअभियोग चालवून त्यांना हाकलून लावायला हवं.. इतक्या स्वच्छपणे त्यांनी
भूमिका घेतली होती. त्यांच्या लिखाणातही ही भूमिका लपत नाही. म्हणजे
त्याच्या एका कादंबरीत (द डिसीव्हर) त्याच्या एका गुप्तहेरास ब्रिटन
निर्घृणपणे मारतं. यातली मेख अशी की मारला गेलेला गुप्तहेर आयरिश रिपब्लिकन
आर्मीचा म्हणजे ‘आयआरए’चा असतो आणि त्याचवेळी ब्रिटन आणि आर्यलड यांच्यात
तीव्र मतभेद निर्माण झालेले असतात. यातला धक्कादायक भाग असा की, हे पुस्तक
आलं त्याचवेळी आयआरएचा एक हेर गूढ अवस्थेत मेलेला आढळला होता. त्याच
कादंबरीत फोर्सिथनं लिहिलेलं असतं : मारल्या गेलेल्या आयआरए बंडखोरांच्या
अंत्यविधीप्रसंगी जमलेल्यांत काय चर्चा होते आहे हे कळावं म्हणून
शवपेटय़ांतून सुद्धा ब्रिटनने हेरगिरीची यंत्रणा कशी ठेवलेली होती, हे छापून
आल्यावर फोर्सिथला बऱ्याच निषेधाला तोंड द्यावं लागलं. परंतु नंतर ब्रिटिश
सरकारला मान्य करावं लागलं- शवपेटय़ांत ट्रान्समीटर होते ते. फोर्सिथ
बीबीसी रेडिओवरही दर शनिवारी कार्यक्रम करायचा. कमालीची लोकप्रियता
लाभलेल्या या कार्यक्रमात त्याची मतं नेहमीच्याच परखडपणे समोर यायची. तो
सांगतो की कादंबरीत फक्त मुख्य कट, त्याची आखणी, मांडणी त्याची असते.
म्हणजे हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेत वगैरे मुख्य शल्यक कसा हृदय बाहेर
काढताना आणि परत आत ठेवून चालू करण्याचं काम करतो- बाकीची फाडाफाडी वगैरे
छोटीमोठी कामं त्याचे सहायक डॉक्टर करतात- तसं फोर्सिथचं आहे. पुस्तकासाठी
लागणारी बाकीची जुळवाजुळव त्याच्या पदरी असलेले लेखक करतात. एकदा का ती
झाली की फोर्सिथ आणि त्याचे हे लेखक त्याच्या मालकीच्या बेटावर जाऊन
राहतात.<br />..आणि मग तिथून जन्माला येते एक नवी कादंबरी. एक नवी सत्यकथा.
त्याला भेटल्यानंतर त्याची दोन पुस्तकं आली. द अफगाण आणि कोब्रा. ‘नाइन
इलेव्हन’मध्ये विमानं जाऊन वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींना धडकतात. ‘द
अफगाण’मधे अख्खीच्या अख्खी, महनीय व्यक्तींनी भरलेली बोट. तिच्यावरचं संकट
टाळतो कर्नल माइक मार्टिन. ओसामाच्या कळपात शिरून त्याची संपूर्ण यंत्रणा
माइक समजावून घेतो आणि त्याच्या रूपानं फोर्सिथ ती आपल्यासमोर मांडतो.
फोर्सिथ चाहत्यांचा माइकशी चांगला परिचय असतो. कारण द फिस्ट ऑफ गॉडमध्ये
त्यानेच महत्त्वाची भूमिका बजावलेली असते. वाईट एवढंच की हा माइक आता परत
भेटणार नसतो. अफगाणमध्येच त्याचा शेवट होतो.<br />अलीकडेच त्याचं ताजं पुस्तक
आलंय. द कोब्रा. अमली पदार्थाची निर्मिती, त्याचा व्यापार याचं हिंस्र जग
या पुस्तकातून समोर येतं. आणि कळते त्या जगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू
असलेली देशोदेशींची चढाओढ. फोर्सिथची सगळी वैशिष्टय़ं यातही आहेत. साहजिकच
जन्माला येताना त्याची पुस्तकं पहिली आवृत्ती पंधरा लाखाची, वगैरे असं
मिरवत येतात. <br />पण तरीही फोर्सिथ रूढ अर्थानं लेखक नाही. एका अर्थानं
बरंच आहे ते. फोर्सिथला एकच माहितीये. आपल्या वाचकांना प्रश्न पडला पाहिजे-
याला आधीच कसं काय कळलं, हा!<br />तो प्रश्न त्याची पुस्तकं आजही पाडत असतात.</span><br />
<br />
<b>गिरीश कुबेर </b><br />
girish.kuber@expressindia.com<br />
<br />
[ <b>Frederick Forsyth</b>, CBE (born 25 August 1938) is an English author and occasional political commentator. He is best known for thrillers such as <i>The Day of the Jackal</i>, <i>The Odessa File</i>, <i>The Fourth Protocol</i>, <i>The Dogs of War</i>, <i>The Devil's Alternative</i>, <i>The Fist of God</i>, <i>Icon</i>, <i>The Veteran</i>, <i>Avenger</i>, <i>The Afghan</i> and <i>The Cobra</i>.]</div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-56470860004776224002012-04-12T23:14:00.001-07:002012-04-12T23:16:26.595-07:00शाळेपलीकडच्या शिक्षणासाठी व्यतीत केलेलं एक भन्नाट वर्ष!(A book about escape from School)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjVT-HfE7JpI7vk46V75t0HE97yUwpQzHuX2YuudmiXJP0SZFFSVwOLAVfjYZRq3iUBQcs7Bd3Aw6Yp4jBclxR5kO9BDcapJWsf10rb_Q11vOfq2-E_iJqOc6IpY2w-m6U2oH96iAb316Po/s1600/cr02.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjVT-HfE7JpI7vk46V75t0HE97yUwpQzHuX2YuudmiXJP0SZFFSVwOLAVfjYZRq3iUBQcs7Bd3Aw6Yp4jBclxR5kO9BDcapJWsf10rb_Q11vOfq2-E_iJqOc6IpY2w-m6U2oH96iAb316Po/s1600/cr02.jpg" /></a></div><br />
<span style="font-size: large;">दहावीनंतर करिअरची वाट निवडून लवकरात लवकर मार्गी लागण्याचा ध्यास असंख्य विद्यार्थ्यांना लागतो. त्यांच्या पालकांना तर या सगळ्याची मुलांपेक्षाही अधिक घाई झालेली असते! अशा वेळी एखाद्या मुलाने वर्षभर पुढचे रीतसर शिक्षण न घेता मनाला आवडतील त्या गोष्टी करायच्या ठरवल्या तर.. त्याच्या या इच्छेला त्याचे पालक, शिक्षक, नातेवाईक, समवयस्क आणि इतर कसे रिअॅक्ट होतील? अशी इच्छा मनात डोकावून जरी गेली तरी इतरांच्या रिअॅक्शनच्या कल्पनेनेच त्या मुलाला दरदरून घाम फुटेल.. आणि बाकीचे तर त्या मुलाच्या आळशीपणाला बोल लावून त्याचे दिशाहीन कल्पनेचे उधळलेले वारू मारून मुटकून जागेवर म्हणजेच क्रमिक अभ्यासाच्या चौकटीत कसे आणता येईल, याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. काहीतरी वेगळं करण्याची त्या मुलाची ऊर्मी पुरती विझून गेली, की तो मार्गी लागल्याच्या भावनेने सारे कृतकृत्य होतील. मात्र या नेहमीच्या दृश्यापेक्षा काहीतरी वेगळं प्रत्यक्षात घडतं तेव्हा त्याची दखल घ्यावीच लागते. मनोविकास प्रकाशनने प्रकाशित केलेलं ‘शाळेपासून मुक्ती वर्षांपुरती’ हे पुस्तक हे असंच वेगळं पठडीबाहेर झेपावणाऱ्या मुलाची गोष्ट सांगणारं आहे. <br />
ही अशा एका मुलाची गोष्ट आहे, ज्याने दहावीनंतर वर्षभर क्रमिक शिक्षणाच्या चौकटीबाहेरच्या अनेक गोष्टी केल्या. राहुल अल्वारिस हा १६ वर्षांचा मुलगा, ज्याने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आई-बाबांच्या उत्तेजनामुळे वर्षभर औपचारिक शिक्षणापासून सुट्टी घेत विविध स्वरूपातील जीवनकौशल्याचे धडे घेतले. हे पुस्तक म्हणजे एका परीने या वर्षभरात त्याला आलेल्या निरनिराळ्या अनुभवांचं मोकळं केलेलं गाठोडं आहे. आलेले अनुभव शेअर करायच्या दृष्टीने लिहिलेलं डायरी स्वरूपातील लिखाण म्हणजे वेगळं काही करू इच्छिणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही प्रेरणादायी ठरेल, असे अनुभवांचे संचित आहे. उष:प्रभा पागे यांनी या पुस्तकाचे भाषांतर केले आहे. <br />
अभ्यासापासून सुट्टी घेत गोव्यात राहणाऱ्या राहुलने त्या वर्षभरात काय नाही केलं? म्हापशातील फिश टँक बनवणाऱ्या एका दुकानात काम केलं, शेतीचा अनुभव घेतला, ग्रीन हेरिटेज प्रदर्शनात सक्रिय सहभागी होऊन वनस्पती, फुलं, रोपटय़ांबद्दल बरंच काही जाणून घेतलं, त्या माहितीची टिपणं काढली. अळंबी कशी वाढवायची, याचे शास्त्रशुद्ध धडे घेतले, तीन आठवडे पुण्याच्या सर्पोद्यानात राहून सर्पाचा अभ्यास केला. १५ दिवस चेन्नईच्या गांडूळ संस्थेत राहून गांडूळ आणि गांडूळखत यांचा अभ्यास केला. त्यानंतर १५ दिवस कोळ्यांचा अभ्यास केला. त्यानंतर महिनाभर चेन्नईजवळच्या ममलापूरम येथील क्रोकोडाईल प्रजनन केंद्रामध्ये राहून मगरी, साप, कासवे, सरडे, घोरपड यांचा अभ्यास केला. त्यानंतर राहुलने काही मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आणि वन्यजीवविषयक माहिती जाणून घेतली. शालेय मुलांच्या कार्यशाळा, शिबिरे घेतली. पाँडेचरीला अरविंद आश्रमात राहिला. उन्हाळ्यात गोवा फाऊंडेशनच्या बेतीम जंगलविषयीच्या एका प्रकल्पावर जंगलात राहून काम केले. त्याच्या वर्षभराच्या अनुभवावर बेळगावच्या एका कार्यक्रमाला पाहुणा म्हणूनही त्याला आमंत्रित केलं गेलं. यातील प्रत्येक अनुभव आणि त्यावर राहुलने काढलेली टिपणं ही केवळ अप्रतिम. या प्रत्येक अनुभवाने त्याला आयुष्यभर पुरेल इतकी ज्ञानाची शिदोरी दिली आहे.<br />
हे सगळं वाचताना हे प्रकर्षांने जाणवतं की, या अनुभवांच्या पलीकडेही तो वर्षभरात बरंच काही शिकला.. एकटय़ाने प्रवास करताना बऱ्याच अनुभवांना तो सामोरे गेला, जाईल तिथल्या लोकांशी त्याला जुळवून घ्यावं लागलं असेल, पानात पडेल ते खावं लागलं असणार, अशा एक ना अनेक छोटय़ा- मोठय़ा गोष्टी शिकत या वर्षभरात प्रत्यक्ष जगण्याच्या अनुभवाजवळ तो अधिक गेला. अनेकदा मनात ठाण मांडून बसलेल्या अनेक भीतींचा निचरा होण्यासाठीही असं एकटय़ाने फिरणं आवश्यक असतंच. आयुष्यात नवनव्या संधींना सामोरं जायला लाखमोलाची ठरणारी गोष्ट म्हणजे बाहेरच्या जगात एकटं वावरण्याचा आलेला आत्मविश्वास- ही गोष्ट राहुल या वर्षभरात शिकला. <br />
हे त्याचे अनुभव वाचताना राहून राहून वाटतं की, जर हे वर्ष त्याच्या वाटय़ाला आलं नसतं आणि अकरावीच्या रुळलेल्या वाटेने तोही गेला असता तर त्याने किती काय काय गमावलं असतं? उलटपक्षी, या वर्षांने राहुलला जे भरभरून देऊ केलं, ते क्रमिक शिक्षणात काही टक्के तरी मिळालं असतं का? याचं श्रेय जसं राहुलचं तसं किंवा त्याच्यापेक्षाही त्याच्या आई-बाबांचं. ज्यांना मुलाचं बोटं नेमकं कधी सोडायचं हे ठाऊकही होतं आणि त्यांनी तसं धाडसही दाखवलं.<br />
राहुलचा हा अफलातून जीवनानुभव हा प्रत्येकाने वाचायलाच <br />
हवा आणि आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर अनुभवायलाही हवा! </span><br />
<span style="font-size: large;"> </span><br />
<span style="font-size: large;">-सुचिता देशपांडे<b> </b>,लोकसत्ता </span><br />
<span style="font-size: small;">suchitaadeshpande@gmail.com</span><br />
<br />
<span style="font-size: large;"><span style="color: lime;">शाळेपासून मुक्ती वर्षांपुरती</span> </span><br />
<span style="font-size: large;">- राहुल अल्वारिस, </span><br />
<span style="font-size: large;">मनोविकास प्रकाशन,<br />
पृष्ठे ११३, मूल्य ९० रु.</span></div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-90922078514320128652012-03-15T22:14:00.003-07:002012-03-15T22:14:00.035-07:00साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची : विचारशील कथाकार योगेंद्र आहुजा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">जयप्रकाश सावंत - लोकरंग(लोकसत्ता)<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQKsr6TYzP5en_SIUmDi6bQreE9cdFtnibKetkR5uJjkTS7-Mz3Deg_tIAXrAhKKRZ_nEVR3IqUL4EviEAV09-NqAhCpI2jkgyg3l8iofF_OCkPWyPceWN3Xfvs8_wAC6NN3mNRisPh9dT/s1600/yogendra+aahuja.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQKsr6TYzP5en_SIUmDi6bQreE9cdFtnibKetkR5uJjkTS7-Mz3Deg_tIAXrAhKKRZ_nEVR3IqUL4EviEAV09-NqAhCpI2jkgyg3l8iofF_OCkPWyPceWN3Xfvs8_wAC6NN3mNRisPh9dT/s1600/yogendra+aahuja.jpg" /></a></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br />
</div> <span style="font-size: large;">योगेंद्र आहुजांच्या कथेतला मोठा अवकाश चिंतनाने व विचारांनी व्यापलेला असतो. ते खरोखरच खूप कमी लिहितात. वर्षांला एक किंवा दोन कथा. बस्स. पण त्यांची कथा एखाद्या नियतकालिकात आलीय किंवा येणार आहे, हे कळल्यावर ते नियतकालिक आवर्जून मिळवावंसं वाटतं, हे निश्चित. आहुजांच्या अशा संयमित लेखनामुळे १९५९ साली जन्मलेल्या आणि कॉलेजच्या दिवसांपासून कथालेखन करणाऱ्या हिंदीतील या महत्त्वाच्या कथालेखकाचा ‘अँधेरे मे हँसी’ हा एकच कथासंग्रह अजूनपर्यंत प्रकाशित झालाय. यावर्षी त्यांचा दुसरा संग्रह येऊ घातलाय. आणि त्याबद्दल जाणकार वाचकांना प्रचंड कुतूहल आहे..</span><br />
<span style="font-size: large;">ज्ञा नपीठ पुरस्कारविजेते हिंदी साहित्यिक निर्मल वर्मा यांनी योगेंद्र आहुजांना वीसेक वर्षांपूर्वी पाठवलेल्या एका पत्रात लिहिलं होतं- ‘‘तुमच्या कथेची वाट पाहत असतो.. तुम्ही अशा मोजक्या तरुण लेखकांपैकी आहात, ज्यांच्या कथा ‘विचारां’च्या विश्वात आकार घेतात.’’ यात असलेल्या दोन्ही विधानांची सत्यता योगेंद्र आहुजांच्या कथा वाचणाऱ्यांना पटण्यासारखी आहे. आहुजांच्या कथेतला मोठा अवकाश चिंतनाने व विचारांनी व्यापलेला असतो. आणि ते खरोखरच खूप कमी लिहितात. वर्षांला एक किंवा दोन कथा. बस्स. पण त्यांची कथा एखाद्या नियतकालिकात आलीय किंवा येणार आहे, हे कळल्यावर ते नियतकालिक आवर्जून मिळवावंसं वाटतं, हे निश्चित. आहुजांच्या अशा संयमित लेखनामुळे १९५९ साली जन्मलेल्या आणि कॉलेजच्या दिवसांपासून कथालेखन करणाऱ्या हिंदीतील या महत्त्वाच्या कथालेखकाचा ‘अँधेरे मे हँसी’ (भारतीय ज्ञानपीठ- २००४) हा एकच कथासंग्रह अजूनपर्यंत प्रकाशित झालाय. यावर्षी त्यांचा दुसरा संग्रह येऊ घातलाय, ही माझ्यासारख्या योगेंद्र आहुजांच्या चाहत्यांसाठी विशेष आनंदाची बातमी आहे.</span><br />
<span style="font-size: large;">‘अँधेरे में हँसी’ला वाचक व समीक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. दोनेक महिन्यांपूर्वीच भोपाळचा ‘स्पंदन’ संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘स्पंदन कृति पुरस्कार’ या कथासंग्रहाला देण्यात आला. ‘अँधेरे मे हँसी’ला याआधीही दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. या गुणसंपन्न कथासंग्रहातली ‘सिनेमा सिनेमा’ ही कथा कथेत काय काय करता येतं, याचं चकित करणारं भान आणून देणारी आहे. किंबहुना, काही वर्षांपूर्वी तरुण अनुवादक मित्र बलवंत जेऊरकर याने ‘शब्दालय’च्या दिवाळी अंकासाठी केलेला तिचा अनुवाद वाचूनच मी आहुजांच्या लेखनाकडे ओढला गेलो.</span><br />
<span style="font-size: large;">उत्तर प्रदेशातील एका छोटय़ा शहराच्या रेल्वे कॉलनीत राहणाऱ्या, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्रांची ही कथा आहे. या दोघांना सिनेमाचं अतोनात वेड आहे. शहराच्या कॅम्प भागात इंग्रजांच्या काळापासून असलेलं एक जुनाट थिएटर आहे. तिथे जाऊन ते मुंबईहून येणारे सिनेमे पाहतात. कॅम्पमधल्या रस्त्यांवरून जीवनानंद दासांच्या कविता, आधीच्या शतकातल्या महान रशियन कादंबऱ्या आणि देशी-विदेशी कृष्णधवल सिनेमा यांच्याविषयी चर्चा करत ते भटकतात. यातला एकजण ही गोष्ट सांगतोय. दुसऱ्याचे वडील रेल्वेत कारकून आहेत. आणि त्याचं त्याच कॉलनीत राहणाऱ्या उच्चपदस्थ रेल्वे अधिकाऱ्याच्या मुलीशी प्रेम जुळलंय. साहजिकच प्रखर विरोध, कानउघाडणी, दमबाजी आणि मारहाणसुद्धा.. या साऱ्या तणावांतून जात हा मित्र एका रात्री त्या मुलीला पळवून नेतो. कथा इथे संपते खरी; पण पुढे आणखी काय घडेल, त्या दोघांचं काय होईल, अशा काळजीचं दडपण वाचकाच्या मनावर ठेवूनच!</span><br />
<span style="font-size: large;">या कथासूत्राला जोडून या अठ्ठावीस पानी दीर्घकथेत सिनेमाविषयक जे चिंतन येतं, ते केवळ अपूर्व आहे. नेमाडय़ांच्या ‘बिढार’मध्ये (आता ‘हूल’मध्ये) ‘त्या दिवसांत रेडिओ फारच प्रिय झाला..’ या वाक्याने सुरू होणारं हिंदी सिनेसंगीताविषयीचं चांगदेवचं एक अप्रतिम स्वगत आहे. त्याची आठवण यावी अशा धर्तीचं, तितकंच खोल आणि तितकंच अस्वस्थ करणारं हे चिंतन आहे. उदाहरणार्थ हा एक उतारा पाहा :</span><br />
<span style="font-size: large;">त्या सिनेमातल्या नायिका बेहद्द सुंदर होत्या.. त्यांच्या हास्यातून एक तांबूस रंगाचा प्रकाश उमलून पसरे.. सर्व काही स्वच्छ आणि उज्ज्वल करणारा. त्या जीव तोडून प्रेम करत.. मोडून जात नसत- अखेपर्यंत. त्या अनेकदा उदास होत आणि अशावेळी त्या सिनेमागृहाच्या डाग पडलेल्या मलीन पडद्यावर मरण उतरून येई.. त्या सर्व सिनेमांची थीम एकच असे- प्रेम. आणि ज्या काळात ते बनवले गेले होते, त्या काळात हा शब्द अश्लील आणि गलिच्छ झाला नव्हता. ते तर खूप नंतर घडलं. त्यावेळी हा शब्द मृत्यू, करुणा, सौंदर्य आणि सत्य अशा अनेक अर्थानी ओतप्रोत होता. अविचलित आणि अ-नश्वर. पृथ्वीवरच्या प्राचीन कातळांसारखा.</span><br />
<span style="font-size: large;">या दोघा मित्रांचं जग कथेतील प्रवासासोबत विस्तारलंय. व्ही. शांताराम, बिमल रॉय, गुरुदत्त यांच्यानंतर त्यांच्या जाणिवेत सत्यजित राय, आइझेन्स्टाइन, तारकोवस्की अवतरताहेत. ते ब्रेख्त आणि लोर्का, नाजिम हिकमत आणि अर्नेस्तो कार्देनाल वाचू लागलेयत. त्यांच्या आजूबाजूचं जग बदलतंय. गोर्बाचेव्ह यांनाही या कथेत महत्त्वाची भूमिका आहे. ते सोविएत संघाचं पतन घडवून आणतायत. या सर्व गोष्टींची गुंफण करत ही कथा एक अद्भुत रूप घेते. कुठल्याही कथाकाराला ‘ही आपण लिहायला हवी होती!’ असं वाटायला लावणारी ही कथा आहे. (आणि माझ्यासारख्या अनुवादकाला ‘आपण हिचा अनुवाद करायला हवा होता!’ असं वाटायला लावणारीही.)</span><br />
<span style="font-size: large;">‘सिनेमा सिनेमा’चा मराठी अनुवाद वाचल्यानंतर थोडय़ाच दिवसांत ‘पहल’च्या एका जुन्या अंकात मूळ हिंदी कथाही मिळाली होती. दरम्यान, आहुजांचं एका हिंदी नियतकालिकात आलेलं अतिशय हृद्य आत्मकथनही वाचायला मिळालं होतं. मग ‘अँधेरे में हँसी’ अगदी तातडीने हवंच झालं. आमच्या लोकवाङ्मय गृहाच्या पीपल्स बुक हाऊसद्वारे ते मागवलं. पण हिंदीतले प्रकाशक बऱ्याच वेळा खूप ताटकळत ठेवतात. माझी अस्वस्थता बलवंतने बहुधा आहुजांना कळवली आणि त्यांनी अतिशय आस्थेने मला हा संग्रह सप्रेम भेट म्हणून पाठवला. त्यानंतर काही पत्रांची व पुस्तकांची देवाणघेवाण, अधूनमधून फोनवर बोलणं यातून प्रत्यक्षात एकदाही न भेटता आहुजांशी एक जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला. मध्येच केव्हातरी काम्यूच्या ‘प्लेग’मधली डॉ. रिऊ ( Dr. Riux) ही व्यक्तिरेखा आम्हा दोघांचीही ‘जीवलग’ आहे हे लक्षात आलं; तेव्हा आणखी एका आंतरिक बंधाने आम्ही जोडले गेलो.</span><br />
<span style="font-size: large;">आहुजाचं घराणं पाकिस्तानातलं. त्यांचे आजोबा तिथे युनानी पद्धतीने उपचार करणारे हकीम होते. फाळणीच्या वेळी आहुजांनी आत्मकथनात लिहिलंय त्याप्रमाणे ‘रक्ताची नदी पार करून त्यांचा उद्ध्वस्त परिवार’ दिल्लीत आला. प्रथम सफदरजंग मकबरा.. मग किंग्ज कँपमधले तंबू.. नंतर दिल्लीतली निर्वासितांची वसाहत अशी फरफट झाली. मग केव्हातरी वडिलांना रेल्वेत नोकरी मिळाली आणि अन्य कुटुंबीयांना सोडून ते उत्तर प्रदेशात (हल्लीच्या उत्तरांचलात) वस्तीला आले. इथल्या वास्तव्यात फाळणीनंतर बारा वर्षांनी योगेंद्र आहुजांचा जन्म झाला. काठगोदाम, काशीपूर आणि बदायूँमधल्या रेल्वे कॉलन्यांमध्ये आहुजांनी जे बालपण अनुभवलं तेही विलक्षण आहे.</span><br />
<span style="font-size: large;">ते १४-१५ वर्षांचे असताना काशीपूरच्या रेल्वे कॉलनीत त्यांना जे मित्र लाभले त्या सर्वाची महत्त्वाकांक्षा एकच होती- लेखक बनण्याची! हे सर्वजण मिळून हस्तलिखित साप्ताहिकं, मासिकं काढत. कोणी कविता लिही, कोणी कथा आणि एखादा क्रमश: कादंबरीही. ‘या साऱ्यातून कोणी लेखक बनला नसता तरच नवल!’ असं आहुजांनी म्हटलंय. या ग्रुपमधला कमाल अहमद हा त्यांचा हीरो : ‘किशोरवयात आयुष्यात आलेला पहिला गंभीर लेखक.’ अत्यंत हुन्नरी. त्याचं त्या कॉलनीतल्या निलोफर नावाच्या परदानशील अप्सरेवर प्रेम बसलं आणि ते उघड झाल्यावर एका रात्री त्याला खूप मारहाण करण्यात आली. निलोफरला तिच्या मामाच्या गावी पाठवण्यात आलं. या प्रत्यक्षातल्या प्रेमकहाणीचा शेवट ‘सिनेमा-सिनेमा’सारखा नव्हता. काही दिवसांनंतर कमाल घर सोडून पळून गेला. कुठे नाहीसा झाला काहीच कळलं नाही. आहुजा लिहितात, ‘अजूनही जेव्हा कधी ते नव्या शहरात जातात, तेव्हा बसच्या किंवा ट्रेनच्या खिडकीतून ते लोकांचे चेहरे निरखून पाहत असतात.’</span><br />
<span style="font-size: large;">आहुजांच्या नंतरच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी व्यक्ती होती- निर्मल वर्मा. तरुण आहुजा कथा लिहू लागले होते आणि लिहिल्यावर अभिप्रायासाठी कुठच्या मासिकाला न पाठवता ते निर्मल वर्माकडे पाठवत. निर्मलजीही कथा वाचून स्पष्ट व परखड प्रतिक्रिया देत. हळूहळू त्यांच्यात गुरू-शिष्य स्वरूपाचा पत्रसंवाद सुरू झाला. (यातील निर्मल वर्माची काही पत्रं मध्यंतरी आहुजांनी ‘अकार’ नामक त्रमासिकात छापली होती.) आहुजा निर्मल वर्माना दिल्लीत जाऊन भेटतही. कुतूहलजनक गोष्ट म्हणजे डाव्या विचारसरणीचे विरोधक समजल्या जाणाऱ्या निर्मलजींनीच आहुजांना गजानन माधव मुक्तिबोध या प्रखर मार्क्सवादी साहित्यिक-चिंतकाचं लेखन वाचायला भाग पाडलं. आणि आता जगभरातलं उत्कृष्ट साहित्य वाचणाऱ्या आहुजांच्या हृदयात मुक्तिबोधांचं जीवन आणि लेखन यांना परमोच्च स्थान आहे. त्यांच्या कथासंग्रहाच्या शीर्षकातसुद्धा मुक्तिबोधांच्या कवितेचे पडसाद आहेत. निर्मल वर्माशी असलेल्या त्यांच्या संबंधांत मात्र मोठाच अंतराय निर्माण झाला. गुजरात दंगलीनंतर निर्मल वर्मानी ‘असं काय मोठं झालंय गुजरातमध्ये?’ म्हणत भाजपची ज्या तऱ्हेने बाजू घेतली, त्याने आहुजा खूप दुखावले गेले. त्यांनी लिहिलंय, ‘निर्मल वर्माचं त्यांच्या अतिभव्य, सौंदर्यस्नात आणि अपूर्व संवेदनशील भाषेसोबत आपल्या संस्कृतीतील आणि आपल्या काळातील सर्वात कुरूप गोष्टीच्या निकट जाणं मी खोल वेदनेनिशी पाहत राहिलो.’ एक खूप भावोत्कट संबंध संपला. नंतर निर्मल वर्माही गेले. अजूनही आहुजांना त्याविषयी उदास व्हायला होतं. पण जे झालं त्याची अपरिहार्यताही जाणवते.</span><br />
<span style="font-size: large;">मुक्तिबोधांच्या ‘अँधेरे में’ या विख्यात कवितेत शहरातल्या एका मिरवणुकीचं वर्णन आहे. या मिरवणुकीत ‘ज्यांचे चेहरे वर्तमानपत्रांत छापून येतात’ अशी शहरातली प्रतिष्ठित आणि विद्वान मंडळी आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून तिथला कुप्रसिद्ध खुनी डोमाजी उस्तादही आहे. हे आणखी भयावह पद्धतीने प्रत्यक्षात आलंय. देशातल्या सर्व मोठय़ा जागा आता डोमाजी उस्तादांनी व्यापल्यायत. योगेंद्र आहुजांच्या अलीकडच्या कथांमध्ये हे वास्तव प्रकर्षांने येतं. झपाटय़ाने चकचकीत मॉलमध्ये रूपांतरित होणारी उपनगरं आणि त्यातली वाढती गुन्हेगारी, हिंसा, भय आणि दहशत यांचं अस्वस्थ करणारं दर्शन या कथांमधून होतं. बहुतेक कथांमधल्या घटना या भय वाटायला लावणाऱ्या अंधारात किंवा धुक्यात किंवा पिवळसर अंधुक प्रकाशात घडतात. ‘स्त्रीविमर्श’ शीर्षकाच्या एका कथेत उपनगरं आणि चकाकतं शहर यांच्या सीमारेषेवरचा भाग आहे. एका बाजूला जुन्या नगरातले चाकू-सुरेवाले गुन्हेगार आहेत, तर नव्या शहरातला पोलीस इन्स्पेक्टर वरिष्ठांकडे जाऊन गयावया करतोय, की माझी जुन्या विभागात बदली करा. या नव्या शहरातले, उंच टॉवर्समधले संतांच्या चेहऱ्याचे गुन्हेगार मला कळत नाहीत, त्यांची जास्त भीती वाटते..</span><br />
<span style="font-size: large;">अशा अंधाऱ्या वातावरणात योगेंद्र आहुजा हास्य शोधू पाहताहेत. मिळेल का ते त्यांना?</span></div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-53487508287267420222012-03-05T22:09:00.002-08:002012-03-06T03:39:43.435-08:00‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’:प्लॅटफॉर्म हरवलेल्या मुलांचं वास्तव चित्रण<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjfCT77a1vZ74nlg9kuBMGUPaKmS68-9e4j55I_AALDY1fmsSUHW_59VZu40NOzuwlXRVXQjJEpm8zy5QJjvLTZdiAJUzyE7kP1htZ3ApbrRxfji1COsAYhq5Ccs7J4ttdzEFuTsdVwPHar/s1600/platform-no-zero-275x275-imad3cb6tfzgdzkm.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjfCT77a1vZ74nlg9kuBMGUPaKmS68-9e4j55I_AALDY1fmsSUHW_59VZu40NOzuwlXRVXQjJEpm8zy5QJjvLTZdiAJUzyE7kP1htZ3ApbrRxfji1COsAYhq5Ccs7J4ttdzEFuTsdVwPHar/s1600/platform-no-zero-275x275-imad3cb6tfzgdzkm.jpeg" /></a></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><span style="font-size: large;">आयुष्याच्या चक्रव्यूहात अडकलेल्या स्टेशनवरच्या मुलांच्या अस्वस्थ करून सोडणाऱ्या कहाण्या सांगणारं ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’ हे अमिता नायडू यांचं पुस्तक.‘समकालीन प्रकाशन’ तर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाचं अंतरंग उलगडणारा लेख.विकासाची वाटचाल यशस्वीपणे करणाऱ्या आपल्या राज्याला-देशाला चपराक बसावी तसं ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’ आपल्या साऱ्यांच्याच डोळ्यात अंजन घालतं.स्टेशनवरची, प्लॅटफॉर्मवरची बेवारस किंवा घर सोडून आलेली मुलं, त्यांचं जगणं म्हणजे यातनाघर. त्यांना तुडविणारे पोलीस आणि मनातून हद्दपार करणारा </span><br />
<span style="font-size: large;">ही कलाकृती म्हणजे दहा व्यक्तिरेखांचा संग्रह नाही. प्लॅटफॉर्म- रेल्वेचे रूळ हेच जगण्याचं केंद्र बनलेल्या मुलांच्या बालपणाची ही आघात यात्रा आहे. व्यक्तिचित्र हा लेखिकेने स्वीकारलेला फॉर्म. प्रत्येकाचं इथे येण्याचं प्रयोजन निराळं. त्यांच्या शोककथा वाचकाला कासावीस करतात. मात्र परस्परांचे नातेसंबंध, त्यातील मैत्र आणि शत्रुत्वदेखील वाचकाला हर एक क्षणी थक्क करून सोडतं.</span><br />
<span style="font-size: large;"><br />
</span><br />
<span style="font-size: large;"><br />
</span><br />
<span style="font-size: large;">अन्थनी, बिल्लू, केक्या, मुन्ना, झहीर, राणा, किशोर आणि जग्गू, म्हाद्या, शिद्या यांच्या कहाण्या, कुणावर विस्थापनाचं संकट तर कुणी घरातल्या अत्याचाराला कंटाळलेलं. देशातल्या प्रगत-अतिप्रगत भागांतून किंवा दुष्काळी-मागास प्रदेशांतून आलेली मुलं शरीराचा-मनाचा-संवेदनांचा सांधा निखळवणाऱ्या वातावरणात तग धरून राहतात. लेखिकेने हे नकारात्मक चित्रण केलेलं नाही. भडकपणाचा- बटबटीतपणाचा रंग देऊन कुठेही ते कृत्रिमही झालेलं नाही. घटना फारशा घडत नाहीत. मात्र प्रसंगांना सामोरं जाण्याचं बळ या विशीच्या आतील, कधी कधी तर दहा-बाराच्या वयातील मुलांना कसं प्राप्त होतं यामुळे स्तिमित व्हायला होतं.</span><br />
<span style="font-size: large;"><br />
</span><br />
<span style="font-size: large;">या मुलांपैकी बरीच छोटा-मोठा माल ट्रेनमध्ये विकणारी. सरकारने दिलेल्या स्टेशनजवळच्या शाळेतल्या खोलीत राहणारी. मिशनने रात्रीच्या जेवणाची सोय केल्याने खूश होणारी ही पोरं. पोलीस डिपार्टमेंट आणि वस्तीतल्या मोठय़ा पोरांना हप्ता देणारी, सकाळपासून रात्रीपर्यंत राब राब राबणारी, कुणी भंगार गोळा करतं, तर कुणी मासिकं-पुस्तकं-प्लॅस्टिकच्या वस्तूंची विक्री. दिवसाला मिळणारे तुटपुंजे पैसे. कोणत्या ना कोणत्या कारणांनी बसणारा मार. मात्र त्यातही ‘कुटुंब’ संकल्पनेला व्यापक बनविणारी ही मुलं वाचकाला अनेक गोष्टी शिकवून जातात.</span><br />
<span style="font-size: large;"><br />
</span><br />
<span style="font-size: large;">या सर्व मुलांची घरं दारिद्रय़रेषेखालील, व्यसनी वडील, आई घर सांभाळणारी, आत्याची सुस्थिती पण भावाला आर्थिक मदत न करणारी, त्यात भावाचं आजारपण. त्याच्या इलाजासाठी अँथनी आत्याचे पैसे चोरतो, दवाखान्यात भरतो. आपण केला तो गुन्हा, हे लक्षात आल्याक्षणी घर सोडून पळून जातो. प्लॅटफॉर्मवर राहताना पैशाची बचत करत आत्याचे पैसे परत करून घरी जायचं हे ‘स्वप्न’ बाळगतो. जन्मापासून पांगळ्या असणाऱ्या केक्याला आजी भिकारी बनवते. त्याच्या ‘जिवावर’ खोली घेते. रोज भरपूर कमावणारा केक्या ‘भिकारी हटाव’ मोहिमेमुळे गोत्यात आल्यावर त्याला मारणारा बाप. त्याच्या माराला कंटाळून दुसऱ्या स्टेशनवर लोळत-लोंबत केक्या भीक मागतो. सोनारकाम घरी करताना एक फुंकरीने भडका उडून घर पेटणं, त्यात आई-वडील डोळ्यांसमोर जळणं, मुन्नाची जळालेली कातडी आणि पायाची चिकटलेली बोटं, घराबाहेर असल्याने वाचलेली बहीण, या बहीण-भावंडांना घराबाहेर हाकलणारा चुलता, बहिणीला एका संस्थेत ठेवून पैसे कमावण्यासाठी पळालेला मुन्ना. साथीच्या आजारात झहीरची अम्मी आणि दोन बहिणींचा झालेला मृत्यू, तो धक्का सहन न झाल्याने दारू पिऊन पिऊन स्वत:ला संपविणारे अब्बा. झहीर धाकटा. मोठय़ा बहिणीने नऊ वर्षांच्या झहीरला घरी आणलं खरं. परंतु जीजाच्या मारहाणीला कंटाळून पळालेला झहीर याच प्लॅटफॉर्मवर आलेला. सगळ्यांच्याच कहाणीत घरात बसणारा मार. अठराविश्वे दारिद्रय़, मुलांना सांभाळण्याची कुवत नसणारं कुटुंब, हा समान धागा. परंतु या साऱ्यांचा आक्रोश हे या पुस्तकाचं सूत्र नाही. त्या मुलांमध्ये असणारी व्यावहारिक दृष्टी, त्याचं एकूण वर्तन, त्याचं सरकारी अधिकारी व पोलीस डिपार्टमेंट यांच्याकडून होणारं अतोनात शोषण. या शोषणाचे असंख्य प्रकार. रेल्वे रुळावर कुणाचं बेवारस प्रेत पडलं तर याच कोवळ्या मुलांकडून उचलणं. कुठलीही चोरी-गुन्हा घडला की याच मुलांना तुडवणं, त्यांच्या कमाईत वाटा मागणं, त्यांच्या मित्रांना दुसऱ्या गटातल्या मुलांनी मारणं, हॉस्पिटलात अॅडमिट करण्याची वेळ आल्यानंतर स्वत:च्या पैशांनी मुलांनी मागवलेल्या पदार्थावर इन्स्पेक्टर मॅडमने ताव मारणं, अधिकाऱ्यांच्या घराचं शिफ्टिंग म्हटल्यावर याच मुलांकडून सामान उचलून घेणं, बंगलेवाल्यांनी त्यांच्या घरासमोरचं गवत साफ करवून घेणं. अनेक दिवसांचे कपडे धुऊन घेणं, कुठल्याशा भाई लोकांच्या मोठय़ा मुलांच्या अत्याचाराला सातत्याने बळी पडणं, लैंगिक शोषण, हा या मुलांच्या आयुष्यातला नित्याचा भाग, हवालदार, इन्स्पेक्टर, एकूणच सरकारी यंत्रणा प्लॅटफॉर्मवरील मुलांशी ज्या अमानुषतेने वागते, त्यातून विघातक शक्तींशी या मुलांचा समेट का नि कसा घडतो हे सहजच लक्षात येतं.</span><br />
<span style="font-size: large;"><br />
</span><br />
<span style="font-size: large;">सगळ्यांचंच जगणं असं उसवलेलं असलं तरी त्यात आपला विरंगुळा- आनंद शोधणारी मुलं, त्यांच्यातली शेरो-शायरी, हिंदी चित्रपटांचा प्रचंड प्रभाव, त्यातून त्यांच्या तयार झालेल्या लकबी, माणसांची होणारी पारख, खऱ्या-खोटय़ाची जाण, त्यांचं ‘लाइफ’ आपापल्या व्याख्या घेऊन आलेलं त्यांचं केवळं शरीर आणि निरागस मन अनेकांनी कुस्करून टाकल्याने थोडीफार शिल्लक राहिलेली संवेदना घेऊन जगणारी प्लॅटफॉर्मवरची मुलं.</span><br />
<span style="font-size: large;"><br />
</span><br />
<span style="font-size: large;">वाचकाला या पुस्तकातील भाषा भुरळ घालते. त्या मुलांची अभिव्यक्ती.. त्यात शिव्या आहेत. हिंदी येते, पण ‘मुंबय्या.’ क्वचित त्यांची म्हणून बोली त्यात डोकावते. निवेदन आणि संवाद प्लॅटफॉर्मच्या निराळ्या हिंदीने लपेटून घेतले आहेत. भाषेचा हा लहेजा हे या पुस्तकाचं नक्कीच निराळं वैशिष्टय़ ठरेल.</span><br />
<span style="font-size: large;"><br />
</span><br />
<span style="font-size: large;">शोषणकर्त्यांबरोबरच समजून घेणाऱ्या दिनेश सरांची व्यक्तिरेखा मुलांबरोबर वाचकाला दिलासा देते. शेकडो करपलेल्या मुलांची भावनिक- शारीरिक- मानसिक गरज जाणून घेणारे सर किंवा त्या मुलांच्या नातलगांपर्यंत त्यांना पोहोचवू पाहणारे अंकल. त्यांच्यासाठी या मुलांचं बाह्य़ वर्तन तिरस्करणीय नसतं, त्यांचं दिसणं, वावरणं, तोंडातल्या अर्वाच्य शिव्या, व्हिडीओ पाहणं, ‘सोल्युशन’ पिणं, तीन पत्तीचा डाव मांडणं, बिडी-सिगारेट फुंकणं, राडा करणं, चोरी करताना पकडलं जाणं या गोष्टींमुळे या मुलांबद्दलची प्रतिमा संवेदनकर्त्यांकडून खराब होण्याचा प्रश्न नसतो. दिनेश सरांना आणि अंकलना मुलांचं जगण्याचं तत्त्वज्ञान ठाऊक असतं. वाचकही या तत्त्वज्ञानाशी समरस होत जातो.</span><br />
<span style="font-size: large;"><br />
</span><br />
<span style="font-size: large;">समकालीन प्रकाशनाने शोध पत्रकारितेला प्राधान्य देत गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांकडून उत्तमोत्तम साहित्य लिहवून घेतलं. हे पुस्तक याच पठडीतलं आहे. लेखिकेचा समकालीन प्रकाशन आणि युनिक फीचर्सशी जवळचा संबंध आहे. स्टेशनवर आयुष्य काढणाऱ्या मुलांबरोबरचं तिचं काम तिला पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावंसं वाटलं याची लेखिकेने काही कारणं सांगितली आहेत. भारताचं आशास्थान आणि ‘तरुण भारत’ म्हणून गौरवलं जात असलेल्या या लोकसंख्येला आपण कसं वागवत आहोत; त्यांच्याकडे, त्यांच्या गरजांकडे, हक्कांकडे कसं बघितलं जात आहे, हे सांगताना भारतातील सुमारे पन्नास कोटी मुलं जगण्याच्या संदर्भात आपलं बालपण हरवून जाताना दिसतात, असं आकडेवारीवरून ती स्पष्ट करते. आजची आपली व्यवस्था या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा, विकासाचा हक्क मिळवून देण्यात अंमलबजावणीच्या पातळीवर अपयशी ठरते. हेही लेखिका स्पष्टपणे मांडते. पण यात सर्वसामान्य सुजाण नागरिकाची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. एखाद्या बिसलेरी बाटलीसारखा या मुलांचा वापर करणारा समाजच त्यांच्या शोषणाला कारणीभूत आहे. बॉम्बस्फोट, एखादा दहशतवादी हल्ला, दंगल यांसाठी या मुलांचा जर वापर झाला तर कारणीभूत कोण, हा नक्कीच विचार करण्यासारखा भाग.</span><br />
<span style="font-size: large;"><br />
</span><br />
<span style="font-size: large;">स्टेशनवर सर्वच प्लॅटफॉर्मना क्रमांक असतात. झिरो किंवा शून्य या क्रमांकाचा प्लॅटफॉर्म अस्तित्वात नाहीच. या मुलांचा प्रवासच शून्यापासून शून्याकडे जाणारा, त्यांचा जगण्याचा प्लॅटफॉर्मच समाजाने काढून घेतलेला, या अर्थाने ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’ हे सूचक शीर्षक. या पुस्तकातील छायाचित्रं, मुखपृष्ठ, एकूण मांडणीचं श्रेय श्याम देशपांडे यांचं. त्यामुळेच दाहक वास्तवाची जळजळीत धग वाचकाला अनुभवता येते. पुस्तकाच्या संहितेचं डॉ. सुहास कुलकर्णी आणि अमृता वाळिंबे यांनी केलेलं उत्तम संपादन या पुस्तकाला अधिक वाचनीय बनवतं. चक्रव्यूहात अडकलेल्या या मुलांची सुटका पुस्तक वाचल्यानंतर तात्काळ होणं शक्य नाही. मात्र, सुटकेचा विचार मनात आला तरी अशा पुस्तकांची उपयुक्तता जाणवेल हे नक्की.</span><br />
<span style="font-size: large;"><br />
</span><br />
<span style="font-size: large;">-वृन्दा भार्गवे</span><br />
<span style="font-size: large;"><br />
</span><br />
<span style="font-size: large;"><b>प्लॅटफॉर्म नंबर झिरो </b></span><br />
<span style="font-size: large;">-अमिता नायडू </span><br />
<span style="font-size: large;">समकालीन प्रकाशन,पुणे </span><br />
<span style="font-size: large;">पृष्ठे : १५८ / मूल्य : १५० रुपये.</span><br />
<br />
<span style="color: yellow; font-size: medium;">हे पुस्तक सवलतीत खरेदी करण्यासाठी <a href="http://www.flipkart.com/books/RBKD34G7KG89CGN2?affid=pdongareya" target="_blank">इथे </a>भेट द्या!</span></div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-58115019065455056362012-02-25T21:31:00.001-08:002012-03-13T01:27:11.161-07:00आंधळ्या घुबडाची सावली:'The blind Owl' by Sadegh Hedayat<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgM66v4khvXCp2PDA4qbqqHQcozCdovisyPlD3z2kZepB4FMEllPl4Vfg8M9QLAYKdsgWzQC8enB2vRR0wie0D7Spm8HQiOsn7G5w1kG9Y9nwGo4ODeRmwQwxVAmPvZW2NBEV9W4GzUVnEQ/s1600/andhalya+ghubadachee+savli.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgM66v4khvXCp2PDA4qbqqHQcozCdovisyPlD3z2kZepB4FMEllPl4Vfg8M9QLAYKdsgWzQC8enB2vRR0wie0D7Spm8HQiOsn7G5w1kG9Y9nwGo4ODeRmwQwxVAmPvZW2NBEV9W4GzUVnEQ/s1600/andhalya+ghubadachee+savli.jpg" /></a></div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgy9mIgGMxx1JXln1cK0gK1v4d-Zav-zK94NBIw2uUEooWcga5ESBbnc6od79ZzCJ_cf38R4crhJJmVuhyphenhyphenO88vIGs4HxLQ2uwq8cBhGw7nTwKxeKYksPueH_J4mt6No11wcCmd2eVBquw7v/s1600/blind+owl+1.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgy9mIgGMxx1JXln1cK0gK1v4d-Zav-zK94NBIw2uUEooWcga5ESBbnc6od79ZzCJ_cf38R4crhJJmVuhyphenhyphenO88vIGs4HxLQ2uwq8cBhGw7nTwKxeKYksPueH_J4mt6No11wcCmd2eVBquw7v/s1600/blind+owl+1.jpg" /></a><span style="font-size: small;"><span style="background-color: white; color: black; font-family: '4C GandhiMarathi',Georgia,'Times New Roman',Times,serif; font-style: normal; font-variant: normal; letter-spacing: normal; line-height: 27px; margin: 0px; orphans: 2; outline-width: 0px; padding: 0px; text-decoration: none; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 2; word-spacing: 0px;"></span></span><br />
<span style="font-size: small;"><span style="background-color: white; color: black; font-family: '4C GandhiMarathi',Georgia,'Times New Roman',Times,serif; font-style: normal; font-variant: normal; letter-spacing: normal; line-height: 27px; margin: 0px; orphans: 2; outline-width: 0px; padding: 0px; text-decoration: none; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 2; word-spacing: 0px;"></span><span style="font-size: large;">फ्रान्समध्ये शिकलेले इराणी लेखक सादिक हिदायत यांच्यावर काफ्काचे संस्कार होतेच. काफ्काच्या साहित्यातली दु:स्वप्नसृष्टी हिदायतच्याही लेखनात- आणि विशेषत: </span></span><br />
<span style="font-size: large;">‘द ब्लाइंड आऊल’ या कादंबरीत ठळकपणे आढळते. १९३७ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आधुनिक फारसी कादंबरीचा मानदंड समजली जाते. आधुनिकतावादी इराणी कादंबरीची खरी सुरुवातही <br />
‘द ब्लाइंड आऊल’पासूनच झाली.<br />
काही पुस्तकं वाचताना गुंतवून ठेवतात. स्थळ-काळाचं भान नाहीसं करतात. आपण त्यांच्या संपर्कात असेपर्यंत इतर कसलाही विचार करू शकत नाही. इतर कुठल्याही गोष्टीत गुंतू शकत नाही. मात्र, वाचन संपलं की त्यांचा अंमल ओसरायला सुरुवात होते. त्यांनी दिलेल्या आनंदाची फिकट चव शिल्लक उरते. तीही काही दिवसांनी विरून जाते. ती पुस्तकं इतर पुस्तकांच्या मांडीला मांडी लावून आपल्या संग्रहात बसून राहतात. पण त्यांना पुन्हा उचलायची इच्छा होत नाही. कालांतरानं ती आपल्या संग्रहातून हद्दपार होतात.<br />
काही पुस्तकांचा प्रकार वेगळा असतो. ती वाचताना गुंतवून ठेवतातच असं नाही. उलट, त्यांचं वाचन ही त्रासदायक प्रक्रिया असते. त्यातून जाताना आपण सतत बेचन असतो. आपण वाचन अध्र्यावर थांबवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ते शक्य नाही, हे लक्षात येतं. आपण पुस्तकाच्या पुरते कब्जात गेलेले असतो. आता ते नेईल तिथे जाण्यावाचून पर्याय नसतो. ही पुस्तकं वाचून झाल्यावर खऱ्या अर्थानं सुरू होतात. ती आपल्या जगण्यात रुजतात. वाढतात. बहरतात. त्यांची सावली कायम आपली सोबत करते. अशा पुस्तकांनाच ‘अभिजात’ हे विशेषण लावता येतं.<br />
सादिक हिदायत (Sadegh Hedayat) या इराणी लेखकाची ‘द ब्लाइंड आऊल’ (The blind Owl) ही या प्रकारात मोडणारी कादंबरी. १९३७ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आधुनिक फारसी (Persian) कादंबरीचा मानदंड समजली जाते. इराणी कादंबरीची खरी सुरुवातही ‘द ब्लाइंड आऊल’पासूनच झाली. तोपर्यंत इराणमध्ये केवळ मनोरंजक आणि ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या जात होत्या. आपल्याकडच्या नाथमाधव किंवा दातारशास्त्रींप्रमाणे! ‘द ब्लाइंड आऊल’नं इराणी वाचकाला खडबडून जागं केलं. त्याला पहिल्यांदा कादंबरी या वाङ्मयप्रकाराच्या ताकदीची कल्पना आली. इराणमधील रझा राजवटीत लिहिल्या गेलेल्या या कादंबरीवर तिथे अगदी काल-परवापर्यंत बंदी होती. आता मात्र ही कादंबरी नवइराणी साहित्याचा मानदंड समजली जाते.<br />
या कादंबरीची संहिता दोन भागांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या भागाचा निवेदक एक चित्रकार आहे. तो पेनच्या आवरणांवर चित्रं काढत असतो. हे चित्र कायम एकच असतं. एक दाढीवाला भारतीय पोशाखातला म्हातारा झाडाखाली उभा. त्याच्यासमोर उभ्या असलेल्या तरुणीला तो तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याची खूण करतो आहे. चित्रकाराला हे चित्र वारंवार स्वप्नात दिसतं. झपाटून टाकतं. मात्र, त्याचा अर्थ कळत नाही. एक दिवस चित्रातली तरुणी थेट त्याच्या दारातच अवतरते. तो तिला घरात घेतो. घरात तिचा गूढ मृत्यू होतो. त्यानं तो बावचळून जातो. मात्र, त्याला तिचं चित्र काढण्याचा मोह आवरत नाही. त्यानं चित्र काढायला सुरुवात केल्यावर ती जिवंत झाल्यासारखी डोळे उघडते आणि पुन्हा प्राण सोडते. तो तिच्या प्रेताचे तुकडे करून ट्रंकेत भरतो आणि दफन करण्यासाठी कब्रस्तानात नेतो. तिथला म्हातारा रखवालदार दफनासाठी खड्डा खणतो. त्यात एक प्राचीन सुरई सापडते. तिच्यावरचं चित्र नायक पेनच्या आवरणावर काढत असलेल्या चित्रासारखंच असतं. म्हातारा ती सुरई नायकाला भेट देऊन टाकतो. नायक घरी येतो. त्या रहस्यमय तरुणीची आठवण त्याला बेचैन करत राहते. ती विसरण्यासाठी तो भरपूर अफू घेतो आणि बेशुद्ध पडतो. कादंबरीचा पहिला भाग इथे संपतो. दुसऱ्या भागात नायक शुद्धीवर येतो, तो एका वेगळ्याच विश्वात.<br />
इथे तो चित्रकार नसून लेखक आहे. त्याचं लग्न झालेलं आहे आणि बायको आपल्याशी प्रतारणा करत असल्याच्या संशयावरून हय़ानं तिचा खून केलेला आहे. तो शुद्धीवर येतो तेव्हा त्याचे हात रक्तानं माखलेले असतात आणि आतल्या खोलीत बायकोचं प्रेत पडलेलं असतं. त्याच्या घराबाहेर बसलेला भिकारी अगदी पहिल्या भागातल्या म्हाताऱ्याची आठवण करून देणारा. कादंबरीत यापुढे अनेक उपाख्यानं एकमेकांत गुंतून येतात. शेवटी नायक आरशात बघतो तेव्हा आपला चेहरा अगदी त्या म्हाताऱ्यासारखाच झाला आहे असं त्याला वाटतं.<br />
अत्यंत गुंतागुंतीची संरचना असलेल्या या कादंबरीचा हा केवळ ढोबळ आराखडा. तिचं खरं रूप वर्णन करणं जवळजवळ अशक्य आहे. स्वप्न आणि भास यांच्या संधिप्रकाशातलं निवेदन, निवेदकाची अविश्वसनीयता, दोन्ही भागांचीप्रतिबिंबासारखी रचना आणि संपूर्ण कादंबरीत पसरलेलं पलूदार प्रतिमांचं जाळं.. या सगळ्यांमुळे ही कादंबरी वाचकाला सतत सतर्क राहायला भाग पाडते. काही प्रतिमा आणि पात्रं दोन्ही भागांत वेगवेगळ्या रूपांत येतात. म्हातारा पहिल्या भागात स्मशानाचा रखवालदार असतो. त्याच भागात आधी आलेलं लेखकाच्या काकांचं वर्णनही याच म्हाताऱ्याशी जुळणारं, तर दुसऱ्या भागात हाच म्हातारा निवेदकाच्या घरासमोर भीक मागताना दिसतो. पहिल्या भागात नायक पेनवर काढत असलेलं चित्र त्याला स्वप्नात दिसतं. त्यातला म्हाताराही याच प्रकारचा. पहिल्या भागातली गूढ तरुणी आणि दुसऱ्या भागातली लेखकाची बायको यासुद्धा अशा एकमेकींच्या प्रतिबिंबा सारख्या. पहिल्या भागात म्हाताऱ्यानं नायकाला दिलेली सुरई आणि दुसऱ्या भागातल्या म्हाताऱ्या भिकाऱ्यानं दिलेला वाडगा हेही अशा प्रतिबिंबित प्रतिमेचं उदाहरण.<br />
कथासूत्रातली संदिग्धता हे लेखकाचं कादंबरीचा आशय वाचकांपर्यंत पोहचविण्याचं साधन असावं, असं ‘द ब्लाइंड आऊल’ वाचताना वाटत राहतं. पहिल्या भागात शुद्ध हरपलेला नायक दुसऱ्या भागात शुद्धीवर येतो. पण दुसऱ्या भागाचं स्वरूपही स्वप्नवत असल्यामुळे वास्तव काय आणि स्वप्न कोणतं, हे वाचकाला नीट कळत नाही. कदाचित दोन्ही स्वप्नं असून, वास्तव तिसरंच असू शकेल, किंवा दोन्ही एकाच वेळी घडणारी समांतर वास्तवं असतील. ते ठरवण्याचं स्वातंत्र्य वाचकाचं. लेखक ते हिरावून घेत नाही.<br />
स्वतच्या उत्कट भावनांचा आविष्कार कोणत्याही वाङ्मयीन संकल्पनेपेक्षा महत्त्वाचा मानणं, हे जर अभिव्यक्तीवादाचं मुख्य सूत्र असेल, तर ही कादंबरी नक्कीच अभिव्यक्तीवादी आहे. हिदायत ज्या काळात लिहीत होता, तो युरोपमध्ये अभिव्यक्तीवादी लेखनाला प्रोत्साहक असा काळ होता. काफ्काच्या साहित्यानं तरुण लेखकांना प्रभावित करायला सुरुवात केली होती. फ्रान्समध्ये शिकलेल्या हिदायतवरसुद्धा काफ्काचे संस्कार होतेच. काफ्काच्या साहित्यातली दु:स्वप्नसृष्टी हिदायतच्याही लेखनात, आणि विशेषत: या कादंबरीत ठळकपणे आढळते. हिदायतनं काफ्काच्या ‘मेटामॉर्फसिस’चा फारसी अनुवादही केलेला आहे. तो स्वतला काफ्का आणि पो यांचा वंशज मानायचा. या दोघांची गुणसूत्रं त्याच्या साहित्यात सापडतात हे खरं. त्यामुळे हिदायत हा केवळ युरोपियन प्रभाव आत्मसात करून लिहीत होता, असं म्हणणं अन्यायकारक ठरेल. हिदायतचा इस्लामपूर्व इराणी संस्कृतीचा खोल अभ्यास होता. अकराव्या शतकातला फारसी कवी मानुचेहरी याच्या कवितेचे संस्कारही हिदायतच्या साहित्यावर झालेले होते. ‘द ब्लाइंड आऊल’मधलं नायकानं काढलेलं चित्र मानुचेहरीच्या ‘मुसम्मत’ या दीर्घकवितेतल्या एका प्रसंगाचं आहे. व्यवस्थेविरोधातली बंडखोरी आणि नव्या वाङ्मयीन परंपरेचं प्रवर्तन हे या दोघांना जोडणारे आणखी काही दुवे. मानुचेहरीनं फारसी दरबारी कवितेचं स्वरूप संपूर्ण बदललं. ‘राजाचा स्तुतिपाठक’ ही कवीची ओळख पुसून त्यानं तत्कालीन सामाजिक वास्तव पहिल्यांदा कवितेत आणलं. हिदायतनं इराणी कादंबरीत नवीन प्रवाह सुरू केला. तो पुढे वाढला आणि समृद्ध झाला. त्यातूनच पुढे इराणी नवकादंबरीची ठिणगी पडली.<br />
‘द ब्लाइंड आऊल’विषयी आपल्याला जिव्हाळा वाटेल अशी आणखी एक गोष्ट आहे. १९३७ ते १९३९ या काळात हिदायत मुंबईत मुक्कामाला होता. याच काळात त्यानं ‘द ब्लाइंड आऊल’ लिहून पूर्ण केली आणि तिची मर्यादित प्रतींची आवृत्ती मुंबईतच प्रकाशित केली. या प्रतींवर ‘नॉट फॉर सेल इन इराण’ असा शिक्का मारलेला आहे. ती इराणमध्ये प्रकाशित व्हायला बराच काळ जावा लागला.<br />
हिदायतच्या मुंबईतल्या वास्तव्यात त्याला हिंदू,तसंच बौद्ध संस्कृतीविषयी आपुलकी निर्माण झाली. त्याचे पडसाद ‘द ब्लाइंड आऊल’मध्येही उमटलेले दिसतात. कादंबरीच्या पहिल्या भागात नायकाची आई हिंदू नर्तकी असल्याचा संदर्भ येतो. दुसऱ्या भागात लेखकाच्या खोलीत बुद्धाची मूर्ती असल्याचा उल्लेख येतो. कादंबरीच्या द्विदल रचनेत द्वैतवादाच्या खुणा आढळतात.<br />
हिदायतचं आयुष्य मानसिक अस्थैर्यानं ग्रासलेलं होतं. उत्तरायुष्यात तो अफूच्या आहारी गेला. निराशावाद तर त्याच्या स्वभावातच होता. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यानं पॅरिसमध्ये स्वतला गॅसनं बंद केलेल्या खोलीत कोंडून आत्महत्या केली. या घटनेमुळे ‘द ब्लाइंड आऊल’ अशुभ आहे, अशी समजूत अनेक वर्षांपर्यंत इराणमध्ये प्रचलित होती. वाचकाला झपाटण्याची या कादंबरीची ताकद पाहता ती खरी असावी, असं मानायला जागा आहे.</span><br />
<br />
<span style="font-size: x-large;">कादंबरी:</span><span style="font-size: x-large;"><span style="color: #ffd966;">‘द ब्लाइंड आऊल’</span>(The blind Owl) </span><br />
<span style="font-size: x-large;">लेखक </span><span style="font-size: x-large;">: <span style="color: #ffd966;">सादिक हिदायत</span>(Sadegh Hedayat) </span><br />
<br />
<span style="font-size: large;">हे पुस्तक सध्या मराठीत उपलब्ध नाही.अद्याप त्याचा मराठीत अनुवाद कोणी केलेला नाही</span><br />
<span style="font-size: large;">Buy The Blind Owl (Imported Edition:English) from <a href="http://www.flipkart.com/books/0802144284?affid=pdongareya" target="_blank">Here</a></span><br />
<br />
<span style="font-size: small;">[This review of the novel 'The Blind Owl' :Author </span><span style="font-size: large;"><span style="font-size: small;">Sadegh Hedayat,is written by Mr.Nikhilesh Chitre for Loksatta daily]</span></span></div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-92128011197225905502012-02-15T23:00:00.000-08:002012-02-15T23:00:02.781-08:00शेक्सपीअरच्या शोकांतिकांचे कथारूप<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjFqHx7vrP8e-T4KamQU8c0FB_GltTEcc23g6gRWIU5szBxYMHy7hvVRgO6lTWshRXOQR1PoKYnlGOnpvvLBBEFbkMGmsdGeX6VDLiLuGph2KR3ViRzRuRIyONLYW5tU3QT4SeouLRqXjtR/s1600/katharup+shekspeer.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjFqHx7vrP8e-T4KamQU8c0FB_GltTEcc23g6gRWIU5szBxYMHy7hvVRgO6lTWshRXOQR1PoKYnlGOnpvvLBBEFbkMGmsdGeX6VDLiLuGph2KR3ViRzRuRIyONLYW5tU3QT4SeouLRqXjtR/s1600/katharup+shekspeer.jpg" /></a></div><br />
<div style="text-align: -webkit-auto;"></div><span style="font-size: large;"><span style="font-family: '4C GandhiMarathi', Georgia, 'Times New Roman', Times, serif; line-height: 27px;">मानवी मनोव्यापाराचे लहानसहान असंख्य पदर उलगडून दाखविणारा शेक्सपीअर (William Shakespeare)</span><span style="font-family: '4C GandhiMarathi', Georgia, 'Times New Roman', Times, serif; line-height: 27px;">हा देश, धर्म, प्रांत आणि संस्कृतीच्या पल्याड पोचला तो त्याच्या अजरामर नाटय़ आणि साहित्यकृतींनी! मानवी भावभावना आणि त्यातील नातेसंबंधांचे गुंते हे कुठल्याही संस्कृतीत सारखेच असतात, यावर जणू शेक्सपीअरच्या असंख्य व्यक्तिरेखांनी शिक्कामोर्तब केलं आहे. कालातीत ठरलेल्या या नाटय़कृतींचा गोष्टीवेल्हाळ कथास्वरूपात आस्वाद घेण्याची संधी मराठी वाचकांना ‘कथारूप शेक्सपीअर’ या ग्रंथरूपात मिळाली आहे. प्रभाकर देशपांडे साखरेकर लिखित ‘कथारूप शेक्सपीअर (खंड १)’ हा ग्रंथ औरंगाबादच्या ‘जनशक्ती वाचक चळवळ’ने प्रकाशित केला आहे. या कथाखंडात शेक्सपीअरच्या ‘रोमिओ अॅण्ड ज्युलिएट’, ‘हॅम्लेट’, ‘ऑथेल्लो’, ‘किंग लियर’, ‘मॅकबेथ’, ‘ज्युलियस सीझर’, ‘अँटनी अॅण्ड क्लिओपात्रा’ या सात शोकान्तिकांचा समावेश आहे.</span><span style="font-family: '4C GandhiMarathi', Georgia, 'Times New Roman', Times, serif; line-height: 27px;"> </span></span><br />
<div style="font-family: '4C GandhiMarathi', Georgia, 'Times New Roman', Times, serif; line-height: 27px;"><span style="font-size: large;">रसाळ, ओघवत्या शब्दांमध्ये कथन केलेल्या शेक्सपीअरच्या नाटय़कृतींतील गोष्टी असं या पुस्तकाचं वर्णन करता येईल. प्रत्येक कथेतील पात्रांची स्वभाववैशिष्टय़े, स्थल-काळाचे वर्णन, राजे, राण्या, राजपुत्र, प्रधान, सैनिक, दास-दासी असा कथानकाचा अपरिहार्य भाग असलेल्या सर्व व्यक्तिरेखा वाचकांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहतील, असे त्यांचे रूप या कथांमधून मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. </span></div><div style="font-family: '4C GandhiMarathi', Georgia, 'Times New Roman', Times, serif; line-height: 27px;"><span style="font-size: large;">शेक्सपीअरच्या या अनुवादित शोकान्तिकांमध्ये मराठी वाक्प्रचार, म्हणी आणि बोलीभाषेचा चपखल वापर केलेला पुस्तकात जागोजागी आढळतो. त्यामुळेच त्या वाचताना अनुवाद आणि कथाकथन यांची सुंदर सरमिसळ झाल्याचे अनुभवास येते. प्रत्येक कथेत चितारलेले प्रसंग, त्यातील पात्रांचे संवाद, त्यातून उभे राहणारे नाटय़ या पुस्तकात पानोपानी भेटते. </span></div><div style="font-family: '4C GandhiMarathi', Georgia, 'Times New Roman', Times, serif; line-height: 27px;"><span style="font-size: large;">शेक्सपीअरच्या नाटकांचा हा कथारूप अनुवाद करताना वाचकाला मूळ नाटक वाचल्याचा आनंद मिळावा, यादृष्टीने काही पदरची वाक्ये आपण अभावितपणे लिहिल्याची कबुलीही देशपांडे यांनी पुस्तकाचे मनोगत व्यक्त करताना दिली आहे. हे पुस्तक लिहिताना शेक्सपीअरच्या साहित्यावर वा त्यांच्या नाटकांवर भाष्य करण्याचा, त्यांची चिकित्सा करण्याचा मोह आवरून मूळ नाटकातील आशय वाचकांपर्यंत जसाचा तसा नेमक्या पद्धतीने कसा पोचेल, याबाबतही अनुवादक आग्रही राहिला आहे, हे विशेष.</span></div><div style="font-family: '4C GandhiMarathi', Georgia, 'Times New Roman', Times, serif; line-height: 27px;"><span style="font-size: large;">शेक्सपीअरने आपल्या नाटकांतून उभ्या केलेल्या अजरामर काल्पनिक पात्रांमधील संघर्ष, त्यांची महत्त्वाकांक्षा, नेतृत्वगुण, चारित्र्य, भावभावना यासंबंधीचे गुंतागुंतीचे विश्लेषण साध्या-सोप्या मराठीतून करणे खरेच कठीण होते. मात्र, हे शिवधनुष्य पेलण्याचा स्तुत्य प्रयत्न प्रभाकर देशपांडे यांनी यानिमित्ताने केला आहे. काही ठिकाणी मात्र त्यात एकजिनसीपणा आढळत नाही. ‘नाटय़ की कथा’ नेमक्या कुठल्या प्रकारात मांडायचीय, या घोळात अनुवादक चाचपडतोय आणि त्यामुळे कथा सांगताना ती कुठल्या ‘काळा’त लिहायची, हा संभ्रम काही ठिकाणी असल्याचं जाणवतं. मात्र, या त्रुटी अगदीच क्षुल्लक व नगण्य आहेत. या पुस्तकाद्वारे एक अत्यंत महत्त्वाचं काम लेखकाने शेक्सपीअरच्या सकस नाटकांच्या कथारूपी अनुवादाने केले आहे. </span></div><div style="font-family: '4C GandhiMarathi', Georgia, 'Times New Roman', Times, serif; line-height: 27px;"><span style="font-size: large;"><br />
</span></div><div style="font-family: '4C GandhiMarathi', Georgia, 'Times New Roman', Times, serif; line-height: 27px;"><span style="font-size: large;">शेक्सपीअरने रंगविलेल्या अनेकानेक व्यक्तिरेखा, त्यांची वर्तणूक, त्यातून दिसणारे त्यांचे स्वभावदर्शन या साऱ्याचा परिचय मराठी वाचकांना यानिमित्ताने कथारूपात पुन्हा एकदा होत आहे. </span></div><div style="font-family: '4C GandhiMarathi', Georgia, 'Times New Roman', Times, serif; line-height: 27px;"><span style="font-size: large;"><br />
</span></div><div style="font-family: '4C GandhiMarathi', Georgia, 'Times New Roman', Times, serif; line-height: 27px;"><span style="font-size: large;"><span style="font-family: 'Times New Roman'; line-height: normal; text-align: left;">-सुचिता देशपांडे,लोकसत्ता ,रसग्रहण</span> </span></div><div style="font-family: '4C GandhiMarathi', Georgia, 'Times New Roman', Times, serif; line-height: 27px;"><span style="font-family: 'Times New Roman'; line-height: normal; text-align: left;"><span style="font-size: large;"><br />
</span></span></div><div style="font-family: '4C GandhiMarathi', Georgia, 'Times New Roman', Times, serif; line-height: 27px;"><span style="font-size: large;"><b>कथारूप शेक्सपिअर</b> -(खंड १- सात शोकांतिका),</span></div><div style="font-family: '4C GandhiMarathi', Georgia, 'Times New Roman', Times, serif; line-height: 27px;"><span style="font-size: large;">-प्रभाकर देशपांडे साखरेकर</span></div><div style="font-family: '4C GandhiMarathi', Georgia, 'Times New Roman', Times, serif; line-height: 27px;"><span style="font-size: large;"> जनशक्ती वाचक चळवळ,</span></div><div style="font-family: '4C GandhiMarathi', Georgia, 'Times New Roman', Times, serif; line-height: 27px;"><span style="font-size: large;"> पृष्ठे- २५६, किंमत- २०० रु.</span></div></div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-32652748382067497952012-02-15T00:17:00.000-08:002012-02-15T00:17:00.073-08:00व्योमकेश बक्षी - बंगाली रहस्यकथांचा ओघवता अनुवाद<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEijI0zwwnqrkC1yyWHwGjYPz73bBzTvJH6eHBva065WCgsXgHCrBgNRutEGUX9Q3aGknOyqkF6LaQnKv5vVFjeo_8RVgzgQVZuYCSzf0I6LcEyQFKTkaS1oN0_wzoNs8BLKy-tmN3-jIFyb/s1600/9789380361635.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEijI0zwwnqrkC1yyWHwGjYPz73bBzTvJH6eHBva065WCgsXgHCrBgNRutEGUX9Q3aGknOyqkF6LaQnKv5vVFjeo_8RVgzgQVZuYCSzf0I6LcEyQFKTkaS1oN0_wzoNs8BLKy-tmN3-jIFyb/s1600/9789380361635.jpg" /></a></div><span style="font-size: large;">शरदिन्दू बंडोपाध्याय हे बंगाली रहस्यकथांच्या विश्वातलं गाजलेलं नाव. व्योमकेश बक्षी हा त्यांचा डिटेक्टिव्ह. बंगालीत अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या शरदिन्दू बंडोपाध्याय यांच्या या व्योमकेश बक्षीच्या गाजलेल्या रहस्यकथा रोहन प्रकाशननं मराठी वाचकांसाठी तीन भागांत आणलेल्या आहेत. मराठीत त्यांचा अनुवाद हा सुप्रसिद्ध अनुवादक अशोक जैन यांनी केलेला आहे. सत्यजित राय यांच्या ‘फेलुदां’च्या बारा पुस्तकांचा अनुवाद यापूर्वी जैन यांनीच केलेला आहे आणि ‘रोहन’तर्फेच हा पुस्तकांचा संच प्रसिद्ध झालेला आहे. त्याच दर्जेदार परंपरेतला हा व्योमकेश बक्षीचाही संच म्हणता येईल.<br />
‘व्योमकेश बक्षी’ आपल्याला तसा नवीन नाही. १९९३ साली बासू चटर्जी यांनी दूरदर्शनवर रजित कपूरला घेऊन व्योमकेश बक्षी हिंदी मालिकेत आणलेला होता आणि ती दूरदर्शन मालिका खूप गाजली होती. जाणकारांनीही या मालिकेला आणि रजित कपूरच्या अभिनयाला चांगली दाद दिली होती. मालिका पाहण्यापेक्षा या रहस्यकथा वाचतानाचा अनुभव वेगळा आहे. कथेतील रहस्य आणि ते सोडविताना व्योमकेश आपल्या तल्लख बुद्धिमत्तेची जी चमक दाखवितो, त्यामुळे ती रहस्यकथा वाचताना वेगळीच मजा येते. त्याची शोध घेण्याची पद्धत तर्कसुसंगत असते आणि एकेक करीत कथेतला तपशील आपल्यासमोर येत राहतो. कथेतली रहस्यं टप्प्या-टप्प्याने उलगडत जात असल्याने वाचक कथा वाचताना गुंगून जातो.<br />
या कथा लिहीत असताना शरदिन्दूंच्या डोळ्यांसमोर शेरलॉक होम्स आहे, हे उघड आहे. तिथे शेरलॉक होम्सच्या मदतीला वाटसन आहे तर इथे अजित आहे आणि अजितच्या तोंडूनच सारा कथाभाग आपल्याला समजतो. शेरलॉक होम्सचा खूपच प्रभाव शरदिन्दूंवर आहे, पण तरीही या अस्सल बंगाली रहस्यकथा आहेत. फक्त कथा कोलकाताच्या आसपास घडतात म्हणून नाही तर कथेतील वातावरण अस्सल बंगाली आहे.<br />
१९३२ साली ‘पाथेर काटा’ (या पुस्तकात ‘काटे’री रहस्य) ही कथा लिहून शरदिन्दूंनी रहस्यकथेची वाटचाल सुरू केली. छातीत घुसणारी ग्रामोफोनची सुई आणि तिच्याद्वारे होणारा खून, हा वेगळा प्रकार आहे. शरदिन्दूंच्या साऱ्याच रहस्यकथांमध्ये बरेचसे खून कसे घडवून आणलेले आहेत, हे पाहणं मोठं मनोरंजक ठरेल. व्योमकेश बक्षी याला आपल्याला ‘डिटेक्टिव्ह’ म्हणवून घेणं पसंत नाही. तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ म्हणवून घेतो. काही जण १९३३ साली शरदिन्दूंनी लिहिलेली ‘सत्यान्वेषी’ हीच त्यांची पहिली रहस्यकथा मानतात. ही कथा घडते कोलकत्याच्या बकाल भागात असलेल्या एका बोर्डिग हाऊसमध्ये. तिथं कथेचा निवेदक अजित राहत असतो. काही दिवसांनी अतुल चंद्र मित्रा हा तरुण येतो आणि अजित याचा रूमपार्टनर म्हणून राहू लागतो. हा बेकार तरुणच पुढे खुनाचं रहस्य उलगडतो आणि नंतर आपलं खरं नाव ‘व्योमकेश बक्षी’ असल्याचं जाहीर करतो आणि अजितला तो पुढे आपल्या बोर्डिग हाऊसमध्ये घेऊन जातो. व्योमकेशला त्याची बायको सत्यवती मिळते तीही अशाच एका खुनाच्या तपासातून. त्या कथेचं नाव आहे - ‘अर्थमनार्थम्’ (मृत्युपत्रानेच घेतला बळी). सत्यवतीच्या भावावर खुनाचा आरोप जवळजवळ पक्का झालेला असतो. ती व्योमकेशला भावाला वाचविण्याची विनंती करते. त्या तपासा दरम्यान सत्यवती आणि तो अधिक जवळ येतात. सत्यवती त्याची बायको झाल्यावर त्या दोघांच्यात झडणारे संवाद वाचून त्या काळात बंगालमधल्या भद्रलोकांमधील नवरा-बायकोचे संबंध कसे मोकळेपणाचे होते, हे आपल्या लक्षात येते.<br />
या तीन पुस्तकांत शरदिन्दूंच्या बारा कथा आपल्याला वाचायला मिळतात. त्यात त्यांच्या ‘शोजारूर काँटा’ (साळिंदराचा काटा), ‘मकोरशार’ (टॅरंटुलाचं विष), ‘अग्निबाण’ (जीवघेणी ज्वाळा- भाग १), ‘उपसंहार’ (जीवघेणे ज्वाळा- भाग २), ‘चित्रचोर’ (चित्रचोर), ‘चिडीयाखाना’ (प्राणिसंग्रहालय) या गाजलेल्या रहस्यकथांचा समावेश आहे. आपल्या विशिष्ट अशा चित्रमय भाषाशैलीत शरदिन्दू या साऱ्या कथा सांगतात. त्यातली पात्रं आपल्या डोळ्यांसमोर उभी करतात. त्यामुळेच ‘चिडीयाखाना’वर सत्यजित राय यांनाही चित्रपट बनविण्याचा मोह झाला. <br />
या रहस्यकथांतील एखाद-दुसरी कथा सोडता बहुतेक कथा या कोलकात्याच्या परिसरात घडतात. व्योमकेश बक्षीला छोटय़ा चोऱ्या, किरकोळ खून असल्या गोष्टींत रस नसतो. त्यामुळे तो बऱ्याचदा घरी निवांत बसून असतो. हे निवांतपण त्या काळातल्या संथ जीवनाचाच एक भाग म्हणता येईल. आजच्यासारखे मोबाइल फोन तर सोडाच, पण लॅण्डलाइन फोन तरी घरोघर कुठे होते? त्यामुळे फोन करण्यासाठी एखाद्या श्रीमंत माणसाकडे जावं लागतं. इन्स्पेक्टरला निरोप द्यायचा असेल तर नोकराकरवी चिठ्ठी पाठवावी लागे. हे दोघे खून झाल्यावर घटनास्थळी जातात ते बसनं किंवा ट्रेननं. आजच्या काळात हे सारं वाचताना आपल्याला ‘पीरियड फिल्म’ पाहिल्यासारखीच वाटते. ‘या रहस्यकथा म्हणजे परदेशी कथांची इकडून तिकडून केलेली उचलेगिरी नसून त्यातल्या साऱ्या कल्पना या मूळच्या माझ्या आहेत आणि त्या कथा या पूर्णपणे माझीच निर्मिती आहे,’ असं शरदिन्दूंनी ठासून सांगितलेलं आहे.<br />
१९९९ साली शरदिन्दूंची जन्मशताब्दी साजरी झाली. त्यानिमित्ताने ‘पेंग्विन’ने त्यांच्या काही निवडक कथांचे अनुवाद इंग्रजीत प्रसिद्ध केले. अशोक जैन यांनी या इंग्रजी कथांचे अनुवाद केलेले आहेत. रहस्यकथेला साजेशा ओघवत्या मराठीत त्यांनी अनुवाद उतरवलेले आहेत. पण तरीही शॉवरला ‘तुषारस्नान’, पुस्तकाच्या शेल्फला ‘शिडाळी’, ग्रुप फोटोला ‘समूह फोटो’ असे काही गमतीशीर शब्द जैन यांनी का वापरले आहेत, ते समजत नाही. (‘सकाळचे साडेदहा वाजायला आले होते. उठून ‘तुषारस्नान’ घ्यावं, असा विचार करीत असतानाच टेलिफोनची घंटी अचानक वाजू लागली’ असं वाक्य वाचलं की बंगाली लोकांचं पान खाणंच अधिक आठवतं.)<br />
शरदिन्दू बंडोपाध्याय यांचा आणि महाराष्ट्राचा जुना ऋणानुबंध आहे. १९३२ साली त्यांनी लेखनाला सुरुवात केली. नंतर १९३८ साली ते चित्रपटासाठी पटकथालेखन करण्यासाठी म्हणून मुंबईला आले. ‘बॉम्बे टॉकीज’ आणि अन्य कंपन्यांसाठी त्यांनी लेखन केलं. १९५२ पर्यंत ते मुंबईत होते. नंतर चित्रपटासाठीचे लेखन थांबवून त्यांनी पुन्हा ललित लेखन करायचं ठरवलं. त्यांनी त्यासाठी पुण्याला स्थलांतर केलं. त्यांनी नंतरची १८ वर्षे बंगाली भाषेत भूतकथा, ऐतिहासिक प्रणयकथा, बालकथा असं विविध प्रकारचं लेखन केलं. आपलं उर्वरित आयुष्य त्यांनी पुण्यातच व्यतीत केलं. १९७० मध्ये त्यांचं पुण्यातच निधन झालं. पुण्याचा आणि महाराष्ट्राचा शरदिन्दूंशी असा जवळचा संबंध आलेला आहे.<br />
व्योमकेश बक्षींच्या तीन पुस्तकांच्या या संचाची निर्मिती रोहन प्रकाशननं त्यांच्या नेहमीच्या परंपरेला जागून देखणी केलेली आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांची देखणी मुखपृष्ठं लाभलेला हा तीन पुस्तकांचा संच रोहन प्रकाशननं आकर्षक गिफ्ट पॅकमध्येही उपलब्ध करून दिलेला आहे. जुन्या काळात घडत असणाऱ्या या उत्कंठावर्धक, रोमहर्षक कथा जुन्या वाचकांना तर आवडतीलच, पण आजच्या नव्या पिढीलाही त्या आकर्षित करतील आणि खिळवून ठेवतील.</span><br />
<br />
<span style="font-size: large;">-</span><span style="font-size: large;">मुकुंद टाकसाळे</span><br />
<i><span style="font-size: large;">व्योमकेश बक्षी - भाग १ (पृष्ठसंख्या - २०४) रु. १४०, व्योमकेश बक्षी - भाग २ (पृ सं - १७५) रु. १४०,व्योमकेश बक्षी - भाग ३ (पृ सं - १७८) रु. १४०, ३ भागांचा संच - रु. ३५०</span></i><br />
<b><span style="font-size: large;">व्योमकेश बक्षी</span></b><br />
<span style="font-size: large;"><b>लेखक</b> - शरदिन्दू बंडोपाध्याय<br />
<b>अनुवाद</b> - अशोक जैन</span><br />
<span style="font-size: large;"><b>प्रकाशक</b> - रोहन प्रकाशन</span><span style="font-size: large;"> </span><br />
<br />
<span style="color: yellow; font-size: large;">हे पुस्तक सवलतीत खरेदी करण्यासाठी <a href="http://www.flipkart.com/books/9380361666?affid=pdongareya" target="_blank">इथे </a>भेट द्या!</span></div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-12649294928470653312012-02-05T21:12:00.000-08:002012-02-05T21:12:00.651-08:00गॅलिलिओचे जीवन (Galileols Daughter - by Dava Sobel)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><b>सुरेश चांदवणकर</b><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgop25in6cZc6mdXKWNCUJC97FfuKp3NamUHCUpeNy8345artHpgvVFilalU-kwE02jWW6Vco_t2jJpAEpVJ7DlDBzBjtKAsaOOHnS5wcY3SBShTYJIxnc9PL1g-r6ewrbDl_tuvDLNUw7l/s1600/galilios+daughter.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="252" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgop25in6cZc6mdXKWNCUJC97FfuKp3NamUHCUpeNy8345artHpgvVFilalU-kwE02jWW6Vco_t2jJpAEpVJ7DlDBzBjtKAsaOOHnS5wcY3SBShTYJIxnc9PL1g-r6ewrbDl_tuvDLNUw7l/s320/galilios+daughter.jpg" width="320" /></a></div><span style="font-size: large;">‘गॅलिलिओ गॅलिली’ (१५६४-१६४२) हे नाव घेतलं की अनेकांना पिसाचा झुकता मनोरा व तिथल्या चर्चमध्ये झुलणाऱ्या दिव्यावरून त्याला सुचलेली लंबकाची संकल्पना पटदिशी आठवेल. सत्तरच्या दशकात जे विज्ञानात पदवी परीक्षेचा अभ्यास करत होते त्यांना ‘लाइफ ऑफ गॅलिलिओ’ हे बरटॉल्ट ब्रेख्तचं अवांतर वाचनासाठी पण लेखी परीक्षेकरिता नेमलेलं नाटक आठवेल. आज इंटरनेटच्या माध्यमातून त्याच्या कामाविषयी पुष्कळ माहिती शेकडो पानांमध्ये साठवून ठेवलेली वाचावयास मिळते. मात्र त्याच्या कुटुंबाविषयी फारच थोडी माहिती आढळते. देवा सोबल (kDeva Sobel) यांच्या ‘गॅलिलिओज् डॉटर’ या पुस्तकाने ही उणीव काहीशी भरून काढली आहे. त्या पत्रकार असून त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अक्षांश-रेखांशांची कल्पना मांडणारा जॉन हॅरिसन, सूर्य व पृथ्वीच्या स्थानांवरून व गतीबाबत धर्मपीठांशी संघर्ष ओढवून घेणारे कोपíनकस व गॅलिलिओ हे त्यांच्या खास अभ्यासाचे विषय असून लिखाणाचा बाज हा रसाळपणे गोष्टी सांगण्याचा असल्याने वाचकाला बांधून ठेवतो.<br />
प्रस्तुत पुस्तकात गॅलिलिओच्या कौटुंबिक जीवनाची माहिती मिळते. मरिना गांबा या व्हेनिसच्या सुंदर तरुणीबरोबरच्या विवाहबाहय़ संबंधांतून १६०० ते १६०६ या काळात त्यांना तीन मुलं झाली. मोठय़ा दोन मुली (व्हर्जििनया व लिव्हिया) व व्हिन्सेनझियो हा मुलगा. तोवर त्याच्या वयाची चाळिशी उलटून गेलेली होती. मुलं लहान असतानाच मरिना गांबा मरण पावली. १९२० च्या आसपास ग्रँड डय़ूकच्या मत्रीतून त्यानं मुलाचा बाप्तिस्मा करवून घेतला. मुलगा त्याच्या कुटुंबाबरोबर अखेपर्यंत गॅलिलिओबरोबरच राहिला. मात्र दोन मुलींच्या समाजमान्यतेविषयी शंका असल्यानं व काहीशा असुरक्षिततेच्या भावनेतून गॅलिलिओनं दोन्ही मुलींना १०-१२ वर्षांच्या असतानाच जोगतिणी (Nuns) बनवायचं ठरवलं. त्यासाठी पण त्याला बडय़ा लोकांच्या ओळखीचा आधार घ्यावा लागला होता. फ्लॉरेन्समधल्या कॉन्व्हेंटमध्ये दाखल करताना थोरल्या व्हर्जििनयाचं नाव बदलून Suor(सिस्टर)Maria Celeste Galile असं ठेवण्यात आलं. ती १९३४ मध्ये अवघ्या ३४ व्या वर्षी मरण पावली. कॉन्व्हेंटच्या बाहेरपण फारशी कधी पडली नाही. वडील कधीतरी येऊन भेटत. त्यांचं काम, राजघराण्याशी असलेली त्यांची मत्री व रोमच्या धर्मपीठानं दिलेली शिक्षा याविषयी ऐकीव माहितीच तिच्यापर्यंत पोहोचत असे. मात्र बापलेकीत नियमित पत्रव्यवहार होत असे. लेकीनं लिहिलेली १२४ पत्रं गॅलिलिओच्या जपून ठेवलेल्या कागदपत्रांतून अभ्यासकांच्या हाती लागली. मात्र बापानं लेकीला लिहिलेली पत्रं कॉन्व्हेंटच्या प्रमुख जोगतिणीनं जाळून टाकली. कारण गॅलिलिओ हा चर्चनं ठोठावलेली शिक्षा भोगणारा गुन्हेगार असल्यानं त्याची पत्रं सांभाळणं धोक्याचं ठरणारं होतं. त्यामुळं बापानं लिखाणातून व्यक्त केलेल्या भावना फारशा प्रकाशात आलेल्या नाहीत. पण इतरांशी केलेल्या पत्रव्यवहारातून ही मुलगी त्याची सर्वात लाडकी होती असं दिसतं.<br />
१९२४ ते १९३४ या १० वर्षांत ही पत्रं लिहिलेली असून मूळ इटालियन भाषेतली ही पत्रं लेखिकेनं इंग्रजीत रूपांतरित केलेली आहेत. मोठी मुलगी या नात्यानं आईच्या पश्चात वडिलांचं खाणंपिणं, कपडे, औषधं व भावनिक आधार याबाबत तिची जागरूकता या पत्रांतून पानोपानी जाणवते. या लिखाणाभोवतीच लेखिकेने या अनोख्या पिता-पुत्रीची कहाणी लिहिलेली आहे. यानिमित्ताने गॅलिलिओचं चरित्र, तत्कालीन रोमन साम्राज्यातल्या राजसत्ता व धर्मपीठ यांचे नातेसंबंध व वैज्ञानिकांची झालेली ससेहोलपट या गोष्टींचा आढावा घेण्यात आलेला आहे.<br />
एकूण सहा विभागांत व तेहतीस प्रकरणांत या ४०० पानी पुस्तकाची रचना केलेली असून रोमन काळातली रेखाचित्रं, नकाशे, शिल्पं इ.चा कल्पक वापर केलेला आढळतो. शेवटी काळानुसार महत्त्वाच्या नोंदी केलेल्या आहेत. त्या यादीवरून एक नजर टाकली तरी एक मोठा कालखंड डोळय़ांसमोरून जातो. उदा. कोपíनकसनं(१४७३-१५४३)सूर्य हा केंद्रस्थानी असून पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, असं आयुष्याच्या अखेरीस लिहून प्रसिद्ध केलं. त्यानंतर २१ वर्षांनी गॅलिलिओ जन्माला आला.१६०० साली कोपíनकसच्या पुढे जाऊन ब्रुनोनं (Bruno) सूर्य हा स्वयंप्रकाशित तारा आहे असं मांडलं. या प्रमादाबद्दल शिक्षा म्हणून रोमच्या धर्मपीठानं त्याला जिवंत जाळून मारलं. अशा दहशतीच्या वातावरणात काम करायचं आहे याचं भान गॅलिलिओला होतं. त्यामुळेच अतिशय सावधपणे राजसत्तेशी मत्री करून व धर्मसत्तेशी जुळवून घ्यायचं धोरण त्यानं अंगीकारलं होतं. याची अनेक उदाहरणं या पुस्तकात आढळतात. ग्रहगोलांची स्थानं व भ्रमणावरचं कोपíनकसचं काम पुढ नेत असताना गॅलिलिओचं इतर अनेक विषयातलं स्वतचं काम व अध्यापनाबरोबरच पुस्तकं लिहिणं पण चालूच होतं. <br />
स्वत: सश्रद्ध असूनही दुर्बणिीतून दिसणाऱ्या निराळय़ाच विश्वाचं दर्शन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं, अशी कळकळ त्याला होती. त्यामुळेच ‘दि डायलॉग’ हे संवादात्मक पुस्तक त्यानं लिहिलं व धर्मपीठाच्या परवानगीनंच १६३२ मध्ये प्रसिद्ध केलं. यात तीन मित्रांनी टोलेमी, कोपíनकस व गॅलिलिओच्या सिद्धांतांवरती गप्पा मारलेल्या आहेत. तेसुद्धा या तिघांची नावं न येऊ देता. त्याची भाषा ही अभिजनांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत कुणालाही समजेल अशीच आहे. त्यामुळेच त्यावर गदारोळ उठला. पुढच्याच वर्षी चौकशी होऊन त्यावर बंदी घालण्यात आली. त्या चौकशी समितीसमोर झालेली मूळ प्रश्नोत्तरं पुस्तकात दिलेली असून ती मुळातूनच वाचावीत अशीच आहेत. १९३३ मध्ये शिक्षा म्हणून चर्चची जाहीर माफी मागावी लागली व एकांतवासाला सुरुवात झाली. पण तोवर पुस्तकाच्या काही प्रती व इतर हस्तलिखितं गुपचूप युरोपातल्या इतर देशांत जाऊन पोहोचली होती. १९३४ साली त्याची मुलगी सिस्टर सेलेस्ते मरण पावली. पण या सगळय़ा मन:स्तापाच्या काळात तिची पत्रं हाच मोठा दिलासा गॅलिलिओला होता.सुमारे ८० वर्षांच्या आयुष्यात गॅलिलिओनं इटलीतल्या पिसा, रोम व फ्लॉरेन्स शहरांमध्येच काम केलं. त्याच्या आयुष्यात त्यानं केलेल्या कामाला मान्यता मिळाल्याचं त्याला पाहायला मिळालं नाही. पण त्याच्या पुस्तकांच्या माध्यमातनं हे काम इतरत्र पसरलं व आधुनिक ‘विज्ञानाचा जनक’ अशी कीर्ती त्याला मरणानंतर लाभली. त्याचा पट्टशिष्य टॉरिसेली यानं या कामी बराच पुढाकार घेतला. ते काम व्हिन्सेंझो व्हिव्हियानी (१६२२-१७०३) या आणखी एका शिष्यानं पुढं चालवलं. १६४२ मध्ये निधन पावलेल्या गॅलिलिओचं शव त्याच्या इच्छेप्रमाणं त्याच्या कुटुंबीयांच्या दफनभूमीत पुरण्यात आलेलं होतं. ते नव्या जागी सन्मानानं भव्य स्मारकात हलवलं जावं, याकरिता व्हिव्हियानीनं आयुष्यभर अयशस्वी खटपट केली. तो गेल्यावर त्याची शवपेटिका त्याच्या इच्छेप्रमाणं गुरू गॅलिलिओच्या शवपेटीवर पुरण्यात आली. पुढं अनेकांच्या प्रयत्नांना यश येऊन गॅलिलिओचं शव १७३७ मध्ये खास तयार केलेल्या स्थळी समारंभपूर्वक हलवण्यात आलं. त्यावेळच्या उत्खननात गॅलिलिओच्या शवपेटीखाली आणखी एक शवपेटी आढळली. ती पेटी पण सन्मानपूर्वक नव्या ठिकाणी हलवण्यात आली. आजही ती तिथं आहे पण तिच्यावर "Suor Maria Celeste Galilei" या नावाची पाटी मात्र नाही. १८३५ मध्ये त्याच्या ‘दि डायलॉग’ हय़ा पुस्तकावरची बंदी मागं घेण्यात आली. १९३५ मध्ये पोपच्या हस्ते व्हॅटिकन वेधशाळेचं (ऑब्झर्वेटरी) उद्घाटन झालं. त्यानं मांडलेले सिद्धांत व केलेली अनेक भाकितं आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर खरी उतरलेली आहेत. प्रस्तुत पुस्तकानं अनेक पारितोषिकं मिळवली. ते वाचून अलीकडेच खगोलशास्त्रांनी ‘शुक्रा’वरील एका विवराला (क्रेटरला) Suor Maria Celeste हे नाव दिलेलं आहे.</span><br />
<br />
<span style="font-size: small;">सौजन्य:<a href="http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=178952:2011-08-26-17-37-04&catid=34:2009-07-09-02-04-26&Itemid=11">लोकसत्ता</a></span></div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-88016562103346237882012-01-25T00:16:00.000-08:002012-01-25T00:16:00.815-08:00‘मूलाँ रूज’:अभ्यासू लालित्य जपणारी चरित्रकादंबरी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjZQE9NNMG47vZ20pAD77PPN-hEHdm8iFGF964YDGO5RPl2K2UWCbcdjqvR5boJlbmS-qO0qv0DNhNQzm9PpEe9nhEXgTYLCqeJuXH2MX8OM9szwaZ8qjyn4whF3TaVhnL8E5fvjl8m0t8a/s1600/mularuj.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjZQE9NNMG47vZ20pAD77PPN-hEHdm8iFGF964YDGO5RPl2K2UWCbcdjqvR5boJlbmS-qO0qv0DNhNQzm9PpEe9nhEXgTYLCqeJuXH2MX8OM9szwaZ8qjyn4whF3TaVhnL8E5fvjl8m0t8a/s1600/mularuj.jpg" /></a></div><span style="font-size: large;">पॅरिसच्या मोंमार्त् या उपनगरासारख्या भागात अनेक कलावंत राहात. त्यांच्या जीवनकहाण्या समजून घेताना कलेची ओळख व्हावी, किंवा उलटपक्षी, त्यांच्या कलेकडे साकल्याने पाहताना त्यांची जीवनचरित्रे समजावीत, असे त्या कलावंतांचे जगणे. म्हणजे यापैकी एखाद्या कलाकाराचा जीवनप्रवास समजून घेतला आणि त्याचे मनोव्यापार कसे होते याचा सुगावा घेतला, तरी त्याच्या कलेकडे पाहण्याची दृष्टी तयार होणारच, याची खात्री बाळगायला हरकत नाही. या खात्रीचे थेट प्रत्यंतर वाचकाला ‘मूलाँ रूज’ ही तुलूज लोत्रेक या चित्रकाराच्या जीवनावरील कादंबरी वाचताना येते.</span><br />
<span style="font-size: large;">मराठीजनांच्या चित्रकलाप्रेमाची राजधानी कोल्हापूर असेल, तर पॅरिस ही जगातल्या चित्रकलाप्रेमींची राजधानी म्हटली पाहिजे. विशेषत: विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जागतिक चित्रकलेवर अधिराज्य असलेल्या या कलानगरीने आज मात्र त्याकाळच्या जिवंत कलेतिहासाच्या राजधानीचे स्वरूप घेतले आहे. पॅरिसच्या मोंमार्त् या उपनगरासारख्या भागात अनेक कलावंत राहात. त्यांच्या जीवनकहाण्या समजून घेताना कलेची ओळख व्हावी, किंवा उलटपक्षी, त्यांच्या कलेकडे साकल्याने पाहताना त्यांची जीवनचरित्रे समजावीत, असे त्या कलावंतांचे जगणे. म्हणजे यापैकी एखाद्या कलाकाराचा जीवनप्रवास समजून घेतला आणि त्याचे मनोव्यापार कसे होते याचा सुगावा घेतला, तरी त्याच्या कलेकडे पाहण्याची दृष्टी तयार होणारच, याची खात्री बाळगायला हरकत नाही.<br />
या खात्रीचे थेट प्रत्यंतर वाचकाला ‘मूलाँ रूज’ ही तुलूज लोत्रेक या चित्रकाराच्या जीवनावरील कादंबरी वाचताना येते. आपल्याला तुलूज लोत्रेकची चित्रे माहीत असतीलच असे नाही. किंवा ती चित्रे पाहिली तरीही हे असेच का आहे, इतक्या भगभगीत रंगांत वा घाईने केल्यासारखे का रंगवले आहे, असे प्रश्नही आपल्याला पडू शकतात. अज्ञानाचे काही हक्क असतात, त्यातला हा. पण या अज्ञान-प्रदेशातून कुणीतरी आपल्याला तुलूज लोत्रेकच्या जन्मगावी नेते आहे, त्याला पॅरिसलाच का जावेसे वाटले याची चाहूल देऊन न थांबता पॅरिसमध्ये त्याच्या काळात नेते आहे, हे लक्षात आल्यावर आपणही- या चित्रकाराला लहानपणीचा आजार झाल्यावर त्याची वाढ कशी खुरटली आणि तो ठेंगू, कुरूप कसा राहिला, त्याचे रूप स्त्रीआसक्तीच्या आड कसे येत गेले, आणि त्याने केलेले प्रेम विफल कसे झाले, मग तो ‘अॅब्सिंथ’ नामक घातक दारूच्या व्यसनात कसा बुडाला, असायलममधून बरा होऊन परतल्यावरही दारू जवळ केल्याने अल्पायुषी कसा ठरला.. याची गोष्ट आवडीने वाचू शकतो. <br />
मात्र, हा अल्पायुषी शोकनायक एक चित्रकार आहे. त्याचे संदर्भ आपल्या माहितीपेक्षा कदाचित निराळेही आहेत. विख्यात चित्रकार व्हॅन गॉग हा त्याचा सहप्रवासी; तर एदगर देगा, कामिय् पिसारो आणि पॉल गोगँ हे ज्येष्ठ समकालीन. त्यावेळचे अनेक बिगरविख्यात चित्रकार, कॅफेतल्या त्यांच्या चकाटय़ांचे विषय, त्यांच्या फ्रेंच आसक्तीला मिळालेली मॉडर्न कलेने दिलेल्या नव्या स्वातंत्र्यभानाची जोड.. अशा तपशिलांचा अड्डा ही कादंबरी जमवते. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ अशी तुतारी फुंकून अखेर इम्प्रेशनिझमच कुरवाळत बसणारे हे बाकीचे बिगरविख्यात नवचित्रकार खंगले कसे, आणि तुलूज लोत्रेकला (पैशाची चणचण नसल्याने असेल, पण) मुद्राचित्रणासारखे नवे तंत्र शिकण्याची आणि ते काही दिवस हाताळल्यानंतर रंगचित्राइतक्याच ऐवजाचे मुद्राचित्र तयार करण्याची संधी त्याच्या आयुष्यातील घटनाक्रमाने कशी दिली, ती त्याने कशी घेतली, आणि पुढे तो मोठा मुद्राचित्रकार कसा झाला, याचीही उत्तरे ही कादंबरी देते. <br />
लोत्रेकची आठ चित्रे या कादंबरीत रंगीत प्लेट घालून छापली आहेत. प्रत्येक प्लेटमागे त्या चित्राचे थोडक्यात वर्णन आहे. या साऱ्या मेहनतीचे श्रेय अनुवादकाच्या प्रयत्नांना जाते! हे मराठीतले वर्णन मराठी ‘वाचकां’च्या कलाभानाला साजेल असे आहे. चित्रकार वा चित्रे माहीत असलेले ‘प्रेक्षक’देखील इतक्या सुगम भाषेत चित्रांबद्दलचे नवे तपशील मराठीत आले म्हणून सुखावतील! चरित्र वाचून चित्र कळण्याची शक्यता लोत्रेकबद्दल होतीच; पण ही चित्रे अनुभवात भर घालतात. <br />
मूळ कादंबरीकाराने- पिएर ल मूर यांनी कादंबरीत लोत्रेकच्या ज्या-ज्या चित्रांचे उल्लेख आले आहेत, ती कुठकुठल्या संग्रहालयांत आहेत, याबद्दलच्या तळटीपा दिल्या होत्या. पण मूळ पुस्तक आहे १९५० सालचे. अनुवादकाने या तळटीप-संदर्भाचा फेरआढावा घेऊन, आज (एकविसाव्या शतकात) ती चित्रे जिथे आहेत, त्यांचे संदर्भ दिले आहेत. मराठीत हे ताजे संदर्भ तळटीपेत न ठेवता मजकुराच्या मध्येच येतात, त्यामुळे ते वाचकाच्या नजरेआड होत नाहीत. <br />
पिएर ल मूर यांनीही ही कादंबरी केवळ चित्रकाराच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी न ठेवता ती रंजक केली होती. पॅरिसला आयफेल टॉवर उभा राहत होता त्यावेळचे वर्णन, संवादांवर भर आणि हेन्री द तुलूज लोत्रेक या शोकनायकाची चित्रे तरुणपणीच लूव्र संग्रहालयाने घेतल्याच्या प्रसंगाशी दु:खद घटनेचाही चटका- अशी तिची मूळ रचना आहे. मराठीत ती आणताना संवादभाषेत वैविध्य आणण्याचा अनुवादकाचा प्रयत्न यशस्वी म्हणावा असा आहे. <br />
या पुस्तकातील चित्रांपैकी पहिले चित्र आहे हेन्री द तुलूज लोत्रेक यांच्या आईचे. आईच हेन्रीचा आधार होती. अख्खे बालपण तिच्यावर विसंबणे, तिनेही उमराव घराण्यातली असूनही आजारी मुलाची शुश्रूषा स्वत: करणे, हेन्री शिकू इच्छितो आहे, मोठा होतो आहे म्हणून तिनेच त्याची केलेली पाठराखण, पुढे एका नववर्षरात्री माय-लेकरांना आपले जीवनमार्ग निरनिराळे असल्याची जाणीव होणे.. या प्रसंगांतून कादंबरीभर आई आणि तिचा कलावंत मुलगा यांच्या नात्याचे पदर दिसतात. जीवनदर्शनाची ही एकमेव लेखकीय संधी कादंबरीकाराला होती असेही जाणवते; कारण बाकीची पात्रे इतिहासात जे घडले, त्याबाहेर फार कमी बोलतात, वागतात. <br />
या कादंबरीतून अभ्यास आणि लालित्य यांचा जो गोफ पिएर ल मूर यांनी विणला होता, तो याच कादंबरीवर सही सही बेतलेल्या आणि त्याच नावाच्या चित्रपटामध्येही दिसला असेलच असे नाही. पण भाषांतरात मात्र हे अभ्यासू लालित्य प्रकटले आहे. कारण अनुवादकानेही अभ्यास आणि लालित्य यांच्या मार्गावर अनुगमन केले आहे! <br />
-विबुधप्रिया दास</span><br />
<span style="font-size: large;"><br />
<b>मूलाँ रूज</b>, </span><br />
<span style="font-size: large;">मूळ लेखक- पिएर ल मूर,</span><br />
<span style="font-size: large;">स्वैर रूपांतर- जयंत गुणे, </span><br />
<span style="font-size: large;">लोकवाङमय गृह प्रकाशन,</span><br />
<span style="font-size: large;"> पृष्ठे : ३२४, मूल्य : ३०० रुपये. </span></div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-87078190645879227452012-01-13T00:16:00.000-08:002012-01-13T00:18:06.756-08:00कातळावरची हिरवळ<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><br />
<span style="font-size: large;"><a href="http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=203847:2012-01-06-10-18-44&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117" target="_blank">लोकरंग</a><b>, </b>लोकसत्ता </span><br />
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLMlWF6FxW28ZpnjQGSSYAzXpfcuKKiYGh-stq_uYL9MgAuVSTO0-PVmAOsxJbVy1qKYMq-IR5BjwWEZ0erjUXWm3D5w8l7Wt_E-7dS5XIMho26fj6DkN0ASb5ncfHU-bWSn-QBMB9fjLp/s1600/katalavarchi+hirval.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLMlWF6FxW28ZpnjQGSSYAzXpfcuKKiYGh-stq_uYL9MgAuVSTO0-PVmAOsxJbVy1qKYMq-IR5BjwWEZ0erjUXWm3D5w8l7Wt_E-7dS5XIMho26fj6DkN0ASb5ncfHU-bWSn-QBMB9fjLp/s1600/katalavarchi+hirval.jpg" /></a><span style="font-size: large;"><br />
श्री. ना. पेंडसे हे स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यविश्वातील एक अत्यंत महत्त्वाचे नाव. प्रारंभी आपल्या कादंबऱ्यांतून कोकणातील विश्व आणि लोकजीवन चितारणाऱ्या श्री.नां.नी नंतर महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने आपल्या कादंबऱ्यांतून व्यक्त केले. ५ जानेवारी २०१२ पासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. त्यानिमित्ताने <b>डॉ. रवींद्र शोभणे</b> यांनी त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा घेतलेला धांडोळा..</span><br />
<span style="font-size: large;"><br />
स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी वाङ्मयाचा विचार करायचा झाला तर या प्रवासातील ठळक नाव म्हणून श्री. ना. पेंडसे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते.</span><br />
<span style="font-size: large;">किंबहुना मराठी कादंबरी वाङ्मयाच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचा विचार करावयाचा झाला तर हरिभाऊ (ह. ना. आपटे), शिरूभाऊ (श्री. ना. पेंडसे) आणि भालचंद्र नेमाडे या तीन ठळक टप्प्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. फडके-खांडेकरांनी मराठी कादंबरीला कलारंजन आणि स्वप्नरंजनात अडकवून ठेवल्याने ती सत्त्वहीन आणि कृतक होऊ पाहत होती. अशा वळणावर ज्या कादंबरीकारांनी मराठी कादंबरीला तिचे सत्त्व बहाल करण्याचे, वास्तवाचे अधिष्ठान देण्याचे महत्त्वाचे कार्य केले, त्यापकी श्री. ना. पेंडसे हे एक होत. पेंडसेंना यासंदर्भात झुकते माप देण्याचे कारण असे की, मराठीत प्रादेशिक कादंबरीची नवी शाखा, नवी प्रकृती त्यांच्या कादंबऱ्यांपासून रूढ झाली. म्हणूनच मराठी कादंबरीचा विचार करताना पेंडसेंचा विचार ठळकपणे करावा लागतो, तो या अर्थाने. मराठीतील ‘ट्रेंड-सेटर’ कादंबरीकार म्हणून पेंडसेंचे महत्त्व अमान्य करता येत नाही. <br />
कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र अशा विविध वाङ्मयप्रकारांत लेखन केलेल्या पेंडसेंची मराठी साहित्यात ओळख आहे ती कादंबरीकार म्हणूनच. ‘खडकावरील हिरवळ’ हे त्यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक १९४१ साली प्रकाशित झाले. हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक. याचा अर्थ पेंडसेंच्या लेखनाची सुरुवात व्यक्तिचित्रांपासून झाली. पण हे एकमेव व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक सोडले तर त्यांनी पुढे या प्रकारचे लेखन केले नाही. तीच गोष्ट त्यांच्या कथालेखनाच्या संदर्भातही सांगता येईल. ‘जुम्मन’ (१९६६) हा एकमेव कथासंग्रह सोडला तर त्यांनी नंतर कथालेखनही केले नाही. पण या दोन्हीचा उपयोग त्यांच्या कादंबरीलेखनासाठी, त्यातील आशयद्रव्यासाठी पुरेपूर झाला. त्यातही त्यांच्या ‘खडकावरील हिरवळ’ या पुस्तकाच्या संदर्भात हे विधान अधिक ठोसपणे करता येईल. कारण त्यातील ‘आमचे मास्तर’ (हद्दपार), ‘बापूकाका सामल’ (गारंबीचा बापू), ‘काशीताई’ (रथचक्र) ही व्यक्तिचित्रे या कादंबरीलेखनाची प्रेरणास्रोत होती. <br />
व्यक्तीचा शोध, व्यक्तिमनाचा समग्र विचार हे प्रधान सूत्र (किंवा प्रकृतीही) श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबरीलेखनामागे होते. त्यांना सुचलेल्या कादंबऱ्या या बहुश: त्यांच्या आयुष्यातील त्यांनी पाहिलेल्या माणसांवरून सुचलेल्या आहेत. म्हणूनच ‘खडकावरील हिरवळ’ला त्यांच्या लेखनप्रवासातील पूर्वसामग्रीच्या दृष्टीने महत्त्व आहे. <br />
श्री. ना. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. खाजगीतील (कौटुंबिक) हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढे लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता, याची प्रचीती ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते. <br />
पेंडसेंची पहिली कादंबरी ‘एल्गार’ १९४९ मध्ये प्रकाशित झाली. प्रकाशित झालेली ही त्यांची पहिली कादंबरी असली तरी ‘एल्गार’ ही लेखनदृष्टय़ा त्यांची पहिली कादंबरी नव्हे. त्यापूर्वी त्यांनी ‘संक्रमण’ नावाची कादंबरी लिहून कादंबरीलेखनाचा प्रयत्न केला होता. पण तिच्यावर फडके-खांडेकरांच्या प्रकृतीची दाट छाया होती. १९३५ ते ४५ या काळातील जे सामाजिक-राजकीय वातावरण होते, नव्या पिढीच्या उरात जो ध्येयवाद होता, जे स्वप्नाळू विश्व होते, तो प्रभाव- पर्यायाने फडके-खांडेकर- माडखोलकर या कादंबरीकार त्रयीचा प्रभाव पेंडसेंना तीत टाळता आला नव्हता. पण आपली कादंबरी कशी असावी, यापेक्षा ती कशी नसावी, ही खूणगाठ पेंडसेंच्या मनात पक्की होती आणि त्यामुळेच ‘संक्रमण’ पुस्तकरूपाने प्रकाशित न करता सरळ पाणी तापवायच्या बंबात टाकून ते मोकळे झाले. <br />
‘एल्गार’ने पेंडसेंना जसे कादंबरीकार म्हणून नाव मिळाले, तसेच या कादंबरीच्या निमित्ताने मराठीत प्रादेशिकतेच्या संदर्भात चर्चा झडू लागल्या. तत्पूर्वी मराठीत ग्रामीण आणि नागर अशा स्वरूपाच्या कादंबऱ्या अस्तित्वात होत्या. तथापि मध्यमवर्गीय, पांढरपेशा माणसांचे मनोरंजन म्हणून एकीकडे सदाशिवपेठी गुलछबू, तर दुसरीकडे गांधीवादाचा भाबडेपणाने स्वीकारणारे, कृतक वाटावा अशा नागरी जीवनदर्शनाचा सुकाळ तत्कालीन कादंबरीत पाहायला मिळत होता. नाही म्हणायला या काळातही कादंबरीच्या क्षेत्रात काही वेगळे प्रयोग होत होते. या प्रयत्नांना पुढे सलग असा हातभार पेंडसेंनी लावला, हे नाकारता येत नाही. <br />
‘एल्गार’ (१९४९) पाठोपाठ ‘हद्दपार’ (१९५०) आणि ‘गारंबीचा बापू’ (१९५२) या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आणि प्रादेशिक कादंबरीकार म्हणून पेंडसेंनी मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले. ‘गारंबीचा बापू’ ही तर तत्कालीन वाचकांना झपाटून टाकणारी, चेटूक करणारी कादंबरी ठरली. मराठी कादंबरीने यापूर्वी पाहिली नव्हती अशी माणसे, पाहिले नव्हते असे सौंदर्य, पाहिली नव्हती अशी विकृती, पाहिली नव्हती अशी जिद्द, पाहिले नव्हते असे प्रेम आणि ऐकल्या नव्हत्या अशा शिव्या- हे सारे ‘गारंबीचा बापू’त एकवटून आले होते. त्यामुळे लोकप्रियता आणि गुणात्मक दृष्टीनेही रसिक व समीक्षकांनी या कादंबरीचे भरभरून स्वागत केले. याच तीन कादंबऱ्या समोर ठेवून गंगाधर गाडगीळांनी ‘हण्रचा दीपस्तंभ’ हा लेख लिहून पेंडसेंचे कादंबरीकार म्हणून मूल्यमापन केले होते. <br />
आपल्या कादंबऱ्यांचा प्रादेशिक या वैशिष्टय़ाच्या संदर्भात बोलबोला होत असला तरी प्रादेशिकता ही कलाकृतीच्या संदर्भात किती आणि कशी स्वीकारायची, याचे सजग भान पेंडसेंना होते. यासंदर्भात पेंडसेंनी केलेले विवेचनच अधिक बोलके ठरावे. ते लिहितात- ‘‘एखादा प्रदेश कितीही जिवंत केला, अन्य पात्रांच्या बरोबरीने तो वावरत आहे असा प्रत्यय वाचकाला आला, तरी अखेरच्या विश्लेषणात या वैशिष्टय़ाला स्थान राहत नाही. शहरी बायांच्या मेळाव्यात घट्ट कासोटय़ाच्या कोळणीने धिटाईने प्रवेश केला तरी ती ज्याप्रमाणे सर्वाचे लक्ष आपल्याकडे खेचून घेईल, असे काहीतरी प्रादेशिक कादंबरीच्या बाबतीत होते. लक्ष वेधून घेण्यापर्यंत ठीक, पण सौंदर्याच्या स्पध्रेत तिच्याकरिता वेगळ्या कसोटय़ा असू शकत नाहीत. माझ्या कादंबऱ्यांकडे पाहताना त्या प्रादेशिक आहेत याची मी दखलही घेत नाही. मला जे जाणवते, ते सर्जनाचा विषय होण्याला पात्र आहे का? जीवनाचा किती खोलवर ठाव मी घेतो आहे? माझ्या निर्मितीत व्यापक सत्याचा अंश आहे का? मी माणसे निर्माण करतो आहे की ठोकळे? या निकषांवर माझी कादंबरी लटपटणार असेल, तर प्रादेशिकतेचं पलिस्तर तिचे संरक्षण काय करणार?’’ (प्रस्तावना-रथचक्र) श्री. ना. पेंडसेंचे हे चिंतन त्यांच्या कादंबरीकार म्हणून असणाऱ्या सजगतेचे लक्षण म्हणता येईल. <br />
सातत्य आणि प्रयोगशीलता हे कादंबरीकार म्हणून पेंडसे यांच्या प्रकृतीचे एक वैशिष्टय़ सांगता येईल. ‘गारंबीचा बापू’ने मिळवलेला लौकिक आणि यश ओलांडून पुढे जाणे सोपे नव्हते. ती घटका यावयास पेंडसेंना तब्बल दहा वष्रे लागली. मधल्या काळात ‘हत्या’ (१९५४), ‘यशोदा’ (१९५७), ‘कलंदर’ (१९५९) या तीन कादंबऱ्या आणि ‘यशोदा’ व ‘राजेमास्तर’ ही दोन नाटके त्यांनी लिहिली. १९६२ मध्ये त्यांची ‘रथचक्र’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि कादंबरीकार म्हणून त्यांच्या यशात यानिमित्ताने मानाचा तुरा खोवला गेला. ‘रथचक्र’ला १९६३ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. (गंमत म्हणजे या कादंबरीला त्यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार नाकारला गेला होता.) पेंडसेंच्या या लेखनप्रवासात कुठलीही कादंबरी आधीच्या कादंबरीसारखी नाही. ‘हत्या’ आणि ‘कलंदर’ या एकाच कथानकावरील द्विखंडात्मक म्हणता येतील अशा कादंबऱ्या; पण प्रदेशाच्या आणि शैलीच्या दृष्टीने त्या सर्वस्वी वेगळ्या ठरतात. हे वेगळेपण अबाधित राखण्याचा प्रयत्न श्री. ना. पेंडसेंनी अखेपर्यंत केला. <br />
‘रथचक्र’ला अभिजात कलाकृतीचे परिमाण प्राप्त झाले. एका सनातन, आदिम मातृप्रेरणेच्या आणि मातृधर्माच्या पाश्र्वभूमीवर ‘रथचक्र’ स्थिरावते. यातील निनावी पात्रांचा प्रयोग तर मराठी कादंबरीत अपूर्वच म्हणता येईल. ‘रथचक्र’नंतर ‘लव्हाळी’ आली आणि पेंडसेंच्या प्रतिभेचा पुन्हा नवा पलू व्यक्त झाला. आशय आणि मांडणीच्याही दृष्टीने ‘लव्हाळी’ वेगळी ठरली. ती ‘रथचक्र’पेक्षा सरस आहे, यशस्वी आहे किंवा नाही, अशाही अर्थाने ‘लव्हाळी’संबंधी विचार केला गेला. पण दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातील जीवनजाणिवा, क्षुद्रत्व हा आशय घेऊन तो मांडण्यासाठी पेंडशांनी स्वीकारलेली दैनंदिनीची शैली हा अर्थपूर्ण प्रयोग होता. <br />
‘लव्हाळी’नंतर ‘आकांत’सारखी एक सामान्य आणि पेंडसेविश्वात न शोभणारी कादंबरीही त्यांनी लिहिली. पण त्यानंतर १९८८ मध्ये १३५८ पृष्ठांची ‘तुंबाडचे खोत’ ही त्यांची द्विखंडात्मक कादंबरी प्रकाशित झाली आणि पुन्हा पेंडसेंचे नाव चच्रेत आले. पृष्ठसंख्येच्या दृष्टीने मराठीतील ही एकमेव मोठी कादंबरी होती. पण ती गुणवत्तेने मोठी होती का, हा मुद्दा मात्र उपस्थित होतो. तथापि ‘तुंबाडचे खोत’ या कादंबरीने कादंबरीचे आणि महाकाव्याचे नाते पुन्हा नव्याने प्रस्थापित करण्याचा किमान प्रयत्न केला, हेही नाकारता येत नाही. <br />
व्यक्तीचा शोध घेणे, त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे सगळे पदर, पलू जोपर्यंत आपल्याला गवसत नाहीत, तोपर्यंत त्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरण्याचा सातत्याने प्रयत्न करणे, हे पेंडसेंच्या लेखनधर्माचे एक लक्षण सांगता येईल. ‘गारंबीचा बापू’त यशोदावर अन्याय झाला म्हणून पेंडसे पुन्हा ‘यशोदे’वर लघुकादंबरी लिहितात, नाटक लिहितात. तीच गोष्ट राधेचीही. ‘गारंबीचा बापू’त भेटलेली राधा ही बरीचशी हातातून निसटून गेली, या भावनेपोटी पुन्हा ते ‘गारंबीची राधा’ ही कादंबरी लिहितात. <br />
‘एक होती आजी’ (१९९५), ‘कामेरू’ (१९९७), ‘घागर रिकामी रे’, ‘रंगमाळी’ (२००२) आणि लोकमान्यांच्या जीवनावरील ‘हाक आभाळाची’ (२००७) या पेंडसेंनी आपल्या उत्तरायुष्यात लिहिलेल्या कादंबऱ्या. या कादंबऱ्या कलाकृती म्हणून किती यशस्वी आहेत, हा भाग अलाहिदा! पण जीवनभर कादंबरी या वाङ्मयप्रकारावर निष्ठा ठेवून केलेले सातत्यशील लेखन म्हणून त्यांच्या या लेखनाकडे पाहावे लागते. <br />
कादंबरीलेखनासोबतच पेंडसेंनी नाटय़लेखनही भरपूर केले आहे. त्यांनी आपल्या अकरा नाटके लिहिली. त्यातील ‘राजेमास्तर’, ‘यशोदा’, ‘गारंबीचा बापू’, ‘असं झालं आणि उजाडलं’ आणि ‘रथचक्र’ ही नाटके त्यांच्याच कादंबऱ्यांवर आधारित होती. याशिवाय ‘महापूर’, ‘संभूसाच्या चाळीत’, ‘चक्रव्यूह’, ‘शोनार बांगला’, ‘पंडित! आता तरी शहाणे व्हा’, ‘डॉ. हुद्दार’ ही वेगळ्या पिढीतली नाटके. नाटककार म्हणून पेंडसेंचे यश फार मोठे नाही; तथापि ते वैशिष्टय़पूर्ण मात्र आहे. <br />
हे एवढे सगळे लेखन करूनही पेंडसे कलावंत म्हणून आतून सतत अस्वस्थच असायचे. आपल्या लेखनप्रवासात जे आपल्याला पकडता आले नाही, मांडता आले नाही, ते पकडण्याचा, मांडण्याचा ध्यास त्यांना लागलेला होता. महानगरीय उद्योगप्रधान संस्कृतीला कवेत घेणारी एक मोठी कादंबरी त्यांना लिहायची होती. कादंबरीचे शीर्षकही त्यांनी ठरवले होते- ‘दद्दा!’ त्यांना ‘लव्हाळी’नंतर हे लेखन करायचे होते. निर्मितीप्रक्रियेच्या या प्रवासात, चिंतनात त्यांना माणसे दिसायला लागली. माणसांचे आंतरसंबंध खुणवायला लागले आणि ‘दद्दा’चा असा चिंतनाच्या पातळीवर प्रवास सुरू असताना मिनी मोडक आणि तिच्या मत्रिणीचे हॉटेलातील संवाद पेंडसेंना सुचले. त्यातून ‘ऑक्टोपस’चा जन्म झाला. पुढे दहा वर्षांनंतर ‘आकांत’चा जन्म झाला. त्याहीवेळी चिंतन ‘दद्दा’चे आणि निर्मिती ‘आकांत’ची- असा काहीसा प्रकार झाला. त्यानंतरही ‘दद्दा’चा विचार करीत असताना तो मागे पडला आणि कोकणातील चार पिढय़ांची कहाणी सांगणारी ‘तुंबाडचे खोत’ पुढे आली. थोडक्यात काय, तर पेंडसे जेव्हा जेव्हा ‘दद्दा’चा विचार करीत, तेव्हा तेव्हा हा विषय त्यांना हुलकावणी देऊन ते पुन्हा कोकणातल्या मातीत मुरलेल्या, वाढलेल्या माणसांचाच विचार करू लागत, इतकी ही नाळ घट्टपणे बांधली गेली होती. पेंडसेंच्या मनात अखेपर्यंत घर करून असलेली ‘दद्दा’ मात्र त्यांना लिहिता आली नाही. कदाचित ही कादंबरी पेंडसेविश्वातील एक महत्त्वपूर्ण कादंबरी ठरली असती. <br />
पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, बोंडलीची विहीर असेल, व्याघ्रेश्वराचे देऊळ असेल, किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवापेक्षा त्यांच्या भावविश्वाचा अतूट भाग झालेल्या होत्या. मुंबईच्या बेस्ट कंपनीत सेवानिवृत्तीपर्यंत नोकरी करून या संस्थेच्या आत्मीयतेपोटी त्यांनी १९७२ मध्ये ‘बेस्ट उपक्रमाची कथा’ हे पुस्तकही लिहिले. <br />
श्री. ना. पेंडसेंना त्यांच्या लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यात महाराष्ट्र शासनाचे पाच पुरस्कार (हद्दपार, हत्या, कलंदर, संभूसाच्या चाळीत व चक्रव्यूह), साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र फाऊण्डेशनचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदíशनी पुरस्कार, लाभसेटवार साहित्यसन्मान पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार हे काही महत्त्वाचे पुरस्कार सांगता येतील. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या रणधुमाळीपासून मात्र ते चार हात दूरच राहिले. १९ मार्च २००७ ला त्यांची लोकमान्य टिळकांवरची ‘हाक आभाळाची’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि २२ मार्च २००७ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हा योगायोग त्यांच्या चाहत्यांना निश्चितच अस्वस्थ करणारा असा आहे. ५ जानेवारी २०१२ पासून श्री. ना. पेंडसेंची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यापेक्षा त्यांनी मराठी साहित्यविश्वाला काय दिले, त्यांनी दिलेल्या कुठल्या संचिताने मराठी कादंबरी समृद्ध झाली आहे, हेच पुन्हा एकदा तपासण्याचा हा प्रयत्न!</span></div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-40671532570900782832012-01-05T09:23:00.000-08:002012-08-25T05:42:09.581-07:00The Battle For God: A History Of Fundamentalism -देवाधर्माचे प्रस्थ आणि प्रश्न!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<span id="goog_14256431"></span><span id="goog_14256432"></span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi7RCPgcHMmi7NWY-r61we_fvmrZ4LYKaB77DGogwbcnx1nZVyWaYQIVuRhVUNkCvrKgd6R84M7nHKSoIFFNcpJBakhf1_p_YuyqrUd9fjGkazGwCV-OUwhz8zr0-vpXnA3IM5KBB2OpE5w/s1600/9780345391698.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi7RCPgcHMmi7NWY-r61we_fvmrZ4LYKaB77DGogwbcnx1nZVyWaYQIVuRhVUNkCvrKgd6R84M7nHKSoIFFNcpJBakhf1_p_YuyqrUd9fjGkazGwCV-OUwhz8zr0-vpXnA3IM5KBB2OpE5w/s1600/9780345391698.jpg" /></a></div>
<span style="font-size: large;">दहशतवाद- त्याचा उगम, वाढ आणि धर्माशी असलेली त्याची घट्ट सांगड या इतिहासाचं सखोल विश्लेषण अमेरिकन लेखिका कॅरेन आर्मस्ट्रॉंग यांनी त्यांच्या 'The Battle for God' या पुस्तकात केले आहे. धर्म, इतिहास, तत्त्वज्ञान हे अभ्यासाचे विषय असलेल्या आर्मस्ट्रॉंग यांनी इसवी सनापासून ते आजपर्यंतची इस्लाम, ख्रिश्चन आणि जुडाई (ज्यू) यातील प्रमुख धर्माची कठोर चिकित्सा अत्यंत परखड, धाडसीपणाने या पुस्तकात केली आहे. दोन हजार वर्षांच्या काळात या धर्माची पीठे असलेल्या देशांत इतर धर्मीयांना मिळालेला आश्रय वा पराकोटीचा छळ, त्यातून निर्माण झालेली द्वेषभावना, बदला घेण्याच्या वृत्तीची रुजवण, वाढ व प्रत्यक्ष कृतीची अपरिहार्यता ही प्रत्येक कालखंडातील संदर्भ देत आर्मस्ट्रॉंग यांनी विशद केली आहे. <br />
इ.स. १४९२ हे वर्ष जगाचा इतिहास, भूगोल आणि भविष्य ठरविणारे, बदलविणारे कसे होते ही काहीजणांना माहीत नसलेली वा त्याचे महत्त्व उलगडून सांगणारी माहिती आर्मस्ट्रॉंग यांनी प्रारंभी दिली आहे. २ जानेवारी १४९२ रोजी स्पेनमधील ग्रॅनाडा शहरावर राजा फर्डिनांड आणि त्याची महाराणी इसाबेला यांनी विजय मिळविला आणि सारे शहर नवीन ख्रिश्चन धर्माच्या स्वागत कमानींनी, झेंडय़ांनी भरून गेले. लगेचच या ख्रिश्चॅनिटीच्या प्रसाराकरिता साम-दाम-दंड-भेद या साऱ्याचा अवलंब करत फर्डिनांडनी स्पेनमध्ये धुमाकूळ घातला. केवळ सात वर्षांत साऱ्या इस्लामला या देशातून हद्दपार केले आणि एकही मुसलमान रहिवासी नसलेला देश म्हणून स्पेनचे नाव इतिहासात कोरले.<br />
त्यानंतर संपूर्ण ज्यू समाजाचे सक्तीने धर्मातर करण्याचा फर्डिनांडने सपाटा लावला. धर्मातर न केल्यास होणाऱ्या हत्येला घाबरून लाखो ज्यू देश सोडून परागंदा झाले. जे ख्रिश्चन झाले ते गुपचूप आपला मूळ धर्म पाळत नाहीत ही खात्री करण्याकरिता गुप्त पोलीस पहारा ((Inquisition) व या साऱ्यांना वेगळ्या वस्तीत बंदिस्त (GHETTO) केल्यामुळे धार्मिक असंतोषाची व त्यातून बदला घेण्याची बीजे ज्यू समाजात जास्त संघटितपणे मूळ धरू लागली. आणि तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे फर्डिनांड / इसाबेलाच्या प्रोत्साहनामुळे कोलंबसाने भारताचा शोध घेण्याचा केलेला धाडसी प्रयत्न, जरी तो भारत शोधू शकला नाही तरी अमेरिकेचा शोध लावून साऱ्या युरोपात त्याने चैतन्याची, परदेशगमनाची व नवनवीन प्रदेश जिंकण्याची विजिगीषु वृत्ती फुलविली. सारा युरोप नव्या आधुनिक युगात प्रवेश करता झाला. जगाचे कानेकोपरे, नवप्रदेश आपल्या पंखाखाली घेण्याच्या त्याच्या इच्छा जास्त प्रबळ होऊ लागल्या.<br />
त्यानंतर ब्रिटिश, फ्रेंच, डच, पोर्तुगीजांनी अनेक देशांवर आक्रमणे करून आपल्या वसाहती, अधिकार प्रस्थापित केले, धर्मातरे केली आणि पूर्वीच्या शांततेला सुरूंग लावण्याच्या वाती जगभर हळूहळू पेटू लागल्या. त्या काळी ख्रिश्चन धर्माच्या आधिपत्याखाली असलेला स्पेन हा युरोपातील प्रबळ व आधुनिक राहणीने प्रगत असलेला देश, पण त्याची दुसरी काळी बाजू म्हणजे मुस्लीम आणि ज्यू समाजाला त्याने दिलेले परागंदेपण. धर्माच्या नावाखाली अधर्माची, अमानवी आचरणे म्हणजे इतरांनाही तसं वागण्याची दिलेली मुभा, जी यापुढे या तीनही धर्मामधून एकमेकांवर कुरघोडी करत आजपर्यंत वाढतीच राहिली आहे. एक लाख तीस हजार ज्यू स्पेनमधून स्वत:ची घरेदारे, जमीनजुमला सोडून भयाने देशांतर करते झाले. त्याचा सल आज जगभराच्या ज्यूंना सलतो आहे आणि त्याच न्यायाने लाखो अरबांना पॅलेस्टाईनमधून ज्यूंच्या हल्ल्यांमुळे स्वत:च्या भूमीवर पाणी सोडून निर्वासित व्हावे लागते आहे हे साऱ्या अरब देशांना खुपते आहे.<br />
स्पेनमधून ज्यूंबरोबरच देशोधडीला लागलेल्या धार्मिक समाज (धर्म) म्हणजे इस्लाम. युरोपात मुसलमानांचे अस्तित्व शून्य झाले असताना तोच इस्लाम तीन राजघराण्यांच्या साम्राज्य उभारणीने सोळाव्या शतकात जगाच्या इतर भागांत एक प्रभावी शक्ती म्हणून उभा राहिला. आशिया खंड अनतोलीया, इराक, सिरीया आणि उत्तर आफ्रिकेत आरोमन घराणी, इराणमधील सफावैद आणि भारत व उपखंडातील मोंगल घराणी यांनी अनेक शतके त्या देशांवर आपली अधिसत्ता संस्कृती गाजविली. इस्लामी धार्मिकतेची विविध रूपे या देशांमधून या राजकारण्यांनी रुजविली. जेव्हा इजिप्त १५१७ मध्ये आटोमन साम्राज्याचा एक भाग झाले तेव्हा विद्यापीठ महाविद्यालये सांस्कृतिक सुबत्तेने ते परिपूर्ण होत गेले. सिरीयातील दमास्कस म्हणजे अनेकांची स्वप्ननगरी होती. इतके ते संपत्ती विद्येने दुथडी भरून वाहत होते.<br />
पण फ्रेंच, इंग्लिश यांच्या आधुनिक विचारचातुर्यापुढे मुस्लीम कमी पडले आणि पुढील काळात पुन्हा युरोपियन ख्रिश्चनांचा वरचष्मा या साम्राज्यांना ग्रासू लागला. भारतात ब्रिटिश आले आणि फ्रेंचांनीही आपल्या वसाहती वाढविण्यास सुरुवात केली.<br />
विसाव्या शतकात या साऱ्या तीन धार्मिक सत्तांनी एकमेकांवरील कुरघोडीमुळे जगाचे स्वास्थ्य बिघडवून टाकले. प्रचंड दहशत आणि नरसंहार (नाझींनी ज्यू वंश संपविण्याकरिता केलेली साठ लाखांची हत्या) तर ज्यूंनी अरबांवर चालविलेले तेवढेच जबरी हल्ले, बोस्नियामध्ये मुसलमानांचे झालेले शिरकाण आणि अगदी अलीकडे (ख्रिश्चन) अमेरिकेचे मुसलमानांनी उद्ध्वस्त केलेले ट्विन टॉवर्स, या साऱ्यामुळे सारी आयुष्येच अर्थहीन झाली आहेत. नित्शेनी म्हटल्याप्रमाणे भयग्रस्तता, अशांती आणि जीवन व्यर्थ गेल्याची सततची जाणीव ही आधुनिकतेच्या मागेमागे धावण्याची फळे होती. आज सारे जग ती भोगते आहे. कॅरेन आर्मस्ट्रॉंग यांनी आपल्या या पुस्तकातील पहिल्या दोनशे पानांमधून या धार्मिकतेच्या देवाच्या सुंदर कल्पनेतून साकारलेल्या आणि नंतर आधुनिकतेच्या आहारी गेलेल्या या तीन प्रमुख धर्माच्या वाताहती, देवाचे दैत्यांत परिवर्तित केलेल्या त्यांच्या धर्ममरतडांचे उघडेनागडे रूप आपल्यापुढे मांडले आहे आणि त्यानंतरच्या शंभर-सव्वाशे पानांमधून त्यांनीच जन्माला घातलेल्या मूलतत्त्ववाद, अतिरेकी दहशतवाद याची गंभीर चिंता व्यक्त केली आहे.<br />
देवाकरिता सुरू केलेले युद्ध (The Battle for God) यातील वरची दोन प्रकरणे म्हणजे (साऱ्यांचाच झालेला) पराभव- Defeat आणि अगदी शेवटी पुढे काय- Afterward या समारोपानी कॅरेन आर्मस्ट्रॉंग यांनी धर्माबाबतीत जास्त संवेदनशील, आग्रही आणि त्यामुळे पराकोटीच्या असहिष्णू झालेल्या साऱ्यांना हा<br />
इतिहास तपासा, हा धार्मिक उन्माद असला तरी समजून घ्या, असे आवाहन केले आहे. त्यांच्याच भाषेत- ११ सप्टेंबर रोजी अमेरिकेवर झालेला हल्ला हा अणुबॉम्बचा नव्हता तर जहाल आतंकवाद्यांनी साधलेली अघोरी दुष्टाव्याची प्रतिक्रिया होती. त्याचा सुगावा कुणालाच लागला नाही. आपल्या कट्टर धार्मिक श्रद्धेला कोणी तरी डिवचल्याची ती परतफेड होती. ही सारी त्या (अदृश्य) देवाकरितांची लढाई खेळताना आतंकवाद्यांना आम्ही गैर काहीच करत नाही, असेच वाटत होते व आहे. फक्त आमच्या देवाकरिता- धर्माकरिता लढतो आहोत-The Battle for God . दुसऱ्या कोणत्याही देवाची, त्याच्या तत्त्वज्ञानाची सावलीही आम्ही आमच्या देवावर पडू देणार नाही एवढीच काळजी घेतो आहोत. आम्ही जगणार आणि मरणार ते केवळ आमच्या देवाकरिता. धार्मिक सोशिकता, सामंजस्य सारे बकवास आहे, ही आमच्या धर्मगुरूंची (?) शिकवण हाच आमचा आमच्या देवाकरिता लढण्याचा मूलमंत्र आहे.<br />
सारे पुस्तक वाचून झाल्यावर वाटते-आकंठ धर्म, धार्मिक अस्मिता आणि कर्मकांडात बुडालेला समाज अशा विचारप्रवर्तक पुस्तकांनी बदलेल? देवाधर्माचे प्रस्थ, त्याच्या नावाखाली होणाऱ्या अतिरेकी हत्या, युद्धे थांबतील? याचे उत्तर पूर्ण नकारार्थी जरी गृहीत धरले तरी समाजाला या साऱ्या गदारोळापासून सावरायला, संवेदनशील, सहिष्णु करायला अशा वाचनविचाराची निश्चित गरज आहे. कॅरेन आर्मस्ट्रॉंग या महिलेने या विषयाला तळमळीने व असीम धैर्याने हात घातला आहे.</span><br />
<span style="font-size: small;"><b>-कुमार नवाथे ,लोकसत्ता ग्रंथविश्व </b><br />
<span style="font-family: Arial,Helvetica,sans-serif;">kumar.nawathe@hotmail.com </span></span><br />
<span style="font-size: large;"><b>द बॅटल फॉर गॉड :<br />
(ए हिस्ट्री ऑफ फंडामेंटलिझम)<br />
लेखक- कॅरेन आर्मस्ट्रॉंग<br />
प्रकाशक- द रॅंडम हाऊस<br />
पृष्ठे ३७१, मूल्य- १५ डॉलर.</b></span><br />
<span style="font-size: large;"><b>इंग्लिश भाषेतील हे पुस्तक विकत घेण्यासाटी <a href="http://www.flipkart.com/books/0345391691?affid=pdongareya" target="_blank"><span style="color: yellow;">येथे</span> </a>click करा! </b></span><br />
<br />
<h1 itemprop="name" title="The Battle For God: A History Of Fundamentalism">
<span style="font-size: large;">The Battle For God: A History Of Fundamentalism </span></h1>
<span style="font-family: Arial,Helvetica,sans-serif;">Blending history, sociology, and spirituality, The Battle for God is a compelling and compassionate study of a radical form of religious expression that is critically shaping the course of world history. </span><br />
<br />
<b style="font-family: Arial,Helvetica,sans-serif;">About The Author</b>:<br />
<span style="font-family: Arial,Helvetica,sans-serif; font-size: small;"><b>Karen Armstrong</b> is the author of numerous books on religious affairs including A History of God, The Battle for God, Holy War, Islam, Buddha, The Great Transformation, and The Case for God and two memoirs, Through the Narrow Gate and The Spiral Staircase. Her work has been translated into forty-five languages. In February 2008 she was awarded the TED Prize and began working on the Charter for Compassion, created online by the general public and crafted by leading thinkers in Judaism, Christianity, Islam, Hinduism, and Buddhism. The charter was signed in November 2009 by a thousand religious and secular leaders. She lives in London.</span><span style="font-size: large;"><b><span style="font-family: Arial,Helvetica,sans-serif; font-size: small;"> </span></b></span><br />
<div class="mprod-summary-title fksk-mprod-summary-title">
<h1 itemprop="name" title="The Battle For God: A History Of Fundamentalism">
<span style="font-family: Arial,Helvetica,sans-serif; font-size: small;">The Battle For God: A History Of Fundamentalism</span><span style="font-size: small;"><b><span style="font-family: Arial,Helvetica,sans-serif;"> </span></b></span></h1>
<h1 itemprop="name" title="The Battle For God: A History Of Fundamentalism">
<span style="font-size: small;"><b><span style="font-family: Arial,Helvetica,sans-serif;">Author</span>:</b> <span style="font-size: small;"><span style="font-family: Arial,Helvetica,sans-serif;">Karen</span></span><b style="font-family: Arial,Helvetica,sans-serif;"><span style="font-size: large;"><span style="font-size: small;"> </span></span></b><span style="font-family: Arial,Helvetica,sans-serif;"><span style="font-size: large;"><span style="font-size: small;">Armstrong</span></span></span></span></h1>
<h2 style="font-family: Arial,Helvetica,sans-serif; font-weight: normal;">
<span style="font-family: Arial,Helvetica,sans-serif; font-size: small;"><span class="publishertext"><b><span style="font-family: Arial,Helvetica,sans-serif;">Publisher</span>:</b> </span></span> <b><span class="publishername"><span style="font-family: Arial,Helvetica,sans-serif; font-size: small;">Random House Publishing Group</span> </span></b></h2>
<div class="secondary-info" style="font-family: Arial,Helvetica,sans-serif;">
<span style="font-size: small;"><span class="publishername">For Free home delivery ,<a href="http://www.flipkart.com/books/0345391691?affid=pdongareya" target="_blank"><b>Click here</b></a> to purchase this book (English Language). </span></span> </div>
</div>
</div>
Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-9303674439179334512011-12-27T04:32:00.000-08:002011-12-27T04:46:45.255-08:00शिवराय समजून घेताना..(Shivaji :His Life And Times)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="http://4.bp.blogspot.com/-ZMZXpY3CbBc/Tvmi4se-dLI/AAAAAAAAAYg/-vW_ZVZm7Hs/s1600/lr02.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://4.bp.blogspot.com/-ZMZXpY3CbBc/Tvmi4se-dLI/AAAAAAAAAYg/-vW_ZVZm7Hs/s1600/lr02.jpg" /></a><a href="http://4.bp.blogspot.com/-I40I8YEw8Yk/Tvmh_H3y6kI/AAAAAAAAAYI/z-k__oTSKU4/s1600/shivray+samjun+ghetana-loksatta.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://4.bp.blogspot.com/-I40I8YEw8Yk/Tvmh_H3y6kI/AAAAAAAAAYI/z-k__oTSKU4/s1600/shivray+samjun+ghetana-loksatta.jpg" /></a></div><div style="color: white;"><br />
</div><div style="color: white;"><span style="background-color: white; color: black;"><span style="font-size: small;"><b>-प्रशांत दीक्षित,<span style="background-color: white;">लोकसत्ता</span> <a href="http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=200019:2011-12-16-17-54-00&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117" style="background-color: white;" target="_blank">ग्रंथविश्व</a></b></span></span></div><div style="color: white;"><span style="background-color: white; color: black;"><span style="font-size: small;"><b><br />
</b></span></span></div><br />
<div style="color: white;"><span style="font-size: large;">शिवाजी : हिज लाइफ अॅन्ड टाइम्स’ हा इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळेलिखित ग्रंथ परममित्र प्रकाशनातर्फे लवकरच प्रसिद्ध होत आहे. हजार पानांच्या या ग्रंथात तत्कालीन अनेक नकाशे आणि दुर्मीळ चित्रेही समाविष्ट आहेत. ‘खुतूत ए शिवाजी’ या पर्शियन पत्रसंग्रहातील काही पत्रांच्या छायाप्रतीही त्यामध्ये आहेत. या ग्रंथाच्या निमित्ताने इतिहासकार गजानन मेहेंदळे यांच्याशी शिवराय आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वासंबंधात केलेल्या या मनमुक्त गप्पा..</span></div><div style="color: white;"><br />
</div><div style="color: white;"><br />
</div><span style="font-size: large;"><span style="color: white;">सच्च्या इतिहासकाराबरोबर गप्पा मारण्याचा आनंद काही वेगळाच असतो. जातिवंत इतिहासकार हे फक्त अस्सल कागदपत्रांतूनच बोलतात. तत्कालीन मूळ नकाशे, आकडेवारी यांची साथ घेतात. अभ्यासातील अपुऱ्या जागा वास्तववादी तर्क चालवून भरून काढण्याचा प्रयत्न करतात. तर्क चालविण्यासाठी ते बखरींचा आधारही घेतात, परंतु स्वत: मात्र बखर रचित नाहीत. असे इतिहासकार भूतकाळाचे आकर्षक, भावनोत्कट चित्र रंगवीत नाहीत. मात्र, त्यांच्या अभ्यासातून भूतकाळाबद्दलची माणसाची जाण आपोआपच वाढते. बखरकारांप्रमाणे इतिहासकार भूतकाळ साक्षात् जिवंत करू शकत नसले तरी त्यांच्यामुळे भूतकाळाची आजच्या काळाशी सांगड घालता येते आणि त्यातूनच भविष्याचा वेधही घेता येतो. असे इतिहासकार लोकप्रिय होत नाहीत, परंतु मैफिली गाजविणाऱ्या बखरकारांहून त्यांची कामगिरी खूपच मोलाची असते.</span><br style="color: white;" /><span style="color: white;">गजाजन मेहेंदळे यांची जातकुळी ही अशा सच्चा इतिहासकारांची आहे. गेली ४० वर्षे या माणसाने एकच ध्यास घेतला.. शिवाजीमहाराज समजून घेण्याचा! या ४० वर्षांत दिवसातील कित्येक तास शिवकाळाच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यात त्यांनी घालविले. हजारो कागदपत्रे नजरेखालून घातली. ग्रंथालये धुंडाळली. पायपीट केली. व्यक्तिगत उन्नतीकडे पूर्ण दुर्लक्ष करून झपाटल्यासारखे ते या शिवकाळाचा शोध घेत राहिले. त्याबद्दलच्या नवनव्या गोष्टी ते उजेडात आणत राहिले. त्यांनी व्यासपीठे गाजविली नाहीत की इतिहासविषयक परिषदांनाही ते उपस्थित राहिले नाहीत. फुटकळ लिखाण करून लोकप्रिय होण्याच्या फंदातही ते पडले नाहीत. मात्र, अखंड मेहनत घेऊन शिवकाळाबद्दलचा मजबूत दस्तावेज त्यांनी दोन खंडांत दहा वर्षांपूर्वी प्रकाशित केला. अर्थातच अन्य शिवचरित्रांप्रमाणे तो रसाळ नाही, चटकदार नाही. राजकारण्यांना उपयोगी पडेल असे त्यात काही नाही. मात्र, त्यातील तळटीपा, संदर्भ नुसते चाळले तरी इतिहास संशोधन ही काय चीज असते याची कल्पना येते. महाराजांनी राज्य कसे उभे केले, याचा बारीकसारीक तपशील या दोन खंडांत मिळतो. हा तपशील जरी रूक्ष वाटला तरी अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात शिवाजीमहाराज ही व्यक्ती इतिहासावर खोल ठसा उमटवून जाण्यासारखी कामगिरी कशी करते याची माहिती यातून मिळते. अशावेळी शिवाजीमहाराजांची थोरवी एखाद्या दैवतापेक्षाही मोठी भासते आणि महाराज हा गप्पांचा, मते मिळविण्याचा विषय नसून कार्यक्षमतेने कारभार कसा करावा, हे त्यांच्याकडून शिकण्याचा विषय आहे हे कळते.</span><br style="color: white;" /><span style="color: white;">गजानन मेहेंदळे यांनी लिहिलेले महाराजांचे द्विखंडात्मक चरित्र प्रसिद्ध होऊन दहा वर्षे झाली. आता इंग्रजी भाषेत लिहिलेले त्यांनी लिहिलेले चरित्र प्रसिद्ध होत आहे. सुमारे हजार पानांच्या या ग्रंथात महाराजांचा काळ व महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची उकल मेहेंदळे यांनी केली आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला आणि महाराजांचे असामान्य व्यक्तित्व समजून घेण्यात दोन-अडीच तास कसे गेले हे कळले नाही.</span><br style="color: white;" /><span style="color: white;">‘१९७२ सालापासून मी शिवाजीमहाराजांचा अभ्यास करतो आहे..’ मेहेंदळे सांगू लागले.. ‘७२ साली मार्च महिन्यात मी महाराजांविषयी गंभीरपणे वाचायला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत असा एकही दिवस उगवलेला नाही, की ज्या दिवशी मी शिवाजीबद्दल अभ्यास केला नाही. असा एकही दिवस नाही. तरीही अजून बराच अभ्यास बाकी आहे असे वाटते..’</span><br style="color: white;" /><span style="color: white;">‘लष्करी इतिहास’ हा खरा तर मेहेंदळे यांच्या अभ्यासाचा विषय. शाळेत असल्यापासूनच त्यांना लष्करी इतिहासाचे वेड होते. याबाबत कुलकर्णी या आपल्या इंग्रजीच्या शिक्षकांचे ते आभार मानतात. त्यांनी लहान वयातच इंग्रजी इतके घटवून घेतले, की इंग्रजी ग्रंथ वाचणे मेहेंदळे यांना कधीच जड गेले नाही. महाविद्यालयात प्रवेश करतानाच त्यांनी दुसऱ्या महायुद्धावरील चर्चिलचे खंड वाचून काढले होते. लष्करी इतिहास या विषयात एम.ए.ला ते पहिले आले. ‘वर्गात तीसच विद्यार्थी होते. पण ३०० असते तरी मीच पहिला आलो असतो!,’ असे ते आत्मविश्वासाने म्हणतात. </span><br style="color: white;" /><span style="color: white;">त्यांना पदवी हाती पडत असतानाच बांगलादेशातील युद्ध-घडामोडी सुरू झाल्या होत्या. त्या पाहण्यासाठी युद्धपूर्वकाळात आणि नंतर प्रत्यक्ष युद्धकाळात पाकिस्तानच्या दोन्ही सीमांवर मेहेंदळे पोहोचले. पाकिस्तानच्या अंतर्भागातही ते जाऊन आले. मूळ विषयाचा सखोल अभ्यास आणि त्याला प्रत्यक्ष पाहणीची जोड यातून या युद्धावर त्यांचे एक पुस्तक तयार झाले. परंतु नियमानुसार परवानगीसाठी ते लष्कराकडे पाठविण्यात आले. तेव्हा लष्कराने त्यातील काही तपशील त्यांना गाळण्यास सांगितले. मेहेंदळे यांनी त्यास नकार दिला आणि ते पुस्तक निघालेच नाही. या प्रकरणामुळे आलेले वैफल्य घालविण्यासाठी त्यांनी शिवाजीवर एक छोटे पुस्तक लिहिण्याचे ठरविले. लष्कराच्या स्टाफ कॉलेजमधील अभ्यासक्रमात ‘शिवाजी’ हा दहा मार्काचा विषय होता. त्या परीक्षेला उपयुक्त होईल असे गाईडवजा पुस्तक लिहिण्याचा मेहेंदळे यांचा मानस होता. अशा फुटकळ कारणासाठी त्यांनी शिवकाळात डुबी मारली, पण त्यातून अद्यापि ते बाहेर आलेले नाहीत.</span><br style="color: white;" /><span style="color: white;">‘या विषयाने मला अक्षरश: झपाटून टाकले. इतिहास संशोधक मंडळात मी अनेक कागदपत्रे तपासू लागलो. लष्करी इतिहासाचा मी एम. ए. असलो तरीही इतिहास संशोधनाची मला माहिती नव्हती. मार्गदर्शन करण्यासाठी कोणी गुरूही नव्हता. दत्तो वामन पोतदार, ग. ह. खरे असे दिग्गज आजूबाजूला असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दडपण येत असे. मग स्वतच अभ्यास सुरू केला. शिवकालीन कागदपत्रे वाचण्यासाठी मोडी, फार्सी, उर्दू शिकलो. काही प्रमाणात पोर्तुगीज भाषाही शिकलो. विषयाची आवडच अशी लागली, की कोणतीही भाषा शिकणे जड गेले नाही. शिवाजी समजून घेण्यासाठी स्वाहिली शिकणे आवश्यक आहे असे जर मला वाटले तर मी उद्यापासून स्वाहिली भाषेचाही अभ्यास सुरू करीन..’ अभ्यासाबाबत अशी इच्छाशक्ती केवळ जातिवंत इतिहासकाराकडेच असते.</span><br style="color: white;" /><span style="color: white;">या अभ्यासातून मेहेंदळेंना महाराज कसे दिसले? महाराजांच्या कोणत्या गुणांनी त्यांना भारून टाकले? </span><br style="color: white;" /><span style="color: white;">‘महाराजांचे सतत उद्योगी, दीघरेद्योगी व्यक्तिमत्त्व..’ मेहेंदळे सांगू लागतात.. ‘पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वराज निर्माण करावे याची ‘खरी’ इच्छा त्यांच्याकडे होती. इच्छा प्रत्येकालाच असतात. आपण बरेच काही करावे असे प्रत्येकाला वाटत असते. पण या इच्छा खोटय़ा असतात. खरी इच्छा बाळगली तर जगात बरेच काही शक्य आहे. स्वराज मिळते का हे जमले तर पाहू, असे शिवाजी म्हणत नव्हता. लहान वयातच त्याच्या मनात ही इच्छा आली आणि ती दिवसेंदिवस अधिकाधिक प्रज्ज्वलित होत गेली..’</span><br style="color: white;" /><span style="color: white;">‘मात्र तेवढय़ानेच भागत नाही. महाराजांमध्ये अनेक गुणांचे सुंदर मिश्रण झाले होते. असा गुणसंयोग सहस्रकात एखाद्याच्याच वाटय़ाला येतो. म्हणूनच शिवाजीच्या जवळपास जाणारा अजून जन्माला आलेला नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते. शिवाजीकडे असलेल्या अनेक गुणांपैकी तीन गुण अत्यंत महत्त्वाचे. क्षमता, चारित्र्य आणि संवेदनशीलता. नीतिमत्तेचे, सदाचाराचे सतत वाढत गेलेले प्राबल्य हा महाराजांच्या आयुष्याचा एक विशेष होता. या प्राबल्यामुळे धैर्य, हिंमत या गुणांची ताकद कित्येक पट वाढली. त्यांच्या गुणांचे नैतिक दडपण शत्रूवरही पडलेले दिसते. मग स्वकीय त्यांच्यासाठी जीव देण्यास तयार झाले यात आश्चर्य ते काय! आग्रा येथील महासंकटातून महाराज बाहेर पडले ते या नैतिक गुणांमुळेच. स्वकीय व परकीय अशा दोघांवरही महाराजांनी अधिकार निर्माण केला तो या गुणांमुळेच!’</span><br style="color: white;" /><span style="color: white;">‘या गुणांना जोड होती ती संवेदनशीलतेची. दुसऱ्याच्या मनात आत्मीयता निर्माण करणे महाराजांना सहज जमत असे. हा माणूस आपली कदर करतो, आपली काळजी घेतो, असे प्रत्येकाला वाटे. प्रत्येक युद्धात कमीत कमी मनुष्यहानी होईल, याकडे ते लक्ष देत. त्यानुसारच लढाईची आखणी करीत. त्यामुळे सैन्यातही राजांबद्दल विश्वास होता. हा आपल्याला अनाठायी बळी चढवणार नाही, ही खात्री सैन्याला होती. याउलट, मोगलांच्या मोहिमांमध्ये रक्तामासांचा चिखल होई. बेदरकारपणे युद्धात सैन्याला लोटले जाई. महाराजांनी असे कधीही केले नाही.’</span><br style="color: white;" /><span style="color: white;">दुसऱ्याबद्दल संवेदनशील असल्यामुळे महाराजांचा- आजच्या भाषेत बोलायचे तर ‘ह्य़ुमन इन्शुरन्स’ बराच मोठा होता. त्यांच्या आयुष्यात वारंवार याची प्रचीती येते. आग्रा येथे औरंगजेबाचे निकटवर्तीयही महाराजांच्या बाजूने बोलताना आढळतात. हे घडण्याचे दुसरे कारण संभवत नाही. खुद्द औरंगजेबही महाराजांबाबत तितकासा दुष्टपणे वागलेला आढळत नाही. पुढे महाराज निसटले व राजगडावर पोहोचले. त्यानंतर त्यांचे दोन सहकारी उत्तरेत औरंगजेबाला सापडले. मुगल हेरखाते प्रमुखाच्या नातेवाईकाकडे ते लपून बसले होते. महाराजांचा ‘ह्य़ुमन इन्शुरन्स’ यावरून लक्षात येईल. मामुली शिक्षा करून औरंगजेबाने त्यांना सोडून दिले.’</span><br style="color: white;" /><span style="color: white;">यातून विषय निघाला तो आग्रा येथून झालेल्या महाराजांच्या सुटकेचा! आग्य््रााहून कोणत्या मार्गाने महाराज स्वराज्यात आले, याचा कोणताही ठोस पुरावा वा तपशील उपलब्ध नाही, असे मेहेंदळे सांगतात. तसा तो मिळणे आता शक्यही नाही. मात्र, साधारणपणे २५ ते ३० दिवसांत महाराज इथे आले, याबाबत इतिहासकारांत बऱ्यापैकी एकमत आहे. रोज जवळपास ६० कि. मी. दौड महाराजांनी केली असावी. असे करणे शक्य आहे. याबाबत रशियन सेनानी झुकॉव्ह याचा संदर्भ मेहेंदळे देतात. दुसऱ्या महायुद्धात नाव कमावलेला हा सेनानी पहिल्या महायुद्धात घोडदळात अधिकारी होता. त्याने सतत महिनाभर रोज ८० कि. मी. दौड मारली होती. तीही एका घोडय़ावर! यासाठी असामान्य शरीरशक्ती लागते. महाराजांनी अशीच दौड मारली असावी. कदाचित त्यांनी घोडे बदलले असतील. काही माणसे त्यांनी आग्य््रााहून पुढे पाठविली होती. त्यांनी घोडय़ांची सोय केली असेल. आग्य््रााहून परतल्यावर महाराज खूप आजारी पडले. प्रवासात झालेले अतोनात श्रम याला कारणीभूत असावेत.</span><br style="color: white;" /><span style="color: white;">सेनापती व मुत्सद्दी अशी दोन्ही अंगे महाराजांमध्ये एकवटली होती. मेहेंदळे त्याबाबत भरभरून बोलतात. महाराजांच्या आयुष्याचे तीन महत्त्वाचे टप्पे मानले जातात. यापैकी पहिल्या टप्प्यात त्यांनी सामथ्र्य जमा करीत नेले. सामथ्र्य व साहस याच्या जोडीने दुसऱ्या टप्प्यात त्यांनी अनेक संधी साधल्या आणि आपले राज्य विस्तारत नेले. हा खूप दगदगीचा काळ होता. यात काही वेळा त्यांना अपयशही आले. मात्र, याच काळात महाराजांच्या अंगचे गुण अधिकाधिक उंचावत गेलेले आढळतात. त्या बळावर तिसऱ्या टप्प्यात महाराजांनी त्यांना हव्या तशा संधी स्वतच निर्माण केल्या. परिस्थितीला आपल्याला हवे तसे वळण लावले आणि दक्षिणेपर्यंत स्वराज्य वाढवीत नेले. आलेली संधी साधणे हे सेनापतीचे काम, तर संधी निर्माण करणे हे मुत्सद्दय़ाचे काम. आपल्याला हव्या तशा संधी मुत्सद्दी कशा निर्माण करतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांची दक्षिणेची मोहीम! महाराजांचे त्यावेळचे डावपेच मेहेंदळे यांच्याकडून ऐकताना मन थक्क होऊन जाते. त्या एका वर्षांत महाराजांनी ४० किल्ले घेतले, तर मोगलांना फक्त दोन किल्ले घेता आले. </span><br style="color: white;" /><span style="color: white;">विस्मयकारक वाटाव्यात अशा हालचाली करणे आणि सैन्याला गतिक्षम ठेवणे हे सेनापती म्हणून महाराजांचे वैशिष्टय़ होते. ‘शत्रूला ते थक्क करीत..’ मेहेंदळे सांगतात.. ‘याला जोड होती ती गुप्ततेची. ही गुप्तता केवळ हालचालींची नव्हे, तर हेतूंची गुप्तता. शिवाजी काय करीत असावा, ही विवंचना करण्यातच शत्रूचा बराच वेळ जाई. महाराज आपल्या हेतूंचा थांग शत्रूला लागू देत नसत.’</span><br style="color: white;" /><span style="color: white;">जदुनाथ सरकार यांच्यासारख्या इतिहासकारांनी शिवाजीमहाराजांबद्दल अनेकांचे मत कलुषित करून ठेवले आहे. मराठी कागदपत्रांचा अभ्यास न करता सरकार यांनी बरेच निष्कर्ष काढले आहेत. त्यामुळे मराठय़ांची ‘लुटारू’ अशी प्रतिमा उत्तर भारतात तयार झाली. याबाबत विचारता मेहेंदळे म्हणाले की, ‘महाराजांनी सुरत लुटली. अन्य काही लुटीही केल्या. मात्र, त्याची खोलवर कारणमीमांसा कोणी केली नाही. त्यामागे आर्थिक कारणे होती. त्यावेळी मुघलांचा वार्षिक महसूल २२ कोटी रुपयांचा होता, तर महाराजांचा जेमतेम एक वा सव्वा कोटीचा होता. मुघलांकडे दोन लाख खडे सैन्य होते. त्या हिशेबाने महाराजांकडे १० हजारांचे सैन्य असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ते ४० हजार होते. आता या ४० हजार इतक्या सैन्यासाठी पैसा उभा करणे आवश्यकच होते. स्वातंत्र्याकरता मोठय़ा सत्तेविरुद्धात युद्ध करायचे ठरविले तर लहान सत्तेला लूट करावीच लागते. तेव्हा नैतिक प्रश्नांची ऐतिहासिक प्रश्नांशी गल्लत करता कामा नये.’</span><br style="color: white;" /><span style="color: white;">..मेहेंदळेंशी गप्पांचा हा ओघ सुरूच राहतो. त्यातून अनेक अंगांनी महाराजांचे चरित्र उलगडत जाते. हा ओघ थांबणारा नसतो. शिवाजीमहाराजाचे गुण सांगावे तेवढे थोडेच. मग सर्वाधिक गुणवैशिष्टय़ कोणते, असे विचारले असता मेहेंदळे चटकन् म्हणाले की, ‘आपले राज्य स्थापन करणे हा महाराजांचा गुण होताच; पण राज्य स्थापन केल्यावर ते चालवायचे कसे, याचा स्पष्ट कार्यक्रम त्यांनी तरुणपणातच तयार केला होता. हे त्यांचे वैशिष्टय़ आगळेवेगळे आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी स्वतची मुद्रा घडविली. ती पुन्हा कधीही बदलावी लागली नाही. त्यामध्ये भर घालावी लागली नाही. फेरफार करावा लागला नाही. आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे, याबद्दलची इतकी स्पष्ट कल्पना अन्य कुणा ऐतिहासिक व्यक्तीमध्ये आढळून येत नाही. अशी निसंदिग्धता व त्यानुसार वर्तन हा शिवाजीमहाराजांचा फार मोठा गुण मला वाटतो..’ </span><br style="color: white;" /><br style="color: white;" /><b style="color: #ffe599;">इतिहासकारांची उदार दृष्टी</b><br style="color: white;" /><span style="color: white;">पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये बसून गजाननराव मेहेंदळे यांचे सर्व संशोधन सुरू असते. सदाशिव पेठेतील या दगडी वास्तुबद्दल मेहेंदळ्यांना खूप आत्मीयता आहे. या वास्तुने थोर इतिहास संशोधक पाहिले. त्यांच्याबद्दल मेहेंदळे अतीव आदराने बोलतात. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे हे तर ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. मेहेंदळेंना त्यांचा सहवास लाभला नाही, परंतु दत्तो वामन पोतदार यांची भाषणे त्यांनी ऐकली. ग. ह. खरे यांचे काम त्यांनी जवळून पाहिले. मोडी लिपीतील तज्ज्ञ माधवराव ओंकार यांच्याबरोबर त्यांनी काम केले. ‘मोडीच्या अभ्यासामुळे देवनागरी वाचायला वेळ मिळत नाही,’ असे सांगणारे ओंकार किंवा ‘आयुष्यातील एकही क्षण मी फुकट घालवला नाही,’ असे ठामपणे सांगणारे खरे यांच्या व्यक्तिमत्त्वांचा मेहेंदळेंवर खूप परिणाम झाला. दत्तो वामन पोतदार यांनी शिवचरित्र लिहिले नाही याबद्दल त्यांच्यावर टीका केली जाते. पण इतिहास संशोधन मंडळ उभे करण्यासाठी पोतदारांनी भरीव काम केले याचा मात्र टीकाकारांना विसर पडतो. या कामाचे अनेक दाखले मेहेंदळे देतात. पण त्यांना सर्वात महत्त्वाचा वाटतो तो पोतदारांचा उदार दृष्टिकोन. यासंबंधातील एक आठवण मेहेंदळेंनी सांगितली.<br />
जदुनाथ सरकारांची मराठय़ांच्या इतिहासाबद्दल स्वल्पदृष्टी होती. त्याबद्दल त्यांचा मराठी इतिहासकारांनी जोरदार प्रतिवादही केला. मात्र, इतिहासकार म्हणून सरकारांबद्दल सर्वाना आदरच होता. गो. स. सरदेसाई हे सरकारांच्या प्रभावाखाली असल्याने त्यांचेही मराठी इतिहास संशोधकांबद्दल फारसे चांगले मत नव्हते. तरीही भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांचे छायाचित्र लावण्याचा निर्णय घेण्यात आला. हे ऐकल्यावर सरदेसाई अस्वस्थ झाले. आपल्याशी मतभेद असूनही ही संस्था आपला सत्कार कसा काय करते, असा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा दत्तो वामन पोतदार त्यांना म्हणाले, ‘मतभेद असले म्हणून काय झाले? अहो, पैलवानाचा फोटो हा तालमीतच पाहिजे.’<br />
भारत इतिहास संशोधन संस्था ही अभ्यासाची तालीम असून इतिहास संशोधनाचे सरदेसाई हे पैलवान आहेत, असे पोतदार यांनी मोठय़ा मनाने मान्य केले होते.<br />
</span><br style="color: white;" /><b style="color: #ffe599;">शिवराज्याचा कारभार</b><br style="color: white;" /><span style="color: white;">शिवाजीमहाराज कारभार कसा करीत, याचे अनेक तपशील मेहेंदळे सांगतात. महाराजांचे अष्टप्रधान मंडळ असले तरी त्यांचे काम सल्ला देण्यापुरतेच होते. निर्णय महाराज स्वतच घेत, असे मेहेंदळे यांचे ठाम म्हणणे आहे. हे मंडळ वास्तविक मंत्र्यांचे नसून सचिवांचे होते. आजचे सचिव जसे काम करतात तसे हे अष्टप्रधान मंडळ काम करी. ते महाराजांना माहिती पुरवीत, परंतु निर्णय हा शिवाजीचा स्वतचा असे.<br />
बारीकसारीक तपशिलावर महाराजांची नजर असे. अनेक पत्रांमधून ही गोष्ट लक्षात येते. आपली मर्यादा सोडून काम केलेले महाराजांना खपत नसे. अगदी पाटीलकीच्या व्यवहारातही महाराज लक्ष घालीत. करंजा वाडीच्या पाटलांना महाराजांनी एक सणसणीत पत्र लिहिले होते. पाटलाने मागचा-पुढचा विचार न करता स्वतंत्रपणे निर्णय घेणे महाराजांना पसंत पडले नाही. ‘साहेब माणसाचे माणूस ओळखतो,’ असा इशारा त्यांनी पाटलांना दिला व सांगितल्याप्रमाणेच काम करण्याचा आदेश दिला.<br />
व्यवस्थापनशास्त्राचा विचार करता नेत्याने इतक्या तपशिलात जाणे योग्य नाही. ‘कनिष्टांवर काम सोपवून द्या, त्यात लुडबूड करू नका,’ असे आजचे व्यवस्थापनशास्त्र शिकवते. मेहेंदळे याबाबत दुसरा विचार मांडतात. संस्था उभी राहिली की असे करणे योग्य ठरत असेल; पण पायाभरणीचे काम करणारे सर्वच नेते तपशिलाबाबत फार दक्ष असतात. आपल्या कार्याची वीट न् वीट ते स्वत रचत असतात. त्यामुळे ही लुडबूड ठरत नाही. उलट, उत्तम मार्गदर्शन होते. महाराजांसारख्यांना हे शक्य होते याचे मुख्य कारण म्हणजे एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करण्यासाठी आवश्यक असणारी अफाट कार्यशक्ती महाराजांजवळ भरपूर होती. अशी कार्यशक्ती हीसुद्धा थोर नेतृत्वाची खूण असते.<br />
</span></span><span style="color: #ffe599; font-size: large;"><b>जवळचे आणि लांबचे उद्दिष्ट</b></span><span style="font-size: large;"><br style="color: white;" /></span><span style="color: white; font-size: large;">स्वराज्यप्राप्तीसारखे दूरचे उद्दिष्ट मनात घट्ट धरून ठेवायचे आणि त्याचवेळी जवळच्या उद्दिष्टांवरील नजरही हलू द्यायची नाही, हे महाराजांना सहज साधत असे. लांबच्या उद्दिष्टांकडे लक्ष ठेवून त्यांची आजची लढाई होत असे. याबाबतची फ्रेंच प्रवाशाने लिहिलेली आठवण मेहेंदळे सांगतात..<br />
कारे नावाचा फ्रेंच प्रवासी मुंबईहून कोकण, हैदराबाद मार्गे दक्षिणेकडे गेला. तो राजापूरला पोहोचला तेव्हा महाराज हैदराबादला होते. राजापुरात त्याची गाठ अण्णाजी दत्तो या महाराजांच्या एका कारभाऱ्याशी पडली. महाराजांच्या या मोहिमेविषयी अण्णाजी दत्तो त्याला म्हणाले की, ‘कधी ना कधी औरंगजेब स्वराज्यावर चालून येणार याची महाराजांना खात्री आहे. त्याचा मुकाबला करताना हाताशी असावा म्हणून दक्षिणेतील मुलुख आम्ही काबीज करीत आहोत.’<br />
महाराजांनी जिंजीपर्यंत मजल मारली आणि तो किल्ला हस्तगत केला. पुढे औरंगजेबाच्या स्वारीच्या वेळी रामचंद्र अमात्य यांनी याच किल्ल्यात राजाराम महाराजांना नेऊन ठेवले. महाराजांनी काबीज केलेल्या या मुलखामुळेच औरंगजेबाला प्रत्युत्तर देणे पुढच्या काळात मराठय़ांना शक्य झाले.</span><span style="color: maroon;"><span style="color: white; font-size: large;"> </span></span><br />
<div style="color: #ffe599;"><span style="background-color: white; color: black;"></span><b><span style="background-color: white; color: black; font-size: small;"><span style="color: white;"></span></span> </b></div><div style="color: #ffe599;">‘शिवाजी : हिज लाइफ अॅन्ड टाइम्स’ </div><span style="color: maroon;"><span style="background-color: white;">(लवकरच प्रसिध्द होणार) </span></span><br />
<span style="color: maroon;">-<span style="color: #ffe599;">इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे</span></span><br />
<span style="color: maroon;"> -<span style="color: #ffe599;">परममित्र प्रकाशन</span></span><span style="color: #ffe599;"> </span><br />
<br />
<span style="color: #ffe599;">[This article is about the Great Maratha Warrior Shivaji. Shivaji :His Life And Times-This book is written by famous historian Shri.Gajanan Mehendale From Maharashtra,India.]</span><span style="color: maroon;"> </span></div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-9795091288157688832011-12-05T08:02:00.000-08:002012-02-05T05:25:55.959-08:00The Open City-कथेच्या बंधनात न अडकलेली कादंबरी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQJ7b5THK2wZ4rASjTRmbFZg1itCNMpnMXaE9o4HxnDyQ1FzSYp8ut5H2I89AulLture1vqATD4VwrT-yXcNxNJVIn8m9WOTOuCs9p_7z8BdrJAWYBmwrmMnYcE2CO0DVlMkgFjeqy-jSe/s1600/edt02.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"> <b></b><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQJ7b5THK2wZ4rASjTRmbFZg1itCNMpnMXaE9o4HxnDyQ1FzSYp8ut5H2I89AulLture1vqATD4VwrT-yXcNxNJVIn8m9WOTOuCs9p_7z8BdrJAWYBmwrmMnYcE2CO0DVlMkgFjeqy-jSe/s320/edt02.jpg" width="204" /></a></div><br />
<span style="font-size: large;">आपण राहतो ते शहर आपल्या अनुभवविश्वाच्या केंद्रस्थानी आणून त्याच्या पाश्र्वभूमीवर स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न ओरहान पामुकने आपल्या इस्तंबूल या अतिशय हळव्या पण साजऱ्या लेखनात केला आहे. आपले शहर आणि आपण या एकमेकांना परावर्तित करणाऱ्या दोन प्रतिमा आहोत. शहराचे आणि आपले व्यक्तिमत्त्व एकमेकांशी घट्ट जोडले गेले आहे, ही माणूस म्हणून माझी फार प्रबळ आणि मूळ भावना आहे. त्यामुळे शहरी मानसिकतेतून तयार झालेले उत्तम चित्रपट आणि साहित्य, चित्रकला यांच्यापर्यंत मी हिरीरीने पोहोचतो किंवा ते माझ्यापर्यंत वाट काढत येतात . <br />
‘द ओपन सिटी’ हे पुस्तक माझ्यापर्यंत वाट काढत आलेले आहे. गेले काही दिवस माझ्या लगत असलेल्या काचेबाहेर माझे शहर सरकत जात असताना मी या पुस्तकामध्ये शांतपणे अडकून गेलेलो आहे. <br />
टेज्यू कोल या नायजेरियन वंशाच्या अमेरिकन लेखकाची ‘द ओपन सिटी’ ही पहिली कादंबरी आहे. न्यूयॉर्क शहराविषयी लेखकाने केलेले हे एक हळवे चिंतन आहे. कादंबरीचा नायक ज्युलियस हा एक तरुण नायजेरियन वंशाचा मानसोपचारतज्ज्ञ आहे. त्याच्या न्यूयॉर्क शहरामध्ये चाललेल्या लांब लांब फेरफटक्यांमधून त्याने स्वत:च्या दुखावलेल्या मन:स्थितीचा अदमास घेण्याची अनुभवलेली प्रक्रिया हा या कादंबरीचा गाभा आहे. <br />
‘द ओपन सिटी’मधील न्यूयॉर्क हे world trade center उद्ध्वस्त झाल्यानंतरचे न्यूयॉर्क शहर आहे. ते आजचे आहे त्यामुळे प्रथमत: हे पुस्तक महत्त्वाचे आहे. कारण वर्तमानाविषयी काही सकस असे सापडण्याची शक्यता कादंबरीसारख्या साहित्यप्रकारात कठीण होण्याचा आजचा काळ आहे. त्यामुळे आजचे काही असे मांडताना लेखकाने, पर्यायाने ज्युलियस या नायकाने आपल्या प्रथमपुरुषी निवेदनामधून आपल्या संपूर्ण जगण्याचा घेतलेला प्रभावी असा वेध या पुस्तकात जाणवतो आणि कोणत्याही चांगल्या कादंबरीप्रमाणे सत्य आणि कल्पित वास्तव याच्या सीमारेषा या पुस्तकाच्या बाबतीत धूसर होत जातात. ज्युलियस मूळचा नायजेरियन कुटुंबातला. या मुलाच्या आयुष्याचा प्रवास नायजेरिया मार्गाने बेल्जियम आणि आता अमेरिका असा सर्वत्र पसरलेला आहे. ज्युलियस सध्या मानसोपचारतज्ज्ञ म्हणून न्यूयॉर्कमध्ये रेसिडेन्सी करीत आहे. नुकतीच नादेजे ही त्याची प्रेयसी त्याच्यापासून दुरावली गेली आहे. आपल्याला अचानक आलेले हे एकटेपण कशातून आले आहे, हे न कळून तो न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर सध्या दिवस-रात्र चालत सुटला आहे. आपण सुशिक्षित, स्वतंत्र आणि बुद्धिमान आफ्रिकन आहोत ही जाणीव त्याच्याबरोबर सतत प्रवास करते आहे. न्यूयॉर्क शहरातल्या पक्ष्यांविषयी, झाडांविषयी, ऋतूंविषयी आणि चित्र-विचित्र माणसांविषयी अतिशय गडद अशी वर्णने करत तो चालला आहे. ही एक चालती कादंबरी आहे, ज्याची सोबत करणे वाचक म्हणून आपल्याला आनंददायक वाटते. सर्वात महत्त्वाची बाब म्हाणजे ही एक कथाहीन कादंबरी आहे. कथेच्या बंधनात न अडकलेले फिक्शन वाचणे हा फार मोकळे करणारा अनुभव असतो. <br />
ज्युलियस हा मानसोपचारतज्ज्ञ असल्याने तो आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे ताबडतोब विश्लेषण करू लागतो आणि त्या विश्लेषणाच्या प्रक्रियेत तो गुंतत जातो. हा मानसोपचारतज्ज्ञ स्वत: अजिबातच बऱ्या मन:स्थितीत नाही, पण त्याची बुद्धी आणि जाणीव तल्लख आहे. अशा कात्रीत सापडून एकटेपणावर मात करायला शहरभर तरंगत फिरत आपल्या आयुष्याविषयी ज्युलियस आपल्याला जे सांगतो, त्या सर्व विचारांना शांत चिंतनाची लय आहे. <br />
या पुस्तकात अतिशय वेधक व्यक्तिचित्रे आहेत; त्यांपकी एक आहे ज्युलियसचे वयोवृद्ध जपानी गुरू सायटो. डॉक्टर सायटो न्यूयॉर्कमधील आपल्या भल्या मोठय़ा सुंदर सदनिकेत राहतात. आपल्या जुन्या विद्यार्थ्यांपकी कोणीही केव्हाही येऊन आपल्याला भेटावे, गप्पा माराव्यात आणि काही नवी पुस्तके आपल्याला वाचून दाखवावीत या इच्छेने सायटोंनी आपल्या घराचे दरवाजे सतत उघडे ठेवलेले आहेत. ज्युलियसचे प्रोफेसर सायटोंशी फार जवळचे नाते आहे. प्रोफेसर सायटोंच्या आजकालच्या भेटी आणि आठवणी, अनेक दिवसांनी फोन केल्यावर त्यांच्या मृत्यूची मिळालेली बातमी हे या प्रवासवजा कादंबरीतले फार प्रभावी प्रसंग आहेत. <br />
दुसरी व्यक्ती आहे ज्युलियसची आजी, जिला तो बोलीभाषेत ‘ओमा’ म्हणतो. ज्युलियसच्या आईची आई. ओमा ज्युलियसच्या आयुष्यामधून हरवून गेली आहे आणि आत्ता या मोठय़ा शहरात फिरताना अंगावर पाणी पडावे तशा ज्युलियसला ओमाच्या आठवणी येत आहेत. ओमा ब्रुसेल्समध्ये राहते किंवा राहायची. कुटुंबाशी संबंध दुरावल्यानंतर तिचे काय झाले हे ज्युलियसला माहिती नाही. कादंबरीच्या एका टप्प्यावर ज्युलियस तीन आठवडय़ांची सुट्टी काढून ब्रुसेल्सला जातो. आणि फोनच्या जुन्या याद्यांमधून ओमा नावाच्या सगळ्यांना फोन करीत राहतो. न्यूयॉर्कमधले रस्त्यांवरचे प्रवास ब्रुसेल्समध्ये सुरू होतात आणि ज्युलियसचे मन एका शहराचे रूप धारण करते. <br />
ब्रुसेल्समध्ये एक मुस्लीम ज्युलियसचा मित्र बनतो. त्याच्या आयुष्याशी आजचा काळ आणि आपले असणे ज्युलियस पडताळून पाहत राहतो. ते प्रसंग विशेष कौशल्याने लेखकाने या कादंबरीच्या प्रवासात गुंफले आहेत. ‘द ओपन सिटी’ ही अशा प्रकारे समोर येणाऱ्या आणि निघून जाणाऱ्या पात्रांनी गच्च भरलेली कादंबरी आहे. <br />
एका भलत्याच देशात जन्मून न्यूयॉर्कसारख्या मिश्र समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आपण नक्की कोण आहोत, हा अस्तित्वाचा शोध सतत चालू असतो. ज्युलियस आफ्रिकन आहे आणि स्वकष्टावर, बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगले आयुष्य जगणारा तरुण आहे. त्याची त्वचा वेगळी आहे, पण अंतर्मन वेगळ्याच रसायनाचे आहे, ही जाणीव त्याला सबंध कादंबरीभर प्रश्न निर्माण करीत त्रास देत राहते. कथा नसलेल्या या कादंबरीमध्ये आधुनिक मिश्र शहरी समाजामध्ये तयार होणाऱ्या अस्तित्वविषयक प्रश्नांचे फार मोठे नाटय़ आहे. <br />
वेगळ्या आणि अपरिचित साहित्यिक वंशाच्या लेखकाची ही कादंबरी वाचण्यासारखी का आहे, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या कादंबरीच्या नायकाचा चेहरा कसा असेल, याची कल्पना ही कादंबरी वाचताना आपल्याला करता येत नाही. कादंबरीतल्या प्रत्येक इतर पात्राचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर येतात, पण ज्युलियस कसा दिसतो, ही कल्पना काही केल्या आपल्याला करता येत नाही. </span><br />
<br />
<b>-सचिन कुंडलकर ,लोकसत्ता ग्रंथविश्व साठी </b><br />
<span style="font-size: small;"><b>kundalkar @ gmail .com </b></span><br />
<br />
<span style="color: yellow; font-size: large;"><b>द ओपन सिटी : - टेज्यू कोल<br />
रँडम हाऊस पब्लिकेशन, न्यूयॉर्क</b></span><br />
<b style="font-weight: normal;"></b><b><br />
</b></div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-25921149709677281832011-11-26T06:24:00.000-08:002011-11-26T23:23:02.355-08:00लीव्हिंग मायक्रोसॉफ्ट टू चेंज द वर्ल्ड(Leaving Microsoft to Change the World-John Wood)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEibzZRc1t-1NWG92bHidiNmmrLUXedHcFrHqAVn2ylhOvVUkrxwdhsCsfRZfD6d7nIgJGRL-3jlxRZTCJb1g1o9Jf3nCphw28g-Bt0Wty94iipRWnBrYytFQiJoEHX-RGD4db-x1Is-ZLRI/s1600/viv05.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEibzZRc1t-1NWG92bHidiNmmrLUXedHcFrHqAVn2ylhOvVUkrxwdhsCsfRZfD6d7nIgJGRL-3jlxRZTCJb1g1o9Jf3nCphw28g-Bt0Wty94iipRWnBrYytFQiJoEHX-RGD4db-x1Is-ZLRI/s1600/viv05.jpg" /></a></div><br />
<span style="font-size: large;">गेली काही वर्षे दहशतवाद हा जगाला भेडसावणारा आणि चिंतित करणारा प्रश्न जिथे-तिथे हिरीरीने मांडला जात आहे. त्याच्या बीमोडाकरिता अब्जावधी रुपयांची बरसात प्रत्येक देश आपापल्या क्षेत्रात करीत आहे. हा दहशतीचा प्रश्न एकदा निकालात निघाला की मग जणू सारे अरिष्ट चिंता मिटून जग आनंदमयी होणार, असे चित्र डोळ्यांपुढे उभे राहते आहे आणि त्यामुळे यापेक्षाही काळजीदायक वास्तवाकडे नकळत आपली डोळेझाक होत आहे. दहशतवादाचा उगम होण्यामागे आहे ते जगातील भयानक दारिद्रय़ आणि निरक्षरता. आज सारा समाज या वस्तुस्थितीला विचारातच घेत नाही. एक तर तो स्वत:च्या कोषात तरी पूर्ण दंग आहे वा दहशतवादाच्या सावटाखाली.<br />
पण सर्व आलबेल वाटणाऱ्या जगातील न दिसणाऱ्या या दारिद्रय़ाची, या निरीक्षरतेची जाणीव मायक्रोसॉफ्टमधील तरुण अमेरिकन व्यावसायिक जॉन वूडने `Leaving Microsoft to Change The World' या आपल्या पुस्तकाने जगाला पुन्हा एकदा करून दिली आहे. जॉन वूडचे हे पुस्तक म्हणजे योगायोगाच्या प्रवासाची कहाणी आहे. जॉन हा सुट्टीत नेपाळमध्ये गिर्यारोहण करायला येतो तेव्हा हिमालयाच्या सान्निध्याने अध्यात्माकडे ओढला जातो. सारं जग विसरून तो सुट्टी आनंदाने उपभोगतो. जवळच्या खेडेगावातील एका लहानशा शाळेत तेथील गावकऱ्यांच्या आग्रहामुळे जातो आणि पुढे.. पुढे त्याचे सारे आयुष्यच बदलते.<br />
या शाळेतील एका खोलीत कुलपात बंद करून ठेवलेली मोजकीच तीन-चार पुस्तके म्हणजे शाळेचे ग्रंथालय. रस्त्यावर सहजी रद्दीत मिळणारी ती पुस्तके, पण त्याचं अप्रूप तेथील निरागस मुलांना, त्यांच्या शिक्षकांना अपार, अमूल्य ठेव्याप्रमाणे ती पुस्तके हाच त्या मुलांच्या शिक्षणाचा ध्यास.<br />
जॉन वूड आपल्या पुस्तकात पुढे लिहितो की, ७० टक्के निरक्षरता असलेल्या नेपाळमध्ये एवढय़ाशा खेडय़ातील ही शिक्षणाकरिता तरसणारी मुलं पाहून मला माझं बालपण आठवलं. तिथून निघताना मला गलबलून आलं. ‘सर, तुम्ही परत या, पण येताना पुस्तकं घेऊन या,’ या विनंतीनं तर मी अश्रूमय झालो. त्यांना पुस्तके आणण्याचं आश्वासन मी दिलं तर खरं, पण त्यांच्या पुढच्या वाक्यांनी जमिनीवर वास्तवात आलो. शिक्षक म्हणत होते, ‘आजवर हजारो प्रवासी आले, आश्वासन देऊन गेले, पण कुणीच परतलं नाही.’<br />
नाटक-सिनेमाची कथा वाटावी, या पद्धतीने जॉन वूडने हा प्रवास कथन केला आहे. अध्यात्माची गोडी लागलेला जॉन वूड अंतर्मुख होऊन श्रीमंत देशांच्या तुलनेतील ही भयाण दारिद्रय़ाची, निरक्षरतेची दरी पाहतो. स्वत:ची लठ्ठ पगाराची नोकरी, जगभरातील मोठमोठय़ा शहरांतील भ्रमंती, साऱ्या सुखसोयींची मुबलकता याची त्या लहानग्या शाळेशी तुलना करू लागतो. अस्वस्थ होतो, बुद्ध मठात जातो, चिंतन ध्यानधारणा करतो आणि प्रचंड मानसिक घालमेलीत त्रस्त होतो. अमेरिकेत परतल्यावरही त्याला नेपाळी मुलांचे चेहरेच खुणावत राहतात.<br />
बिल गेट यांच्या दौऱ्यावर जेव्हा तो चीनला जातो तेव्हा तेथील मोठय़ा टेलिव्हिजन इन्टरव्ह्य़ूकरिता बिल गेट यांचा सहाय्यक म्हणून रात्रंदिवस राबतो. बिल गेट मुलाखत देतात, पण जॉन वूडच्या त्यामागच्या श्रमाला फारशी किंमत देत नाहीत आणि वूडच्या मनात ही सारी श्रीमंती, संपत्ती, हजारो कोटींचे व्यवहार, त्यांनी अजून श्रीमंत होणारी मोजकी राष्ट्रे, माणसे याबद्दल घृणा निर्माण होते. केवळ भरपूर पैसे व सुरक्षिततेचं कवच याला आहारी जाऊन माझी तितकीशी जरुरी नसलेल्या बिल गेटकडे मी नोकरी करणं व ७० टक्के निरक्षर, पण ज्ञानाची आस असणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं समर्थनीय आहे? आज त्यांना माझी जरुरी असताना माझ्या केवळ स्वार्थापोटी त्यांच्याकडे पाठ फिरविणे योग्य आहे? आणि या साऱ्या विचारमंथनाने एका ‘नव्या’ जॉन वूडचा जन्म होतो. एकोणिसाव्या शतकात Andrew Cornegie हा धनाढय़ पोलाद व्यावसायिक अमेरिकेत अगदी वेगळ्या पद्धतीने जीवन जगला आणि इतिहासात अजरामर होऊन गेला. एका क्षणी अॅण्ड्रय़ूने आपला सारा धंदा विकून (१९०१ मध्ये) मिळालेली सारी संपत्ती ($ 200 million) शिक्षण, ग्रंथालये यांच्या निर्मिती प्रसाराकरिता ट्रस्ट करून जनतेला देऊन टाकली आणि तो भौतिक सुखांपासून दूर झाला. अॅण्ड्रय़ू हा जॉन वूडचा आदर्श होता, त्याला समोर ठेवून त्याच्याच पावलांवर पाऊल टाकत, त्याचे अनुकरण करीत जॉन वूडने आपल्याला भरपूर पैसा, सुखसुविधा मिळवून देणाऱ्या नोकरीचा त्याग केला आणि नेपाळ हे आपले कार्यक्षेत्र ठरविले आणि त्यातून उभी राहिली ‘खोली ग्रंथालयाची’ (Room To Read) ची संकल्पना.<br />
पुस्तकातील ही सुरुवातीच्या प्रकरणातील जॉन वूडच्या मानसिक हेलकाव्यांची कहाणी, तर नंतरची पुढची सारी प्रकरणे म्हणजे वृद्धिंगत होत जाणारे ‘रूम टू रीड’च्या यशस्वितेचे प्रगतीपुस्तक आहे. जॉन वूडने केलेले प्रयत्न, त्याच्या वडिलांकडून, मैत्रिणीकडून, अनेक अनोळखी लोकांकडून मिळालेला पाठिंबा, हजारोंनी पुस्तकांची जमवाजमव सारे स्तिमित करणारे आहे. ग्रंथालयापासून सुरू झालेली वूडची कल्पना यात्रा पुढे शाळा उभारणीकडे वळते. केवळ एकच देश (नेपाळ) सोडून व्हिएतनाम, कंबोडिया, श्रीलंका, भारत इथपर्यंत पसरते. मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरीस असताना दिनरात `Nothing Small Every Thing Big' हे एकच घोषवाक्य सतत जॉनच्या कानांवर पडायचे. त्याच्याच परिणामी हेच सूत्र या सामाजिक कार्यातही त्याने राबविले आणि आशिया-आफ्रिकेतील सात देशांमध्ये अल्पावधीत प्रचंड मोठे स्पृहणीय काम उभे केले. जगभरातून सतत मदतीचा ओघ चालू राहण्याकरिता भिक्षा मागीत भ्रमंती चालू ठेवली.<br />
आज ५० लाख मुलांना साक्षर करण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले आहे. मुलास साक्षर केले तर फक्त तो मुलगा साक्षर होतो, पण एक मुलगी साक्षर झाली तर सारं कुटुंब साक्षर होतं, यावरच्या श्रद्धेने तो मुलींना हलाखी अज्ञानातून बाहेर काढण्याकरिता धडपडतो आहे.<br />
अनेक पारितोषिके मिळालेल्या त्याच्या या ‘विना नफा संस्थे’ने चार हजारांहून अधिक ग्रंथालये, ४० लाखांहून अधिक पुस्तकांचे वाटप/निर्मिती, ४०० शाळांची उभारणी, तर चार हजार मुलींना शिष्यवृत्ती देऊन शिक्षण प्रसाराचं आगळंवेगळं काम अनेक देशांतून केलं आहे.<br />
हे पुस्तक अधूनमधून थोडंसं कंटाळवाणं वाटणारं, काही ठिकाणी आत्मप्रौढी मिरविणारं जरी असलं, तरी निलरेभी व्यावसायिक दृष्टिकोनातून सामाजिक कार्यही कसं यशस्वितेचं शिखर गाठू शकतं, याचं समाजकार्याची आवड, तळमळ असणाऱ्यांकरिता मार्गदर्शक आहे.<br />
नवश्रीमंतीचे वारे जगभर वाहत असताना, नवनवीन चैनीची उपभोगाची साधने सहजी उपलब्ध होत असताना आणि परदेशवारीचे ग्रह साऱ्यांच्याच भाग्यरेषेवर चमकत असताना दारिद्रय़ाचा सभोवताली पसरलेला अंधार आणि त्यातील लाखो निरक्षर हे अजून दूर काळोखात लोटले जाताहेत. समाज श्रीमंती शिखराकडे कूच करताना प्रत्येक पायरीने दारिद्रय़ाची दरी खोल खोल होत जाते आहे. पण काळोखाकडे बघायचेच नाही म्हटल्यावर व बघितल्यास शिखर चढतानाची पायरी घसरून खाली पडण्याची भीतीच बाळगल्यावर उपेक्षितांच्या आयुष्यात सुखाची पहाट तरी कधी उगवणार? म्हणूनच जॉन वूडचं मोठेपण जाणवतं ते त्याच्या निश्चयात. संपन्न अमेरिकेतील मोठय़ा पगाराचा सत्ता-संपत्तीचा लोभ सोडून त्याने घेतलेल्या निर्णयात.`Leaving Microsoft to Change the World' हे पुस्तक म्हणजे जॉन वूडची कृतिगाथा नुसती वाचनीयच नाही तर अनुकरणीय आहे.</span><br />
<b>लीव्हिंग मायक्रोसॉफ्ट टू चेंज द वर्ल्ड:<br />
लेखक : जॉन वूड<br />
प्रकाशक : हार्पर, पृष्ठे : २७८<br />
मूल्य : १६.९९ यूएस डॉलर </b><br />
कुमार नवाथे<b> - </b>लोकसत्ता ग्रंथविश्व <br />
kumar.nawathe@hotmail.com </div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-9200044420350060772011-11-10T00:51:00.000-08:002011-11-10T00:51:08.894-08:00पुन्हा एकदा फाळणी !(The Shadow of the Great Game: The Untold Story of India's Partition)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><b>विश्वास दांडेकर,लोकसत्ता ग्रंथविश्व</b><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgWfQXe1GHKtGlRBX4mQui6LY8ir2JQKhi5yQz-EDqZDZu8gwkbKQZK47SfzkNxYqbkC8VddBJvgc9vmZLpg69Uf5wdvb7zZxY8r-ZRuu9KBr3x1leci9t9zw_44Q8JTSw5mGEKKfOCnk50/s1600/1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgWfQXe1GHKtGlRBX4mQui6LY8ir2JQKhi5yQz-EDqZDZu8gwkbKQZK47SfzkNxYqbkC8VddBJvgc9vmZLpg69Uf5wdvb7zZxY8r-ZRuu9KBr3x1leci9t9zw_44Q8JTSw5mGEKKfOCnk50/s320/1.jpg" width="217" /></a></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjtCKoFxxPkp3ikB9r-7yd9PutegouJ9g-LuQ4tpLzQQGD2PbIlJQnyDL1h4Xf2AaHl0UDalGM6ArFeEWfjh18u9qqiwXPbtY3XyFunOlaoantvxCjYaUrxKjp_az7isswD_G41ovvJ_4Ao/s1600/1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><br />
</a></div><b> </b><span style="font-size: large;">१५ ऑगस्ट १९४७. स्वातंत्र्य आले ते फाळणीच्या जखमा घेऊन. या ना त्या कारणामुळे आज ६४ वर्षांनंतरही या जखमा भरलेल्या नाहीत, भरली एखादी तरी पुन्हा उघडते. साहजिकच फाळणी-पाश्र्वभूमी-इतिहास-परिणाम यावर एक ग्रंथालय भरेल, एवढे लिखाण झाले आहे. याच धारेतले हे पुस्तक. प्रश्न असा आहे की, आता या विषयावर नवे काय सांगायचे शिल्लक आहे? त्यासाठी हे पुस्तक अवश्य अभ्यासायला हवे. <br />
फाळणीची कारणे नोंदताना : १) जीनांचा हट्टाग्रह २) ‘फोडा-झोडा’ ही ब्रिटिश नीती ३) नेहरू-पटेल यांना सत्ता स्वीकारण्याची घाई ४) महात्मा गांधींचा मुस्लीम अनुनय ५) अखंड भारत स्वीकारून प्रत्येक बाबतीत जीनांना ‘व्हेटो’ (नकाराधिकार) देऊन राष्ट्र दुबळे ठेवण्यापेक्षा तुकडा तोडण्याचा नेहरू-पटेल यांचा निर्णय ६) अनेक तुकडे होण्यापेक्षा पाकिस्तान देऊन उरलेला भारत अखंड ठेवणे (सर्वनाशे समुत्पन्ने र्अध त्युजती पंडित:) असा विचार, अशी अनेक कारणे, त्याचे पुरावे-अनुमान-तर्क मांडले गेले आहेत. ‘अटळ निर्णय’ ते ‘फाळणीचे गुन्हेगार’ असा मोठा पट या कारणमीमांसेत व्यापला आहे.<br />
एक मुद्दा सहजच लक्षात येतो की, वरील सर्व गोष्टी या भारतीय उपखंडातले घटक-घटना केंद्रस्थानी ठेवून मांडल्या आहेत. भारताच्या फाळणीला एक फार महत्त्वाचा मोठा पदर हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आहे (आजही अस्तित्वात) याकडे पुरेसे लक्ष दिलेले नव्हते. सरीला यांनी त्या गोष्टीला प्राधान्य देत अनेक बाबी नव्याने प्रकाशात आणल्या.<br />
पहिले महायुद्ध (१९१४-१९१८) व दुसरे महायुद्ध (१९३९-१९४५) या विश्वव्यापी महायुद्धांनी अत्यंत बलशाली ब्रिटिश साम्राज्य कोसळले. जर दुसरे महायुद्ध झाले नसते तर १९४७ ला स्वातंत्र्य शक्य नव्हते, हे आपण मनोमन स्वीकारलेले नाही. कारण सत्ताधाऱ्यांनी आपणास गोष्टी समजावून सांगितल्या नाहीत. मात्र पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश नौदल अमेरिकेच्या नौदलापेक्षा लहान झाले व दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता म्हणून पुढे येत ब्रिटनचे जागतिक महत्त्व संपले. सुंभ जळला पण पीळ? हा पीळ केविलवाणी वळवळ पुढे काही काळ करत राहिला. (सुवेझ १९५६, युद्धात भारतानेच प्रथम आक्रमण केले- १९६५ भारत-पाकिस्तान युद्ध- ब्रिटिश प्रधानमंत्र्यांचे वक्तव्य.) या पीळ जपण्याच्या भावनेतून भारत सोडताना त्यातला पश्चिमेचा भाग (गिलगिट ते कराची हा पट्टा) हा त्या पलीकडच्या तेल क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी (इराण, इराक, आखाती देश, सौदी अरेबिया) आपल्याला सैनिकी तळ उभारू देईल, अशा मंडळींच्या ताब्यात हा पट्टा हवा. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर येणार असलेली काँग्रेस साम्राज्यवादविरोधी असल्याने तळ उभारू देणार नाही म्हणून फाळणी, असा विचार पक्का झाला, कृती झाली. याचे लिखित पुरावे लेखकाने तपशिलात दिले आहेत.<br />
भारतात एकेकाळच्या अमेरिकेविरोधी तयार केलेल्या मानसिकतेमुळे दोन गोष्टी ठळकपणे मांडल्या जात नाहीत. १) भारताच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती रुझवेल्ट यांनी केलेले मोठे प्रयत्न व २) काश्मीरचे भारतातले विलीनीकरण कायदेशीर आहे ही अमेरिकेची सुरुवातीची भूमिका. १९४६ साली पं. नेहरूंच्या (अंतरिम) इंटेरिम मंत्रिमंडळाची सत्तेत स्थापना होणार हे लक्षात येताच ब्रिटनचा विरोध डावलून अमेरिकेने नवी दिल्ली येथे स्वत:चा राजदूत तातडीने नेमला. या सर्व घटनांचे तपशील पुस्तकात आहेत.<br />
‘खनिज’ तेल या गोष्टीला अतोनात महत्त्व आले, ते साधारण गेल्या १००-११० वर्षांत. मात्र त्या आधी हाच गिलगिट ते कराची हा पट्टा रशिया दक्षिणेकडे हातपाय पसरेल या अनाठायी भीतीपोटी ब्रिटनला सामरिक महत्त्वाचा वाटत असे. याला आवर घालणे या बुद्धिबळाच्या खेळाला नाव पडले ‘द ग्रेट गेम’. ब्रिटन जाऊन अमेरिका आली, रशिया जाऊन चीन आला. ‘ग्रेट गेम’ सुरूच आहे. या पट्टय़ाचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात वायव्य सरहद्द प्रांत जर भारताच्या बाजूला ठेवता आला असता तर पाकिस्तानची निर्मिती शक्य झाली नसती. कारण पश्चिम तेल क्षेत्राकडे भौगोलिक सलगता मिळत नव्हती. खान अब्दुल गफारखानांना बाजूला सारत हा प्रश्न काँग्रेसच्या नेतृत्वाला हूल देत ब्रिटिशांनी कसा आपल्याला अनुकूल सोडवला त्याचा तपशील थक्क करणारा आहे.<br />
महंमद अली जीना व त्यांचा फुलवलेला अहंकार हे खरे तर प्यादे होते. काँग्रेसच्या स्थापनेपासून (१८८५) १९४७ पर्यंत मुस्लीम समाज कधीच स्वातंत्र्य चळवळीत नव्हता. जीना काँग्रेसमध्ये असताना वा मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना मुस्लीम जनतेत अनुयायी किती? अगदी १९४५-४६ पर्यंत पंजाब, सिंध, बंगाल व सरहद्द प्रांत (स्थापनेच्या वेळचा पाकिस्तान) इथले निवडून आलेले सत्ताधारी मुस्लीम पक्ष व नेते जीना व पाकिस्तान यांच्याविरोधीच होते. हे सर्व भाग मुस्लीम बहुसंख्येचे, त्यामुळे त्यांना ‘एक व्यक्ती-एक मत’ याआधारे सत्ता मिळतच होती, हिंदू बहुसंख्येची भीती नव्हती. जीनांना पाठिंबा आजच्या भारतातल्या - विशेषत: बिहार-उत्तर प्रदेश इथल्या मुस्लीम नेते-अनुयायांचा होता. हे सर्व राजकारण ब्रिटिशांनी कसे घडवले याचे काही नवे तपशील पुस्तकात आहेत. सिमला योजना ही एक हूल- धूळफेक होती. फाळणी करायची, पण ही मागणी जीनांप्रमाणे काँग्रेस नेतृत्वानेही करावी यासाठी भारताची अनेक शकले होण्याची शक्यता असलेली ही योजना एकमेव नव्हे. क्रिप्स मिशन, सिमला, कॅबिनेट मिशन हे सर्व एकाच माळेचे मणी. मात्र एकदा काँग्रेस नेतृत्वाने फाळणी स्वीकारल्यावर भारताचे आणखी तुकडे फाळणीच्या वेळी होणार नाहीत हे तत्त्व प्रधानमंत्री अॅटली यांनी जपले.<br />
गांधीजी १९२० पासून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे सर्वोच्च नेते होते. १९३९ साली युद्ध सुरू झाल्यावर त्यांनी व्हाइसरॉयना भेटून युद्ध प्रयत्नाआड काँग्रेस येणार नाही, असे आश्वासन दिले होते. ४ सप्टेंबर १९३९ रोजी सिमला येथे व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांना गांधीजी म्हणाले होते की, ते स्वत: या लढय़ाकडे एक इंग्रज पाहील तसे पाहतात आणि ब्रिटिश संस्कृतीच्या इमारती, संस्था यांना युद्धामुळे जी हानी पोचण्याची शक्यता आहे, त्याने ते फार अस्वस्थ आहेत. <br />
भावना दाटून आल्यामुळे हे सर्व बोलताना गांधीजींचा कंठ दाटून येत होता व त्यांना त्या आवेगापोटी एका धारेत बोलणे अशक्य झाले होते. तेच गांधीजी १९४० च्या मध्याला जर्मनीने फ्रान्स जिंकल्यावर त्याच लिनलिथगो यांना सांगतात : ‘तुमच्या राष्ट्राचा ताबा जर्मनीकडे जाऊ देण्याचे धैर्य दाखवा. जर हिटलर तुमची घरे ताब्यात घेऊ पाहील तर घरे रिकामी करा. जर हिटलर तुम्हाला देश सोडून जायला प्रतिबंध करेल, तर मुले-स्त्रिया-माणसे सर्वानी मरणाला सामोरे जा.’ थोडक्यात, अहिंसा- मग नष्ट झाला तरी चालेल. (या १९४० च्या संभाषणाचा तपशील मौलाना आझादांच्या पुस्तकातही आहे.) गांधीजींचा हा अनाहूत ‘सल्ला’ जीवन-मरणाचा लढा देणाऱ्या राष्ट्राच्या मनात काय तरंग उमटवील?<br />
थोडक्यात : स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळू नये म्हणून ब्रिटिशांनी जीनांना पाठबळ दिले. मात्र दुसरे महायुद्ध ऐन भरात असतानाच युद्धोत्तर स्वतंत्र भारतात आपले तळ ‘तेल क्षेत्रा’साठी हवेत म्हणून फाळणी घडवून आणली. जीनांनी माघार-तडजोड असा मार्ग चोखाळला असता तर दुसऱ्या कुठल्या तरी साधनाने परतणाऱ्या ब्रिटिश सत्तेने फाळणी घडवलीच असती.<br />
इतिहास-राज्यशास्त्राचे विद्यार्थी-प्राध्यापक यांनी अभ्यासलेच पाहिजे, सुजाण नागरिकांनी वाचलेच पाहिजे,असे हे पुस्तक अत्यंत रसाळ, ओघवत्या भाषेत, संशोधन शिस्त न सोडता लिहिण्याचे कसब वाखाणण्यासारखे आहे.<br />
हा परिचय लेख लिहिताना लेखक नरेंद्रसिंग सरिला यांच्या निधनाचे वृत्त आले. मध्य भारतातल्या एका लहानशा संस्थानचा हा राजपुत्र माऊंटबॅटन यांच्या ताफ्यात एडीसी म्हणून होता. पुढे भारतीय परराष्ट्र खात्यात निरनिराळ्या पदांवर कार्यरत राहत फ्रान्समध्ये भारताचा राजदूत झाला. परराष्ट्र सेवेतून निवृत्त झाल्यावर ‘नेस्ले’ या बहुराष्ट्रीय कंपनीत वरच्या पदावर काही काळ त्यांनी व्यतीत केला. भूव्यूहात्मक विश्लेषण करणारे लिखाण ते करत असत.<br />
हा पुस्तक परिचय लेख ही भारताच्या या सुपुत्राला श्रद्धांजली.<b> </b></span><br />
<span style="font-size: large;"><b>The Shadow of the Great Game: The Untold Story of India's Partition </b></span><br />
<span style="font-size: large;"><b> द शॅडो ऑफ द ग्रेट गेम : द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज् पार्टिशन- नरेंद्रसिंग सरिला.<br />
प्रकाशक : हार्पर-कॉलिन्स २००५, <br />
पुठ्ठा बांधणी आवृत्ती २००९.<br />
पृष्ठसंख्या-४३६, मूल्य रु. : ६००/-. </b></span></div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-65203228910111462902011-08-10T07:28:00.000-07:002011-08-10T07:28:52.676-07:00व्हॅली ऑफ फ्लॉवर्स<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhFvh5gf856yPOuF_jsi_a495gHVr0lWYuRPahG867VEHJhdPiB-U-5XpVUWMftIrOQr1eqQGvBGlYsCCuewedpV4Ux1bva7wg-cAqAHPfZ6VFNdMmfX15LGM78g0EC-U4TLUVmZrpIB6g9/s1600/vally+of+flowers.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhFvh5gf856yPOuF_jsi_a495gHVr0lWYuRPahG867VEHJhdPiB-U-5XpVUWMftIrOQr1eqQGvBGlYsCCuewedpV4Ux1bva7wg-cAqAHPfZ6VFNdMmfX15LGM78g0EC-U4TLUVmZrpIB6g9/s1600/vally+of+flowers.jpg" /></a></span></div><span style="font-size: large;">हिमालय म्हणजे स्वर्ग! मग हिमालयातील पुष्पदरीला स्वर्गाचे नंदनवनच म्हटले पाहिजे. या पुष्पदरीला आयुष्यात एकदी तरी भेट देण्याचे मनसुबे प्रत्येक जण आखत असतो. पण अवाढव्य पसरलेल्या हिमालयाच्या अंगावर विसावलेल्या या पुष्पदरीला जायचे कसे इथपासून ते तिथे कधी जायचे, काय पाहायचे असे अनंत प्रश्न आपल्यापुढे उभे राहतात. एकतर अशा विषयांवर शास्त्रीय आणि माहितीपूर्ण असे लेखन नाही. असलेच तर ते मराठीत नाही. या साऱ्या पाश्र्वभूमीवर पुण्याच्या स्नेहल प्रकाशन संस्थेच्यावतीने नुकतेच या पुष्पदरीची सांगोपांग माहिती देणारे एक शास्त्रीय पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे, - ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’!<br />
प्रसिद्ध वनस्पती तज्ज्ञ प्रा. प्र. के. घाणेकर यांनी लिहिलेल्या या बहुरंगी पुस्तकातून जणू ही पुष्पदरीच आपल्याशी बोलते. मूळात भटकंतीची आवड आणि त्यामध्ये वनस्पतीशास्त्राचा अभ्यास यामुळे प्रा. घाणेकरांच्या या पुस्तकाद्वारे एक मार्गदर्शकाचा हातच आपल्याला मिळतो. या पुष्पदरीची ओळख, तिचे भौगोलिक स्थान, या स्थानाचा इतिहास, फुलांचा प्रदेश म्हणून जगाला झालेली ओळख इथपासून ते इथे आढळणाऱ्या वनस्पती, फुलांच्या ओळखीपर्यंत असे सारे काही या पुस्तकात दडले आहे. हिमालयातील असंख्य रानफुलांच्या माहितीबरोबरच या पुष्पदरीच्या मार्गावरचे स्थलदर्शन, निसर्गदर्शन, या भागात आढळणारे वैशिष्टय़पूर्ण पशू-पक्षी, वनस्पती यांची माहितीही या पुस्तकात आहे. कुठल्याही भागाला त्याचे स्थानिक लोकजीवन, इतिहास, दंतकथाही असतात. घाणेकरांनी पुष्पदरीच्या या अंगांचाही वेध घेतल्याने जणू हा सारा परिसरच जिवंत झाला आहे. लेखकाच्या या उत्स्फूर्त लिखाणामुळे आपण जणू त्यांच्याच डोळ्यांनी आणि मनाने ही भटकंती करत आहोत असे वाटते. रंगांच्या या दुनियेवरील हे पुस्तकही बहुरंगी अशा प्रकाशचित्रांनी सजलेले आहे. एकूणच फुलांची ही दुनिया या पुस्तकातून तितकेच अनोखे रंग घेऊन आपल्यापुढे उभे राहते. </span><br />
<span style="font-size: large;"> (<span style="color: yellow;">व्हॅली ऑफ फ्लॉवर्स</span> : स्नेहल प्रकाशन, पुणे. </span><br />
<span style="font-size: large;">लेखक : <span style="color: yellow;">प्रा. प्र. के. घाणेकर</span>. </span><br />
<span style="font-size: large;">मूल्य : <span style="color: yellow;">२२५ रुपये</span>)</span><br />
<br />
</div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-63323737072009220252011-08-02T05:56:00.000-07:002011-08-02T05:58:43.557-07:00विदारक वास्तव<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhVkmKgTnROvrPkyhXJ6VO05F_Sk1q9h3N1JWtH6ytUWy89D5e9Yp4vyRaKr4v2NDleEKHBhT52N2q2aKgUMcDKZ6FNOI9-fDgWXIadGDd12ryRaMU3vAELCvNPxzcIDmJiSQPCtVJtUQKL/s1600/1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhVkmKgTnROvrPkyhXJ6VO05F_Sk1q9h3N1JWtH6ytUWy89D5e9Yp4vyRaKr4v2NDleEKHBhT52N2q2aKgUMcDKZ6FNOI9-fDgWXIadGDd12ryRaMU3vAELCvNPxzcIDmJiSQPCtVJtUQKL/s1600/1.jpg" /></a></div><div style="text-align: center;"><br />
</div><span style="font-size: large;">त्या घरातल्या पडद्याआड असलेल्या सुनांशी बोलताना मी त्यांचं लक्ष त्या गोष्टीकडे वेधलं, की ‘हा पोपट अगदी बिहारच्या स्त्रियांसारखा आहे; पिंजऱ्यात बंद असला तरीही आनंदी आहे.’<br />
काही वेळ सगळीकडे शांतता पसरली. शांततेचा भंग करत छोटी सून म्हणाली, ‘असं अजिबात नाही, इथंही बायकांना बाहेर पडण्याची इच्छा आहे, काहीतरी करण्याची बिहारच्या स्त्रियांचीदेखील इच्छा आहे, पण समाज त्यांना रोखून ठेवतो.’<br />
हा संवाद आहे डॉ. कल्पना शास्त्री यांच्या ‘मी अनुभवलेला बिहार’ या पुस्तकातील. ही परिस्थिती बिहारमधील स्त्रियांची आहे; पण एकूणच भारतातील स्त्रियांची परिस्थिती यापेक्षा किती वेगळी असू शकेल, असा प्रश्न पडतो. आजच्या जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळातही किती स्त्रियांना मोकळा श्वास घेऊन जगता येतं?<br />
पुस्तकाच्या सुरुवातीला बिहारमधील सामाजिक कार्याकडे कसे ओढले गेलो हे डॉ. शास्त्री सांगतात. त्यांचे वडील मध्य प्रदेशातल्या मागासलेल्या बुंदेलखंडमधील सागर या शहरातले. पेशाने डॉक्टर. आई सुधारक वृत्तीची. त्यामुळे घरातून मोकळेपणाचे वातावरण मिळाले. पुढे हे सर्व कुटुंब वध्र्याला स्थायिक झाले. महाराष्ट्रात असतानाच समाज परिवर्तनाचा ध्यास लेखिकेच्या मनात रुजला. तरुण शांती सेना या सवरेदयी विचारांच्या जे.पीं.नी सुरू केलेल्या संघटनेच्या संपर्कात त्या आल्या. पुढे त्यांचा विवाह शुभमूर्तीशी झाला. शुभमूर्ती बिहारमधील मिथिला क्षेत्रातल्या रासोडय़ाचे. ते स्वत: जे.पीं.च्या पहिल्या ‘छात्र संघर्ष वाहिनी’चे पहिले संयोजक होते. त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून बिहारमध्येच सामाजिक कार्य करण्याचा निर्णय कल्पना शास्त्रींनी घेतला.<br />
रासोडय़ाला राहू लागल्यावर तिथले मागासलेपण, वीज नसणे, स्त्रियांवर असलेली सामाजिक बंधने या सर्वाचा लेखिकेने घेतलेला अनुभव वाचण्यासारखा आहे.<br />
२५ वर्षांपूर्वी लेखिका लालूप्रसाद यादवांच्या बिहारमध्ये गेल्या तेव्हा बिहारचे तुकडे झाले नव्हते. (झारखंड वगैरे राज्ये झाली नव्हती.) त्यांनी बिहारचा जो प्रदेश अनुभवला तो प्रांत म्हणजे मिथिला. बुढी गंडक आणि बागमती या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं रासोडा हे गाव त्यांचं कार्यक्षेत्र. नद्यांना येणारे पूर, विजेचा अभाव, सेवा-सुविधांचा अभाव याबद्दलची माहिती ‘तेव्हाचा बिहार’ या प्रकरणात आली आहे. त्या वेळच्या आणि एकूणच बिहारच्या कुटुंबप्रधान संस्कृतीची सविस्तर चर्चा केली आहे. त्याबाबत लेखिका म्हणतात, ‘सामंती मूल्यांना धरून असणाऱ्या एकत्र कुटुंबाच्या सामाजिक पायावर उभा असलेला बिहार हे बिहारचे अंतर्गत चित्र आहे. जातीवर आधारित समुदायाचा मजबूत पाया हेदेखील बिहारच्या समाजाचं अंतर्गत चित्र आहे. असं चित्र असलेल्या समाजात समतेच्या पातळीवर संवाद साधणं अशक्य करण्यात आलं आहे.’ एकत्र कुटुंबाचे सकारात्मक पैलूही लेखिकेने सांगितले आहेत, पण त्याचबरोबर त्या म्हणतात, ‘पण कुटुंबात एकोपा राखण्यासाठी स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व नाकारणं, ही कुठली संस्कृती मानायची?’<br />
समाजात स्त्रियांविषयी काही पक्क्य़ा समजुती आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुष स्त्रियांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. त्या विनाकारण बोलतात, त्या कुटुंबात फूट पाडतात अशी त्यामागची कारणे सांगितली जातात. कोणत्याही पुरुषाच्या चुकीच्या वागणुकीमागे स्त्रीचंच डोकं असतं, असाही समज आहे. चांगली स्त्री म्हणजे, तिनं कितीही मतभेद, अशांती असो, काही बोलायचं नाही. पोटात आग पेटलेली असली, तरी तोंडातून धूर निघायला नको..<br />
बिहारमधल्या स्त्री-जीवनाबद्दल सांगताना डॉ. शास्त्री म्हणतात, इथं एक काळ असा होता की, स्त्रियांच्या विद्वत्तेला मान होता. म्हणूनच विद्वान पंडितांच्या चर्चेत निर्णायक म्हणून त्यांना मान्यता होती. आज मात्र जणू काही सर्वच बदललं आहे.<br />
बिहारमधील एकूण स्त्रिया, मग त्या उच्चमध्यमवर्गीय कुटुंबातील असल्या तरी मुलांचे पालन-पोषण आणि स्वयंपाकघरातच गुंतलेल्या असतात. सकाळ-संध्याकाळचा नाश्ता, दोन्ही वेळेस ताजं जेवण, गरम फुलके हे आवश्यकच असतं. पुरुष बाहेरच्या व्हरांडय़ात तर स्त्रिया घरातल्या अंगणात असतात. त्या घरातल्या पुरुषासमोरही पडदा ठेवतात. कधीही घराबाहेर जात नाहीत. प्रत्यक्ष अनुभवातली अनेक उदाहरणे, प्रथा सांगत लेखिका आपली मते व्यक्त करते. कौटुंबिक हिंसाचार तर सर्वत्र आढळतो. अर्थात, तो भारतात इतरत्रही आढळतो. बिहारमधील काही गावं चांगल्या किंवा वाईट वैशिष्टय़ांमुळे प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध आहेत. जरा मुलगी बोलली, पतीला किंवा सासरच्यांना आवडलं नाही तर तिला मारून नदीत फेकून देतात. अशा गोष्टी आजही घडत असतील तर ते किती धक्कादायक आहे.<br />
‘जाती-धर्म आणि स्त्रिया’ या प्रकरणात डॉ. शास्त्री म्हणतात- ‘जात न मानणं हे ग्रामीण समाजासाठी धर्म भ्रष्टतेचं लक्षण आहे. ही धर्मभ्रष्टता केवळ उच्च-नीच जातीतील स्त्रियांनी एकत्र जेवायला न बसण्यातूनही दिसून येते.’ याचा आणखी प्रत्यय एकूणच बिहारी समाजात येतो. १९५० मध्ये लेखिकेच्या सासऱ्यांनी दलितांसाठी शाळा सुरू केली त्याबाबतही हाच अनुभव होता. १९८० च्या दशकात आणि आजही ज्या भागात जी जात उच्च मानली जाणारी असेल त्या जातीचं त्या गावात वर्चस्व असतं.<br />
डॉ. शास्त्री दलित स्त्रियांची शिबिरे घेत असत. त्यांचं कार्य हे समाजसेवेचं नसून समाज परिवर्तनाचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. दलित स्त्रिया आणि भूमिहीन मुसहर जातीतील स्त्रियांवरच्या अत्याचाराचे अनेक अनुभव त्यांनी कथन केले आहेत. अशा तळागाळातल्या लोकांमध्ये काम केल्यावर त्यांना वैद्यकीय मदतीची किती गरज आहे हे डॉ. कल्पना शास्त्रींना जाणवलं. त्यातूनच त्यांचा आरोग्यविषयक प्रकल्प आकाराला आला. मुलगा-मुलगी यांच्याशी भेदभावाचं वागणं, वृद्ध आणि विधवा स्त्रियांचे प्रश्न याबद्दल उदाहरणे देऊन लेखिकेने मार्मिक चर्चा केली आहे.<br />
लेखिका ज्या संघटनेमध्ये काम करत होती, त्या कार्यामुळे समाजात बदल घडू लागले. तरुण महिलांमध्ये आरोग्य सेविका, जागरूकता शिबीर, संघटन या सर्वामुळे वातावरण बदललं, विचारसरणी बदलली. परिवर्तनाच्या खुणा गावात घडणाऱ्या अनेक घटनांतून दिसू लागल्या.<br />
स्त्रिया अनौपचारिकपणे भेटू शकतील या उद्देशानं डॉ. शास्त्री यांनी गावात एक महिलाघर स्थापन केलं. पुढे हे महिलाघर सार्वजनिक ठिकाण झालं. स्त्रिया दुपारच्या वेळी इथे आपली कामे करत, अत्याचार झालेल्या स्त्रीसाठी इथे पंचायत भरत असे. तसेच औषधाची पेटी, तक्ते या सर्व गोष्टींची माहिती महिलाघरातच सर्वाना समजावून सांगण्यात येऊ लागली. त्यांनी स्वत:च्या घरातच आरोग्य केंद्र सुरू केलं. शिबिरातून त्यांनी आरोग्य सेविका तयार केल्या. याच आरोग्यसेविका समाज परिवर्तनाच्या माध्यम ठरत गेल्या. अनेक अनुभवांवरून लेखिकेच्या असं लक्षात आलं की, गावातले लोक जेव्हा गावातल्या लोकांसाठी काम करतात तेव्हा ते अधिक प्रभावी होतं.<br />
बिहारच्या समस्या एकमेकांत गुंतलेल्या होत्या. बेकारी, अत्यंत गरिबी म्हणजे गरिबीचं अमानवी स्वरूप, आजार, निरक्षरता, लोकांची कर्तव्यशून्यता अशा अनेक समस्या एकमेकांशी निगडित होत्या. त्यामुळे लोकांवर केवळ उपचार करून प्रश्न सुटणार नव्हते. त्यामुळे डॉ. शास्त्री यांच्या संस्थेनं सामाजिक कामाच्या तसेच शैक्षणिक कार्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली. आज ही संस्था ७५ गावांमध्ये कार्यरत आहे.<br />
शेवटी डॉ. कल्पना शास्त्री म्हणतात- ज्या समाजात बहुसंख्य लोक मागासलेले असतात, तो समाज या बहुसंख्य लोकांच्या प्रगतीनेच पुढे जाऊ शकतो. त्यानंतरच संपूर्ण समाजात सुव्यवस्था निर्माण होते आणि दैनंदिन व्यवहारामध्ये संस्कृतीचं दर्शन होतं. पुढारलेले मूठभर लोक पुढे गेले तरी बाकीचा समाज मागे राहतो. हे मात्र निश्चित आहे की, आता बिहारची प्रगती करायची असेल तर तिथल्या मागासलेल्या, दलित, अशिक्षित समाजाच्या महिलांची प्रगती होणं आवश्यक आहे. महिलांची प्रगती करायची असेल, तर आता महिलांच्या भागीदारीबरोबर त्यांच्या नेतृत्वनिर्मितीचा विचार करायला पाहिजे. हे नेतृत्व संस्कृतीवर आधारित असेल. नवीन बिहारच्या निर्मितीसाठी केवळ विकासाच्या नव्हे, तर उत्थानाच्या मार्गावर चालावं लागेल. त्यानंतरच बिहारची आणि पर्यायानं देशाची नवनिर्मिती होईल.’<br />
‘मी अनुभवलेला बिहार’ या पुस्तकातील माझा प्रवास, तेव्हाचा बिहार, बिहारमधील स्त्री-जीवन, जाती-धर्म आणि स्त्रिया, आमचं आरोग्यविषयक काम, सामाजिक कामाच्या दिशेने, शैक्षणिक कार्य या सात प्रकरणांतून बिहारमधील स्त्रियांची आणि त्या अनुषंगाने एकूणच समाजातील समस्यांची स्थिती-गती वाचून वाचक अंतर्मुख होतो. एकविसाव्या शतकात ‘महासत्ता’ होणाऱ्या भारतातील हे चित्र अत्यंत विदारक आहे. ‘शितावरून भाताची परीक्षा’ या म्हणीप्रमाणे ‘सरंजामी’ बिहारमधील २५-३० वर्षांपूर्वीची सामाजिक शोकांतिका थोडय़ाफार फरकाने भारतातील सर्वच ग्रामीण, दुर्गम भागात आजही आढळून येईल. अगदी पुरोगामी म्हणवणाऱ्या ‘सरंजामी’ महाराष्ट्रातही (आता महाराष्ट्राचा बिहार होतोय!) महासत्ता, जागतिकीकरण, जीडीपी, अण्वस्त्र निर्मिती, भ्रष्टाचार, घोटाळे, बेकारी, दारिद्रय़ वगैरे वगैरे (आणखी कितीतरी वगैरे) भूलभुलैयामुळे ‘मुकी बिचारी कुणी हाका’ या न्यायानं प्रगती होतेय ती फक्त शोषणकर्त्यांची आणि अधोगती होतेय ती ११० कोटी लोकसंख्येपैकी ८०-९० कोटी लोकांची. मग स्वातंत्र्याचा अर्थ काय?<br />
कल्पना शास्त्री यांच्या संस्थेचे नाव व त्याविषयी थोडी अधिक माहिती पुस्तकात आली असती तर वाचकांच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरली असती. ‘मी अनुभवलेला बिहार’ हे पुस्तक डॉ. कल्पना शास्त्री यांच्या प्रत्यक्ष कार्यावर आणि अनुभवावर आधारलेले असल्यामुळे अतिशय वाचनीय झाले आहे.</span><br />
<span style="font-size: large;">अनिल किणीकर ,लोकरंग,दै.लोकसत्ता <br />
मी अनुभवलेला बिहार: <span style="color: yellow;">डॉ. कल्पना शास्त्री</span><br />
<span style="background-color: yellow;">मनोविकास प्रकाशन</span><br />
पृष्ठे-१६४, मूल्य- १६० रुपये</span></div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-52666746988324086982011-04-30T23:44:00.000-07:002011-04-30T23:48:02.662-07:00गुरूनाथ नाईक यांचा ‘विश्वविक्रमी’ रहस्यमय प्रवास(the author of 1024 marathi novels)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><b>सौजन्य : अतुल माने,<a href="http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=121099:2010-12-11-15-05-45&Itemid=1">दै.लोकसत्ता</a></b><br />
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLrK1V-bUgJndWhYyOb-uZZnA3IqUG8xF9zdRNsbRCFqw-NH1GOIXdl6Z3e_gRbTfv1HE4vHDNPzjRtqTzekyPejzUE0qoSxnnD0lIQN9I-ywCEWKQ0DXBVDUo4NZpwgfSfRd5kWMWZIpI/s1600/mvv05.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="200" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLrK1V-bUgJndWhYyOb-uZZnA3IqUG8xF9zdRNsbRCFqw-NH1GOIXdl6Z3e_gRbTfv1HE4vHDNPzjRtqTzekyPejzUE0qoSxnnD0lIQN9I-ywCEWKQ0DXBVDUo4NZpwgfSfRd5kWMWZIpI/s200/mvv05.jpg" width="137" /></a><span style="font-size: large;">अद्भुत, उत्कंठावर्धक तसेच क्षणाक्षणाला श्वास रोखून धरण्याची जबरदस्त ताकद असलेल्या रहस्यकथांच्या माध्यमातून तमाम वाचकांना एका वेगळ्याच दुनियेची सफर घडविणारे ‘रहस्यकथांचे शहेनशहा’ म्हणून परिचित असणारे ज्येष्ठ साहित्यिक गुरुनाथ नाईक यांनी तब्बल १२०४ कादंबऱ्यांचा टप्पा पार करून विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आपल्या रहस्यकथांनी उभ्या महाराष्ट्राला एकेकाळी वेड लावणाऱ्या नाईक यांची ही झेप कौतुकास्पद असली तरी शासनदरबारी मात्र त्याची कोणालाच दखल घेण्याची गरज भासली नाही. आज वयाच्या सत्तरीतही नाईक यांची लेखणी तेवढय़ाच जोमाने व उत्साहाने सुरूच आहे. यापूर्वी १०९२ कादंबऱ्यांचा विक्रम रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर यांच्या नावावर होता. विशेष म्हणजे, गुरुनाथ नाईक यांनी तेवढय़ाच दमदारपणे पत्रकारितेमध्येही समर्थपणे वाटचाल केली आहे. <br />
वयाच्या ३२ व्या वर्षी पुण्यात एक इंग्रजी चित्रपट पाहताना भन्नाट कथा लिहिण्याचा फंडा डोक्यात भिनला आणि चित्रपट अर्धवट सोडून नाईक आपल्या खोलीत गेले आणि रात्रभर जागून त्यांनी ‘चुंबन’ ही मृत्यूकडे नेणारी पहिली रहस्यकथा लिहिली. आणि विशेष म्हणजे त्याच झपाटय़ात त्यांनी त्याच दिवशी ‘शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ’ ही दुसरी रहस्यकथाही लिहिली. तो काळ होता सत्तरीच्या दशकातला; ज्यावेळी रहस्यकथांच्या क्षेत्रात अर्नाळकरांनी आपला निर्विवाद ठसा उमटविला होता आणि जयवंत दळवी, शं. ना. नवरे, दि. बा. मोकाशी, अरविंद गोखले, सुभाष भेंडे, मधु मंगेश कर्णिक असे एकाहून एक अशा सरस कथाकारांनी आपल्या रसरशीत कथांनी मराठी वाचकांवर गारूड केले होते. याच काळात नाईक यांनीही वाचकांच्या मनावर कायमचा कब्जा केला, तो आजतागायत.. <br />
त्यांचा हा लेखन प्रवास अव्याहतपणे सुरू राहिला, तो तब्बल <br />
१२ वर्षे म्हणजे एक तप. मंत्रमुग्ध करणाऱ्या तसेच डोक्याला ताण देत मनाचीही पकड घेणाऱ्या या रहस्यकथा रसिकांच्या काळजाचाच ठाव घेऊ लागल्या. <br />
दरम्यान बाबुरावांनी आपले लेखन आवरते घेण्यास सुरुवात केली होती. या तब्बल १२ वर्षांमध्ये नाईक यांनी ७२४ रहस्यकथा तसेच गूढकथा लिहून काढल्या. यामध्ये सैनिकी जीवनावरील २५० कादंबऱ्यांचाही समावेश आहे. ‘गोलंदाज’ ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारून त्याच्या भोवती फिरणाऱ्या १५० कथा लिहिणारे नाईक हे साहित्य विश्वामधील एकमेव लेखक आहेत. कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथाप्रेमींच्या मनात आजही घर करून आहेत. ‘थेंब थेंब तेलासाठी’, धडक, सत्यमेव जयते, क्रांतिवीर या त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. याच कादंबऱ्यांमधून दीपाजी राणे हे गाजलेले नाटकही रंगमंचावर साकारण्यात आले होते, तसेच कल्याणी या कादंबरीवरून एका खासगी दूरचित्रवाहिनीवर कल्याणी ही मालिकाही प्रसारित करण्यात आली होती. या व्यतिरिक्त नाईक यांनी १०० हून अधिक लघुकथा लिहिल्या आहेत. ताण असह्य़ झाल्याने नाईक यांनी १९८४ मध्ये आपले रहस्यकथांचे लेखन काही काळ थांबविले. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अचानक लेखन थांबविल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पण नंतर काही काळाने त्यांनी लेखन पुन्हा सुरू केले. <br />
रहस्यकथा लिहिण्यापूर्वी १९५७ ते ६३ या काळामध्ये नाईक यांनी विविध विषयांवर लिखाण केले आहे. मूळचे गोव्याचे असलेल्या नाईक यांनी पत्रकारितेमध्येही आपला ठसा उमटवला आहे. १९५६ मध्ये त्यांनी पत्रकारितेत पाऊल टाकले आणि नंतर विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी कार्यकारी संपादक, संपादक अशी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. अलीकडेच त्यांची ऐतिहासिक पाश्र्वभूमीवरील ‘युद्धशास्त्राचे जनक छत्रपती शिवराय ’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. युध्दशास्त्रावर वेगळे आणि नेमके लेखन करणाऱ्यांत नाईक यांचा समावेश आहे. साहित्यक्षेत्रामध्ये आपल्या दर्जेदार आणि अद्भुत लिखाणाने वेगळा ठसा उमटविणाऱ्या नाईक यांनी कादंबऱ्या लिहिण्याचा ‘विक्रम’ केला असला तरी आजही त्याची दखल ना सरकारने, ना साहित्यविश्वाने घेतली. पण कोठेही खचून न जाता तसेच प्रसिद्धीपासून दूर राहत नाईक यांची लेखणी आजही तेवढय़ाच उत्साहात सुरूच आहे.</span><b> </b></div>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-18954685557120210812011-03-05T23:56:00.000-08:002011-03-05T23:56:00.211-08:00दहशतीचे बेट (इवो जिमाची लढाई)<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj5lu2rdXpHCWslFl_UgFVBQgjhxESULih6bOOmyTCw8JAZr3PjMN0xV97btyYKBZ6jw5MjsDo-OHF3FhSXUccJ42vOcvgykNJ3CF_C3DRx7_On5F1U-TKg3jGf-JClK8eq9bnNK4CERSDN/s1600/Dahashatichebet.jpg"><img style="margin: 0px auto 10px; display: block; text-align: center; cursor: pointer; width: 150px; height: 250px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj5lu2rdXpHCWslFl_UgFVBQgjhxESULih6bOOmyTCw8JAZr3PjMN0xV97btyYKBZ6jw5MjsDo-OHF3FhSXUccJ42vOcvgykNJ3CF_C3DRx7_On5F1U-TKg3jGf-JClK8eq9bnNK4CERSDN/s400/Dahashatichebet.jpg" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5515918327224009986" border="0" /></a><span style="font-size:130%;"><span id="ctl00_MehtaMainCPH_lblSynopsis" class="synopsis" style="display: inline-block; width: 96%;">"इवो जिमा।' जपानजवळील एक लहान पण धगधगते बेट. दुसरे जागतिक महायुद्ध अनेक पातळ्यांवर लढले गेले. अमेरिका आणि जपान यांच्यात झालेली "इवो जिमाची लढाई' हा त्याचा एक महत्त्वाचा भाग. ही लढाई भूदल, वायुदल आणि नौदल या तीनही माध्यमांतून लढली गेली. "बझूका'सारखी आधुनिक शस्त्रे, पिलबॉक्सची विशेष बांधणी, आत्मघातकी विशिष्ट बाँब, कल्पनातीत मनुष्यहानी आणि बोइग बी-29 सुपरफॉर्टरेस सारख्या राक्षसी, प्रगत विमानाचा प्रथमच वापर ही या लढाईची खास वौशिष्ट्यं. या सर्वां|चा अहोरात्र वापर करुन झालेली ही निर्णायक लढाई. या लढाईने इतिहास घडविला. या महायुद्धातूनच जगाला शांतीचा संदेश दिला. प्रत्येक वाक्याला "पुढे काय होणार' अशी उत्सुकता वाढविणारी ही चित्रकथा...<br /></span><span id="ctl00_MehtaMainCPH_lblBookTitle" class="book_title" style="display: inline-block; width: 505px;"><span style="color: rgb(255, 255, 102);">दहशतीचे बेट (इवो जिमाची लढाई)</span><br /></span><span id="ctl00_MehtaMainCPH_lblOrigAuthor" class="author"><br />मूळ लेखक : <span style="color: rgb(255, 255, 102);">हामा लॅरी</span></span><br /></span><span id="ctl00_MehtaMainCPH_lblAuthor" class="author"><span style="font-size:130%;">अनुवादक :<span style="color: rgb(255, 255, 102);"> प्रसाद बर्वे</span><br />प्रकाशन : <span style="color: rgb(255, 255, 102);">मेहता</span><span style="color: rgb(255, 255, 102);"> </span><span style="color: rgb(255, 255, 102);">पब्लिशिंग</span><span style="color: rgb(255, 255, 102);"> </span><span style="color: rgb(255, 255, 102);">हाऊस</span></span><br /></span>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5716636043800556226.post-44263816245022145232011-02-15T23:46:00.000-08:002011-02-15T23:46:00.259-08:00चिकन सूप फॉर द सोल भाग 3 (chicken soup for The soul पार्ट 3)<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi8PF5Ae_FgRCkYDXIMMkFB1VD16etHRC42D5_icrHUcoSTsaZkJIH5EzSoYPpJ7bQxTZAFhxKeZxShEZ2qM6kTCc8XgZY1vZhaiqfPl30ni0UTEbonJdaEbvEfE1vkZme6UEmD9ErGHCpx/s1600/Chickensoup3.jpg"><img style="margin: 0px auto 10px; display: block; text-align: center; cursor: pointer; width: 149px; height: 250px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi8PF5Ae_FgRCkYDXIMMkFB1VD16etHRC42D5_icrHUcoSTsaZkJIH5EzSoYPpJ7bQxTZAFhxKeZxShEZ2qM6kTCc8XgZY1vZhaiqfPl30ni0UTEbonJdaEbvEfE1vkZme6UEmD9ErGHCpx/s400/Chickensoup3.jpg" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5515916256282183250" border="0" /></a><span style="font-size:130%;"><span id="ctl00_MehtaMainCPH_lblSynopsis" class="synopsis" style="display: inline-block; width: 96%;">"चिकन सूप फॉर द सोल' या पुस्तकाच्या पहिल्या भागाप्रमाणे या पुढच्या भागातही जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन या अमेरिकन जनमानसाच्या लाडक्या लेखकांनी देशविदेशांतून अनेक कथा मागवून त्यांचं संकलन केलेलं आहे। आजच्या युगातल्या मानसिक ताणतणावावरचा रामबाण उपाय ठरलेल्या या कथा वाचताच मनाची मरगळ, नैराश्य झटकन दूर होतं व वाचक नवचैतन्याने आयुष्याला, त्यातील संकटांना, अडीअडचणींना हिमतीने सामोरा जातोच. या कथांचं टॉनिक मिळाल्यावर वाचकाला स्वत:त जो बदल जाणवतो त्या अनुभवाचं कथन तो आपल्या जवळच्यांना, मित्रमैत्रिणींना ऐकवतो व मग ही देवाणघेवाणीची न तुटणारी साखळीप्रक्रिया पुढेपुढे जात राहते. खरंच कधीकधी अशा साध्या, सरळ सत्यकथांतून थोडंफार तरी समाजपरिवर्तन होऊ शकतं ना?<br /><br /><span style="color: rgb(255, 255, 102);">चिकन सूप फॉर द सोल भाग </span><span style="color: rgb(255, 255, 102);">३</span><br /></span><span id="ctl00_MehtaMainCPH_lblOrigAuthor" class="author"><br />मूळ लेखक : <span style="color: rgb(255, 255, 102);">जॅक कॅनफिल्ड </span><span style="color: rgb(255, 255, 102);">मार्क</span><span style="color: rgb(255, 255, 102);"> व्हिक्टर हॅन्सन</span></span><br /><span id="ctl00_MehtaMainCPH_lblAuthor" class="author">अनुवाद : <span style="color: rgb(255, 255, 102);">उषा महाजन</span></span><br />प्रकाशन : <span style="color: rgb(255, 255, 102);">मेहता</span><span style="color: rgb(255, 255, 102);"> </span><span style="color: rgb(255, 255, 102);">पब्लिशिंग</span><span style="color: rgb(255, 255, 102);"> </span><span style="color: rgb(255, 255, 102);">हाऊस</span></span>Pravinhttp://www.blogger.com/profile/14153209271265943742noreply@blogger.com0